जय जोती ! समता – एकता – विकास !! जय क्रांती !!! राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन

जय जोती !
समता – एकता – विकास !!
जय क्रांती !!!
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
नोंदणीकृत कार्यालय : ८ बाजीव प्लाझा, एस टी स्टॅन्ड समोर, सोलापूर ४१३००२ (MH-१३)
M. 7387377801 Email: abmmahasangh@gmail.com Website: www.abmmahasangh.org
महाराष्ट्रातील सर्व ओबीसी, व्हीजे एनटी, एनटी एसबीसी समाज प्रेस नोट
दिनांक 23 एप्रिल 2024
फडणवीसानी केला ओबीसी समाजाचा अपमान !
जरांगेच्या दबावाला बळी पडून ठाण्याच्या जागेसाठी अतिशय शुल्लक कारणासाठी जातीवादी देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी चे राष्ट्रीय नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना उमेदवारी देण्यासाठी टाळाटाळ केली त्यांचा राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन ओबीसी राजकीय आघाडी सर्व ओबीसी संघटना ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध ! जाहीर निषेध!! जाहीर निषेध!!! राज्यभर करण्यात येत आहे
केंद्रीय नेत्यांनी सुचवून देखील राज्य नेतृत्वाने मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी लवकर जाहीर न केल्याने तमाम ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध.

महायुतीला ओबीसी मतांची आवश्यकता नाही का; ओबीसी समाजाचा सवाल आहे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना नाशिकमध्ये लोकसभा उमेदवारी देण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना दिल्या होत्या. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटून देखील राज्यातील नेत्यांनी उमेदवारी जाहीर न केल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणूकीतून माघार घेतली. त्यामुळे राज्यातील ओबीसी वर्गामध्ये तीव्र रोष असून राज्यातील नेतृत्वाचा आम्ही तीव्र निषेध करतो असे एका पत्रकाद्वारे पत्रकार परिषदेत लिंगे यांनी असे म्हटले आहे.
ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय गृह मंत्री अमितजी शहा यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी असे आदेश दिले होते. दिल्लीतील वरिष्ठांचे आदेश असताना राज्यातील नेत्यांनी तीन आठवड्यातून अधिक काळ कुठलाही निर्णय होत नसल्याने याचा फायदा समोरच्या विरोधी उमेदवाराला होत होता. यामुळे पक्ष हितासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे राज्यभरातील ओबीसी वर्गामध्ये ओबीसींना डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाज निर्णय घेतला आहे कुणाला कोणाला मतदान करायचेते ठरविले आहे
ओबीसी ने आता एकच काम करावे आपलाच पक्ष आपलाच उमेदवार आपलीच मतं आणि आपलं सरकार बनविण्यासाठी ओबीसी नाच मतदान करा ओबीसी उमेदवार नसेल त्या ठिकाणी एससी एसटी अल्पसंख्याक यांना मतदान करा भाजप शिवसेना शिंदे गट घड्याळ गट या जातीवादी पक्षांना मतदान करू नये जातीवादी मराठ्यांना मतदान करू नका बाकी कोणालाही मतदान करा, त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी ज्या कारणामुळे भुजबळ साहेबांची उमेदवारी नाकारली त्यामुळे या घटनेचे पडसाद देशभर ओबीसी समाजात उमटले आहेत याचा फटका एनडीए आघाडीच्या पक्षाला बसल्याशिवाय राहणार नाही!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे आता आपण गुन्हेगार व्हायचं नाही आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आपल्या भावी पिढीसाठी संविधान वाचवण्यासाठी देश वाचवण्यासाठी ज्यांनी देश निर्माण केला अशा ओरिजनल ओबीसी नाच मतदान करा! असे आवाहन शंकराव लिंगे यांनी पत्रकार परिषदेत केले पत्रकार परिषदेला डॉक्टर माधुरी पारपल्लीवार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार अर्जुन दादा सलगर एडवोकेट राजन दीक्षित सर भैरव बाळकोटे बापूसाहेब भंडारे सोलापूर जिल्हा समता परिषद उपाध्यक्ष कांतीलाल राऊत सुभाष राऊत इत्यादी ओबीसी समाजाचे नेते मान्यवर उपस्थित होते
ओबीसी एकता महापरिषद
73 87 37 78 01
& 94 22 06 8771
वरील प्रमाणे बातमी आपल्या लोकप्रिय बातमी पत्रात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती
आपला विनीत
सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे



