.सार्वजनिक सत्यधर्म : भाग २

.सार्वजनिक सत्यधर्म : भाग २
व दूध लग्नानिमित्ताने आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे वळण घेत असताना दोन कुटुंबांचे, दोन जातींचे वा दोन वंशांचे-धर्माचे प्रातिनिधिक रक्त-मिलन व मिलन होत असते. हे मिलन आनंदाने ‘साजरे’ न करणे, मानव घर्माला घरून होणार नाही. म्हणून या मिलनाचा क्षण टाळ्या वाजवून, फुलांचा वर्षाव करून उत्साहात साजरा झालाच पाहिजे. त्यात बदलत्या काळानुसार काही विधी ‘शपथविधी’ स्वरूपात आल्या तर त्या मानसशास्त्रानुसार अंधश्रद्धा ठरत नाहीत. विवाह करणाऱ्या दोन व्यक्तींनी एकमेकांच्या मनाशी खूणगाठ बांधून काही निश्चय केला असेल वा त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावना मंगलाष्टकातून जाहीरपणे व्यक्त करीत असतील तर, ते वैज्ञानिकच म्हटले पाहिजे.
तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी अशाच वैज्ञानिक दृष्टिकोनातून विवाह विधी, घरभरणी विधी, मृत्यु विधी, नामकरण विधी तयार केलेले आहेत. सार्वजनिक सत्यधर्म हा जगातील एकमेव असा धर्म आहे, की ज्यात देव नाही, मंदिर नाही, उपासना नाही, पारायण नाही, पूजापाठ नाही, अग्नी-यज्ञ नाही, मंत्रपठणही नाही, कर्मकांड नाही, मूर्ती नाही, पुतळे नाहीत, फोटोही नाही, कोण्या महापुरुषाची व्यक्तीपूजा नाही, दीक्षा नाही, उपनयन नाही, दान-दक्षिणा नाही, पोथी नाही व पुराणही नाही. फक्त ३३ कलमी आचरण केले की, कोणीही व्यक्ती ‘माणूस’ म्हणून यशस्वीपणे जीवन जगतो व दुसऱ्यांनाही जगायला मदत करतो. याचेच नाव ‘सार्वजनिक सत्यशोधक धर्म’ होय. ‘सार्वजनिक’ या शब्दाचा अर्थ असा की, हा सत्यधर्म कोण्या एका जातीच्या, वर्णाच्या वा गट-वर्गाच्या मालकीचा नाही. कोणाच्या वर्चस्वाचा नाही. तो धर्म समाजातील प्रत्येक व्यक्तीच आहे. तात्यासाहेबांनी सांगितलेला ‘निर्मीक’ हा ब्राह्मणी-वैदिक पंथाने सांगितलेला ‘देव’ नाही किंवा मुसलमान धर्म व ख्रिश्चन धर्मातील अल्ला वा गॉड नाही, ता. तो ‘सेश्वर यांत्रिकी भौतिकवाद’ या वैज्ञानिक तत्त्वज्ञानातील एक ‘पदार्थ’ आहे.
‘उत्सव’ साजरा करण्याच्या परंपरेतून काही विधी, कर्मकांड निर्माण होतात. त्यातून अंधश्रद्धेचे पीक फोपावते व ते शोषणाचे साधन बनते. त्यातून एका विशिष्ट वर्गाचे-वर्णाचे वा जातीचे वर्चस्व निर्माण होते. हे वर्चस्व टिकविण्यासाठे शोषक लोक नव-नवीन कर्मकांडांना जन्म देतात. भाकडकथा रचून त्यांबा धार्मिक पोथ्या बनवितात. नव-नवीन देवी-देवतांना जन्माला घालून त्यांच
भाम २
सत्यशोधक विधी

