मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब :- महात्मा ही जनतेची मान्यता !!! भारतरत्न ही राज !:::मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब :- महात्मा ही जनतेची मान्यता !!! भारतरत्न ही राज !:::मान्यता
छगनरावजी भुजबळ साहेब :-
भारतरत्न पुरस्कार देताना फुले दापत्यांना महात्मा आणि क्रांतीज्योती असलेली उपाधी आहे .त्याचं महात्म्य कुठेही कमी झालं नाही पाहिजे. याची सरकारने दखल घेतली पाहिजे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न प्रदान करण्याचा प्रस्ताव आज एकमताने महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात मंजूर झाला.
सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार, स्त्री-शिक्षण आणि शेतकरी व श्रमिक वर्गाच्या हक्कांसाठी कामगार संघटना मानव अधिकार गुलामगिरी सामाजिक स्वातंत्र्य या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातिव्यवस्थेविरोधात लढा दिला, तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणक्रांती घडवली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न देण्याची मागणी सातत्याने होत होती. आज एकमताने हा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर झाला. हा आनंद आहे. महाराष्ट्र विधानसभेने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याच्या एकमताने मंजूर केलेल्या ठरावाचे छगनराव भुजबळ साहेब स्वागतच करतो. म्हणाले परंतु क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना देशातील जनतेने दिलेली ‘महात्मा’ ही पदवी सर्वोच्च पदवी आहे. या देशात फक्त महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोनच महात्मे असल्यामुळे भारतरत्न देताना महात्मा फुले यांचे माहात्म्य कुठेही कमी होता कामा नये, अशी भूमिका आज या ठरावावर विधानसभेत बोलताना मांडली.
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे म्हणाले गेल्या 70 – 75 वर्षांपूर्वीची ही मागणी आता सरकार पूर्ण करत आहे. त्यांचं प्रथम मी अभिनंदन करतो त्या ठरावाचं स्वागत करतो. खरं तर हा पुरस्कार देण्यासाठी फार उशीर झालेला आहे. तरीसुद्धा देर आहे दुरुस्त आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे जगातील पहिले दांपत्य आहे की त्यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महात्मा ज्योतिराव फुले राहुरी कृषी विद्यापीठ अशी दोन विद्यापीठ त्यांच्या नावावर आहेत ही जगातील दुर्मिळ गोष्ट आहे. त्यांनी जवळजवळ 40 आणि 50 विषयावर अभ्यास केलेला आहे. आणि महात्मा फुले यांनी 450 विषयावर समाजाचे प्रबोधन केलेलं आहे आणि तेही विज्ञानवादी पद्धतीने केलेला . आहे. अज्ञान अंधश्रद्धा समता एकता विकास आणि समाजाला असणारे घातक विषय आहे. परंतु त्याला पर्याय काय द्यायचा तो त्यांनी विज्ञानवादी पद्धतीने पर्याय दिलेले आहे. ते एक लेखक साहित्यिक कवी क्रांतिकारी समाज सुधारक विज्ञानवादी संशोधक मागासवर्गीय शिक्षकांचे आद्य प्रवर्तक एक उद्योगपती एक राजकारणी समाजसेवक अक्षर साक्षर जलसाक्षर कृषी साक्षर अंधश्रद्धा दारूबंदी जुन्या चालीरीती रुढी परंपराला महिला अत्याचार केस वेपन पर्याय शोधले दुष्काळ निवारण मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी साक्षर केले कुटीर उद्योग उद्योग साक्षर भारत नेशन बिल्डर अशा अनेक भरभक्कम विषयावर त्यांनी काम केलेलं आहे.
सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण तज्ञ म्हणून काम केलेल आहे बहुजनांच्या मुलांची गळती का होते याच्यावर संशोधन केलेले आहे त्याच्यावर अभ्यासक्रम केलेला आहे “जातिभेद विवेकसार ” या पुस्तकांचे प्रकाशन केले . पहिला पेपर दिनबंधू, पाणी आणण्याबद्दल आणि जिरून याबद्दल संशोधन बी बियाणं खते निर्मिती करण्याचे संशोधन जनजागृतीसाठी, अखंड आणि पहिलं नाटक तृतीय रत्न लिहिलेले आहे. पहिले शिवशाहीर महात्मा ज्योतिराव फुले पहिला पोवाडा महंमद पैगंबराचा त्यांनी लिहिला असे कितीतरी विषयाचे ते जनक होते. अंधश्रद्धा निर्मूलन शेतकऱ्याचा आसूड गुलामगिरी ब्राह्मणाचं कैफियत कसब इशारा इ.ग्रंथ लेखन केले.
पॅरलेस झाल्यानंतर डाव्या हाताने लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म , रेल्वेने भाजीपाला मुंबईला पुण्याहून नेण्याचे कॉन्ट्रॅक्ट, सोने वितळण्याच्या मुंशीचे कॉन्ट्रॅक्ट, रेल्वे बांधकाम, तलाव बांधकाम, बोगदे बांधकाम इत्यादी कॉन्ट्रॅक्ट घेणे व मजूर पुरविणे कॉन्ट्रॅक्ट खडी पुरविणे, चुना पुरविणे इत्यादी कॉन्ट्रॅक्ट मार्फत केलेल्या कामांमध्ये टाटा पेक्षा 50 पट जादा टर्न ओव्हर असलेलं त्यांचं उद्योगाचं काम त्यातून मिळालेला सर्व पैसा समाजकार्यासाठी खर्च केलेला होता त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी समुद्राची शाई जरी केली तरी सुद्धा ती शाई कमी पडेल इतकं त्यांचं अथांग सागरासारखा काम आहे एक क्वचित असं उदाहरण असेल की त्या काळामध्ये सुद्धा लग्नानंतर सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या ट्रेंड शिक्षिका झाल्या आणि तशा शिफारशी इंग्रज सरकारना केलेले आहेत
त्यांनी तळहाताचा पाळणा करून विधवा संगोपन बालहत्या प्रतिबंधक ग्रह प्रस्तुती ग्रह रात्रीच्या शाळा दिवसांच्या शाळा दुष्काळात लहान मुलांच्या जेवणासाठी बोर्डिंग समाज सुधारण्यासाठी संघटना काव्य लेखन साहित्य लेखन महिला संघटन स्वावलंबन गृह उद्योग शालेय साहित्य विद्यार्थ्यांना पगार स्कॉलरशिप काळ्यापाण्याची शिक्षा निर्मूलन दलितांसाठी आपली विहीर खुली करून पाणी दिले अस्पृश्यता निर्मूलन साथीच्या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी पराकाष्ठा करून अंततः त्यांचा त्याच कामांमध्ये एका दलित पांडुरंग गायकवाड नावाच्या मुलाची सुश्रुषा करताना प्लेगाचा रोगी पांडुरंग याला पाठीवर घेऊन आणल्यामुळे त्या प्लेगची लागण त्यांना होऊन त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे एक धाडसी महिला जगातील पहिल्यांदा एका स्त्रीने पतीच्या चितेला अग्नी दिलेला आहे टिटवी हातात घेतलेली आहे महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सात वर्षे सत्यशोधक समाज संघटनेचे अध्यक्ष पद भूषविले त्या माध्यमातून 1892 ची मुंबईतील सर्वात मोठी हिंदू मुस्लिम दंगल आटोक्यात आणली भायखळ्याला 60000 लोकांची सभा घेतली त्यानंतर शंभर वर्षे मुंबईमध्ये दंगल झाली नाही हा एक महत्त्वाचा सावित्रीबाई फुले यांचा पॅटर्न सरकारने लक्षात घेण्याजोगा आहे
मुंबईतील आणि पुण्यातील प्लेगची साथ अटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र कष्ट केलेल आहे त्यातच त्यांचा 10 मार्च 1897 ला दुर्दैवी अंत झालेला आहे आता थोडं आटोक्यात लिहीत आहे नंतर सविस्तर लिहीत आहे म्हणून सरकारला माझं पुन्हा आवाहन आहे ठीक आहे आपण आता भारतरत्न पुरस्कार दिला हे दांपत्य विश्वरत्न आहे. त्यासाठी ब्रिक्स किंवा G20 यांच्या माध्यमातून आपण एखादा नवीन पुरस्कार चालू करावा आणि तो प्रथम या दाम्पत्यांना द्यावा सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी ट्रेंड शिक्षिका फातिमा शेख यांनाही भारतरत्न पुरस्कार या सरकारने द्यावा हिंदू मुस्लिम न करता मोठ्या मनाने हा पुरस्कार द्यावा ही नम्र विनंती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले फातिमा शेख नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांचे असंख्य सहकारी यांच्या बद्दलचे साहित्य संशोधन करावं आणि ते प्रकाशित करावं नाम मात्र किमतीमध्ये सर्व भाषेमध्ये छापून शासनामार्फत देशात प्रदेशात वितरित करावं या दापत्याचं मुंबईमध्ये खूप मोठं काम आहे त्यासाठी आपण मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक बांधावा आणि त्या स्मारकामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं लिखित साहित्य वाचनालय करावं ही एक नम्र विनंती आहे आता सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार आपण देत आहात तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोगो हा शनिवार वाडा विषमतेचे प्रतीक बदलून त्या ठिकाणी फुले वाडा हे प्रतीक लोगो त्वरित करावे वापरात आणावा तशी शिफारस त्वरित विद्यापीठांना करावी आज सर्व आमदाराने एक मताने हा ठराव मांडल्याबद्दल सर्व आमदारांचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व मंत्री यांचे हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे #दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी
# देवेंद्र फडणवीस #महाराष्ट्र शासन #ऑल वर्ड फुले प्रेमी
#MahaBudgetSession2025 #अर्थसंकल्पीय_अधिवेशन #महाराष्ट्र #Maharashtra




