मंडलनामा क्रमशः 35.आंध्रात बंद पाडले भाषण

मंडलनामा क्रमशः
35.आंध्रात बंद पाडले भाषण
उत्तर प्रदेशाप्रमाणेच दक्षिण भारतातील मुस्लिमांनाही ‘ओबीसी’ म्हणून सोबत घेण्याचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनने प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. दक्षिण भारतात पेरियार रामास्वामी यांच्या प्रेरणेने सुरू असलेल्या द्रवीड चळवळीचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे उत्तर व मध्य भारताच्या तुलनेत केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामीळनाडू व आता तेलंगणातील मुस्लिमांची स्थिती उत्तम आहे. पण तेथे सर्वकाही छान छान आहे, असे नाही. त्यावेळी आम्ही आढावा घेतला असता कर्नाटकातील मुस्लिमांना चार टक्के व केरळमधील मुस्लिमांचा १२ टक्के आरक्षित प्रवर्गात समावेश असल्याचे माहीत झाले. मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना कर्नाटकात काही मुस्लिम प्रवर्गांना ओबीसींमध्ये सामील करून घेण्यात आले आहे. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनने आंध्र प्रदेशात छोट्या छोट्या परिषदा घेऊन संघटना बांधणीसाठी बराच प्रयत्न केला, मात्र त्याला फार यश आले नाही. कर्नाटकातही हाच अनुभव आला. केरळातील राज्यकर्ते व स्थानिक मुस्लिम नेतृत्व सजग असल्याने आम्हाला तेथे काम करण्याची गरज पडली नाही.
आंध्र प्रदेशात माझ्यावर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांनी मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासंदर्भात बैठक बोलावली होती. मी त्या बैठकीला निमंत्रित म्हणून हजर राहिलो. रेड्डी यांना मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचे नव्हते. भारतीय संविधानानुसार धर्माच्या आरक्षण आधारे देता येत नाही, त्यामुळे असा निर्णय घेणे चूक असल्याचे स्पष्ट मत मी मांडले. धर्माच्या आधारे आरक्षण दिल्यास ते घटनाबाह्य ठरेल, असे लक्षात आणून दिले. पण उपस्थित स्थानिक मुस्लिम नेत्यांना माझे म्हणणे मान्य नव्हते. मी मुद्दा मांडल्यानंतर ते माझ्यावर एकदम उसळले. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून ते धार्मिक आधारावर आरक्षण देण्यास तयार आहेत. ते सर्व काळजी घेतील व धार्मिक आधारावरील मुस्लिम आरक्षण टिकेल, असा त्यांचा दावा होता. मी घटनातज्ज्ञ नसलो तरी एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर मला काही बाबींची पक्की माहिती होती. मी माझा मुद्दा रेटून नेला. त्यामुळे काही जण माझ्या अंगावर धावून येऊ लागले. सभेचा रागरंग पाहून मी माझे बोलणे आटोपते घेतले. त्यांनी माझे भाषण बंद पाडले, असे म्हणता येईल. याची बातमी ‘डेक्कन क्रॉनिकल’ या दैनिकात छापून आली.
या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी ‘सियासत’ या दैनिकाचे मालक व संपादक नवाब जाहेद अली खान यांनी दैनिकाच्या कार्यालयात बैठक आयोजित केली. तेथे मला व हैदराबादमधील काही नवाबांना निमंत्रित केले होते. या बैठकीतही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसारखाच सूर लागला. मी तेथेही धर्माच्या आधारे आरक्षण टिकू शकत नाही, असे निक्षून सांगितले.
आंध्र प्रदेश सरकारने धर्माच्या आधारे मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिले. अपेक्षप्रमाणे त्याला कोर्टात आव्हान देण्यात आले. हे आरक्षण कोर्टात टिकू शकले नाही. आता आंध्र प्रदेश व त्यातून विभाजित झालेल्या तेलंगणात मुस्लिम समूहांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळते. पण आंध्र प्रदेश व तेलंगणात मुस्लिम ओबीसींची चळवळ नाही. तेथील मुसलमानांवर ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे. तेथील मुस्लिम धार्मिक राजकारणात नुकसान करून घेत आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




