अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हा त्यांना सहानुभूती मिळवून देण्याचा डाव आहे

अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हा त्यांना सहानुभूती मिळवून देण्याचा डाव आहे.
भाजपची खरी खुरी बी टीम ही आप आहे. असे असताना मविआ च्या नेत्यांच्या डांगीत या पक्षाला बी टीम म्हणण्याची हिंमत नाही. इंडीया आघाडीतून हा पक्ष दिल्लीच्या जागावाटपावरून बाहेर पडला तरीही कॉंग्रेस अद्याप बी टीम ची कॅसेट वाजवायला तयार नाही.
ब्राह्मणांच्या कॉंग्रेस, भाजप,तृणमूल कॉंग्रेस, माकप, भाकप या ब्राह्मणांच्या राष्ट्रीय पक्षांच्या टीम या एकमेकांच्या ए ,बी, सी, डी आणि ई अशा टीम होत्या आण आहेत. नव्वदच्या दशकापर्यंत ब्राह्मणांनी या नाटक कंपन्या उघडून एक हिंदुत्ववादी, एक सेक्युलर, एक साम्यवादी, एक समाजवादी अशा भूमिका बेमालूम वठवल्या. हे मीडीयाशिवाय शक्यच नव्हते. मीडीयात १००% ब्राह्मण आहेत. मीडीयाला अर्थपुरवठा बनियांचा राहिलेला आहे. या सर्व पक्षांना निश्चित रणनीती आखून हिंदुत्ववादाला खतपाणी घातले.
यांनी सर्व सामने आपसातच लावले. इतरांना या खेळात भूमिकाच नव्हती.
मात्र हा खेळ ओळखून सत्तरच्या दशकापासून युवावस्थेत असलेल्या लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव अशा नेत्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहार मधे आंदोलन सुरू केले. कांशीराम यांनी त्या वेळी महाराष्ट्रात आपले बहुजन राजकारण रिपब्लिकन पक्षात सुरू केले पण त्यांना ते बंद करण्याचा सल्ला देण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र सोडून ते उत्तर प्रदेशात आले आणि इथे त्यांचे राजकारण यशस्वी झाले.
हरियाणात बन्सीलाल, देवीलाल आणि भजनलाल यांचा उदय झाला. चौधरी चरणसिंग यांचा दबदबा होता. या नेत्यांनी कॉंग्रेसपासून फारकत घेत आपापले पक्ष काढले. त्यातच विश्वनाथ प्रताप सिंग या क्षत्रिय नेत्याने कॉंग्रेसमधून बाजूला होत काळाची गरज म्हणून ओबीसी मतदार आपल्या बाजूला झुकवण्यासाठी बामसेफ, बसपा आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सांगण्यावरून मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. यात लालूप्रसाद यादव यांची भूमिकाही महत्वाची होती. मंडल आयोगासाठी काकासाहेब कालेलकर समितीच्या शिफारशी लागू करण्यापासून आंबेडकरी संघटनांनी लढा दिला आहे. कर्पुरी ठाकूर वगैरे ओबीसी आरक्षणात कधीही नव्हते. मंडल आयोगापासून लालू यादव यात सक्रीय झाले.
मंडल आयोगानंतर भारतात बहुजन राजकारण सुरू होणार या भीतीपायी ओबीसींची जनगणना ना भाजपने केली ना कॉंग्रेसने ना कम्युनिस्ट ना तॄणमूल कॉंग्रेसने. या पक्षांनी खासगी वाहिन्यांचे बिल पास करून घेतले आणि निवडणुकीचा प्रचार खर्चिक करून टाकला. या काळात बामसेफ हे लोकांना समजावून सांगत होती.पण ती वेळ अशी होती कि लोकांच्या डोक्यावरून दहा फूट उंचीवरून हे सगळे जात होते. सगळे करून झाल्यावर आता लोकांना पटते. याला काहीही अर्थ नाही. वेळ गेल्यावर जागे होणे हा बहुजनांचा गुणधर्मच आहे.
निवडणुका खर्चिक झाल्याने बनियांना महत्व आले. बनिया हा धूर्त प्राणी आहे.इतकी वर्षे त्याला सत्तेत सहभाग नसला तरी चालत होता. ब्राह्मण आणि क्षत्रिय (ठाकूर) यांना सत्तेत बसवून त्यांच्याकरवी आपले शोषणाचे औद्योगिक साम्राज्य अबाधित ठेवण्यात त्याला इंटरेस्ट होता.ब्राह्मण आणि ठाकूर हे बनियांचे उद्योग मोठे करून त्यांच्या करवी सत्तेसाठी पैसा मिळवत राहिले. या कारणाने बहुजनांच्या उद्योगाला भारतात पोषक वातावरण नाही. बनिया ही जात खूप धूर्त आहे. औद्योगिक क्षेत्रात त्यांच्या संघटना आहेत. यातल्या काही संघटनांना सरकार मान्यता देते. जे उद्योग बनियेतर आहेत उदा टाटा, त्यांनाही या संघटनेच्या नियमांच्या चौकटीतच व्यवसाय करावा लागतो. नाहीतर ते बाहेर फेकले जातात.
आता बनियांनाही आपल्या राजकीय पक्षांची गरज भासू लागली. संघालाही कॉंग्रेस पक्षाला पर्याय हवा होता. याचे कारण कॉंग्रेस पक्ष संघटनात्मक दृष्ट्या खिळखिळी झालेली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारात या पक्षाचे पुनरूज्जीवन होण्याची शक्यता नाही. मध्यप्रदेशात कॉंग्रेसची संघटना मृत्यूपंथावर आहे. ती निवडून येते ती मीडीयाच्या जिवावर. या पक्षाने राज्याराज्यात प्रबळ जातींना सत्ता दिल्याने संघपरिवार नाराज आहे. कॉंग्रेसच्या शीर्षस्थानी ब्राह्मणांची सत्ता आहे. गांधी कुटूंब स्वत:ला ब्राह्मण समजते. मात्र सत्ता नेहमी चिदंबरम, प्रणव मुखर्जी अशा ब्राह्मणांच्या हातात आहे. गांधी हा ब्रॅंड वापरला जातो. गांधींनी वेळोवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेतली आहे आणि त्यांना मदतही केली आहे. इंदिरा गांधींना आर एस एस ने मदत केली होती. राजीव गांधींनी रामजन्मभूमी आंदोलन उभे करण्यासाठी राममंदीराचे कुलूप उघडले होते.
मात्र आता या पक्षाची व्होट बॅंक दुरावल्याने संघाने केजरीवाल यांच्या पक्षाला प्रोजेक्ट करण्यासाठी रामलीलावरचा तमाशा घडवून आणला.केजरीवाल यांची भ्रष्टाचाराच्या विरोधातली देशातली सर्वात मोठी शक्ती अशी इमेज झाली. केजरीवाल यांनी दिल्लीवर लक्ष केंद्रीत केले. त्यांनी बसपाच्या मतदाराला लक्ष्य केले. दिल्लीत संघाने पैसा ओतून प्रचाराची ताकद कामाला लावली. बसपाचा मतदार झोपडपट्ट्यात राहतो. त्यांना मोफत वीज आणि मोफत पाणी हे आश्वासन देऊन केजरीवाल दिल्लीत सत्तेवर आले. कॉंग्रेसला पर्याय उभा करतानाच बसपा खिळखिळी करण्यात ते यशस्वी झाले.
दिल्लीत सत्ता मिळाल्याने दिल्लीच्या आजूबाजूच्या पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब या राज्यांच्या सीमाभागात आपचा प्रभाव वाढला. तिथून तो राज्यभर वाढवला. आता बसपाचे वाल्मिकी व इतर समूह हे आपमधे आहेत. यामुळे बसपा खिळखिळी झाली आहे. बसपाचा निवडणूक निधी गेली काही वर्षे रोखून धरला आहे. त्यांच्यावर खोट्या केसेस चालू आहेत.
मात्र केजरीवाल यांना ऐन निवडणुकीत अटक केल्याने मीडीयाच्या एका हिश्श्याने त्यांच्या बद्दल सहानुभूतीची लाट तयार करायला सुरूवात केली आहे. शरद पवार यांनी लगेच संताप व्यक्त केला.
शरद पवार हे ब्राह्मणी राजकारणाला अनुकूल भूमिका घेतात हे बिनशर्त पाठिंबा आणि अन्य कित्येक प्रकरणात सिद्ध झालेले आहे.जो शक्तिशाली आहे त्याच्याशी जुळवून घ्यायचे आणि राज्यात आणि आपल्या संस्थानांत आपल्यापेक्षा कमजोर लोकांचे राजकारण उभे राहू द्यायचे नाही ही शरद पवार यांची भूमिका आहे. हीच सरंजामी, निजामी मराठ्यांची भूमिका आहे. यातून एक लॉबी तयार झाली. हे सर्व एकमेकांचे नातेवाईक, सगेसोयरे आहेत. सत्ता यांची बटीक झाली. पुढे यांच्यातच तिकीट वाटप होऊ लागले. पण परिवार वाढत गेल्याने शेतीवरून हिस्से होतात तसे तिकीटावरून रूसवे फुगवे वाढल्याने नाराज भाजप, सेनेत जाऊ लागले.
या मराठा सरंजाम्यांमुळेच महाराष्ट्रात भाजपा वाढली. हेच राज्याराज्यात झाले. पक्ष कोणताही असो, मराठा राजकारण वाढले.
ते संपवणे हा या घडीचा ब्राह्मणांचा मुख्य मुद्दा आहे.
याची कल्पना आल्याने सरंजाम्यांनी संविधान वाचवणे ही आवई उठवली आहे. त्यांना सरंजामशाही वाचवायची आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईली खोलून ब्राह्मण त्यांना शरण आणत आहेत. ओबीसी, दलितांना टाचेखाली ठेवणारे सरंजामी कुत्र्याप्रमाणे शेपूट हलवताना महाराष्ट्र बघतोय. तरी देखील मीडीयाचा एक हिस्सा त्यांच्या बद्दल सहानुभूती उत्पन्न करतोय.कारण असा लाचार मराठा त्यांना हवा आहे. बहुजनांचे राजकारण उभे करण्यापेक्षा ब्राह्मणवादाचा स्वयंघोषित रक्षक असा हा आता लाचार मराठा सत्तेत आला तर ब्राह्मणांना हवे ते राजकारण रेटता येते आणि बिल मराठ्यांवर फाडता येते.
या मराठ्यांच्यात आपला बी टीम म्हणण्य़ाची ताकद नाही. ती कॅसेट ते मायावती आणि प्रकाश आंबेडकरांच्या बाबत वाजवताहेत.
आम आदमी पक्ष पंजाब, गुजरात, गोवा, राजस्थान, उत्तर प्रदेशात हातपाय पसरतोय. महाराष्ट्रातले मराठा राजकारण संपवत आणले आहे. पण आम आदमी पक्ष महाराष्ट्रात बाळसे धरत नाही तोपर्यंत ते जगवले जाईल. एकदा का आप महाराष्ट्रात मोठा पक्ष झाला कि राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे यांचे लाड थांबवले जातील.यांना बनियांकडून पैसा मिळणे बंद होईल. मीडीयातली स्पेस बंद होईल. यांचे वादग्रस्त भूखंड, पैसा ताब्यात घेतला जाईल.
हे इतके उघड राजकारण असून लोकांना कळत नाही हे विशेष. घडून गेल्यावरच अजून पाच वर्षांनी आपल्या लोकांना समजणार आहे ते.
भविष्यात भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्ष हेच शिल्लक राहतील. हे दोन्हीही पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बनवलेले आहेत.
सत्तेत कुणीही आले तरी ब्राह्मणांची ए किंवा बी टीमच येणार.
कांशीराम म्हणत होते कि बहुजनांचे दोनच राष्ट्रीय पक्ष असतील.त्यातला एक बसपा. दुसरा तयार होईल. जेव्हां तुम्हाला बसपाचा कंटाळा येईल तेव्हां त्या पक्षाला सत्ता द्या. बहुजनांच्या ए आणि बी टीम असायला हव्यात. बसपा असेल किंवा लालू, मुलायम यांचा पक्ष असेल, सत्तेत बहुजनच असतील.
आज नेमके उलट झालेले आहे. बहुजनांच्या राजकारणाचा चाणक्य गेल्यापासून ब्राह्मणांनी उचल खाल्ली आहे आणि बसपालाच भाजपाची बी टीम म्हणण्यापर्यंत त्यांचे राजकारण मुजोर झालेले आहे.
जे लोक बसपा, वंचितला बी टीम म्हणतात त्यांची लायकी काय आहे हे आता सांगायाची गरज आहे का ?
ही मांडणी नाही वस्तुस्थिती आहे. गेली पंचेचाळीस वर्षे मांडत आहोत. आम्हाला जातीयवादी ठरवले तर त्याची भीती वाटत नाही. आम्हाला सर्वसमावेशक शिक्क्याची गरज वाटत नाही. आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही.
आम्हाला फक्त सत्य मांडायचे आहे. नागडे उघडे सत्य. ते आहे तसे मांडले तरच बहुजनांचे राजकारण करता येईल.
एकदा का तुम्ही सर्वसमावेशकता, धर्मनिरपेक्षता, संविधान बचाव या नाटकाला बळी पडला कि संपले. तुम्ही भरकटलाच समजा.
मग काय करणार आता ? सर्वसमावेशक व्हायचे कि नागडे उघडे सत्य सांगायचे ?
दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा

