शरण गाथा क्रमशः ४

लढताना त्यांनी आयुष्य वेचलं, आपण मात्र त्यांचेच नाव घेत विखारांनाही शुद करून घेतले. त्यांच्याच नावाने कर्मकांड करण्यात धन्यता मानत मोठेपणा मिखू लागलो. महापुरुषांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या वचनांमध्ये कल्पनाविलास घुसविण्यात आले. चमत्कारी घटना पेरण्यात आल्या. परिणामी जो विचार मुख्य प्रवाह असायला हवा, त्या विचाराची, त्या वारशाची जाणीवपूर्वक आठवण करून देण्याची वेळ यावी हे दुर्दैवच.
मग चर्चा सुरू झाली की, हे सगळं टाळायला हवं. शरणांचे वास्तवदर्शी आणि समकालीन संदर्भातील चरित्रे सांगायला हवीत. घुसखोरीची जळमट काढून शरणांचे माणूसपण नव्या पिढी समोर मांडायला हवे. हे झालं पाहिजे, ते करायला हवं. (हे केले पाहिजे ते केले पाहिजेच्या चालीत) अशा अपेक्षा व्यक्त होताना कोण करणार? या प्रश्नाचे उत्तर ‘रिंगण’कार सचिन परब यांनी दिले. ज्येष्ठ पत्रकार आणि वारकरी परंपरेचे समकालीन मूळ शोधणारे अभ्यासक सचिन परब हे रिंगण हा वार्षिक अंक काढतात. आषाढी एकादशीच्या दिवशी प्रकाशित होणाऱ्या रिंगण या अंकातून त्यांनी वेळोवेळी भूमिका मांडली. ती म्हणजे “हे काम मी करायला हवं, हे = सत्य मी सांगायला हवं.” हे माझं आणि माझंच काम आहे. कुणा इतरांकडून अपेक्
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




