राजकारणक्राईमदेश - विदेश

मराठा गावगुंडांची गावोगावी अल्पसंख्यांक मागासवर्गीय ओबीसी समाजावर दहशत!

तुळशी तालुका माढा जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीसाठी गावातून दोन पॅनल उभे होते डॉक्टर शरद मोरे प्रस्थापितांचे दुसरे होते गावातील सर्व दिन दलित ओबीसी अल्पसंख्यांक यांचे नेतृत्व करणारे प्रमोद वशिकर यांचे सरपंच पदाचे निवडणुकी ओपन मधून होती प्रमोद वसेकर हे ओबीसी असताना ओपन मध्ये उभे राहिले होते

याचा राग त्यांच्या मनात होता त्यांना पाडण्यासाठी सर्व नीती अवलंबली त्यांच्या विरोधातील एक उमेदवार उभा होता त्याने 300 मते खाल्ली ऐंशी मते नोटास गेली तरीसुद्धा प्रमोद वसेकर हा फक्त 58 मताने हरला प्रत्यक्षात तो एक मते खाण्यासाठी उमेदवार उभा होता त्यामुळे प्रस्थापित जिंकले काठावरची ही लढाई एका सामान्य माणसाने लढली त्याला गावातील नाभिक समाजाचे कीर्तनकार आणि हेअर सलून चे दुकान असलेले हरी काशीद निवडणूक अतिशय चुरशीची झाली विजय झाल्यानंतर नाभिक समाजाचे हरी काशीद यांनी साथ दिल्यामुळे प्रस्थापितांना खूपच मते कमी पडली त्यामुळे चिडून जाऊन त्यांनी हरी काशीद यांच्या गावापासून दोन किलोमीटर असलेल्या वस्तीवर जाऊन पन्नास एक मराठा तरुण गुंडांनी त्यांच्या वस्तीवर दगडफेक केली

गाईच्या गोठ्याला आग लावली गाईची वैरण जाळी चारा जळून खाक झाला गोट्यातील गाई सोडून दिल्या भीतीपोटी पळत सुटलेल्या गाई यांचे पाय मुरगळे लचकले त्यामुळे ही गाय त्यांनी 75 हजार रुपये किमतीची 20000 रुपयाला लवकरच विकून टाकली अन्यथा त्या गाईला सांभाळणे कठीण झाले असते वीस पंचवीस हजार रुपयाचे वैरण चारापाणी घोटाळ्याचे नुकसान झाले घरातील घरातील लहान मुलगा आई वडील महिला यांना लाता बुक्क्याचा मार दिला दगड धोंड्याचा मार दिला त्याला त्याला सोडवण्यासाठी शेजारीच असलेल्या अर्धा किलोमीटर वरून परत येऊन काही लोणारे समाजाचे भवन बहुजन समाजातल्या लोकांनी मदत केली आणि हे प्रस्थ थोडं आटोक्यात आलं काशीद यांचे आई-वडील खूप घाबरलेले होते

त्यांनी आज आमच्याकडे ॲट्रॉसिटी कायद्याची मागणी केली दलिताप्रमाणे आम्हाला पण संरक्षण या ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे मिळावे असे त्यांचे म्हणणे होते जखमी झालेल्या ना सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जवळपास कोणी मदत केली नाही हॉस्पिटल मधूनच नॉर्मल कंप्लेंट नोंदण्यात आली आणखी एफ आय आर कुठे दाखल झालेलं नाही असे असताना सुद्धा दहशती पोटी गावातील लोकांनी समेट घडवून आणला आणि प्रकरण मिटवण्यात आले पोलिसांची तशी कोणतीही चौकशी न करता हे प्रकरण मिटवण्यात आले आहे याची मध्यस्थी एसीपी जाधव साहेब आणि टेंभुर्णी चे पोलीस निरीक्षक साहेब यांनी करून हा समेट घडवून आणला या प्रकरणांमध्ये गंभीर जखमी झालेले यांना पाहण्यासाठी अद्याप स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी भेट दिली नसल्याचे सांगितले

महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाच्या निमित्ताने आक्रमक होत आहे ओबीसींना टार्गेट करत आहे त्याचेच हे काशीद कुटुंबीय शिकार झालेले आहेत त्याचप्रमाणे विलास क्षीरसागर तारापूर नाला पंढरपूर या ठिकाणी याला फाशी घेऊन मृत्यूस सामोरे जावे लागले आहे त्याची आत्महत्या की हत्या याची चौकशी झालेली नाहीत त्याचबरोबर बीड मधील सुभाष राऊत जयदत्त अण्णा क्षीरसागर लोळगे यांचे सोन्याचे दुकान अशी बऱ्याच ठिकाणी मोठी हानी करून सार्वजनिक मालमत्तेचे शेकडो कोटीचे नुकसान करून महाराष्ट्रात दहशत निर्माण करण्याचा मराठा समाजाचा चाललेला सपाटा सरकारने वेळीच रोखला पाहिजे

महाराष्ट्राचा मणिपूर होत असल्याचे चित्र दिसत आहे वेळी ज्याला रोखलं पाहिजे त्यांच्यावर कुणी हल्ला खून करण्याचा प्रयत्न असे खटले भरून भरून जेरबंद केले पाहिजे नुसत समझोता करून करून चालणार नाही खोलपर्यंत तपास करून त्यांना शासनही झालं पाहिजे हे अनेक स्तरातून दबक्या आवाजातून अल्पसंख्यांक ओबीसी एससी एसटी वि जे एनटी समाजातील लोक बोलून दाखवत आहेतप्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काशीद कुटुंबीय यांनी केलेली आहे आम्हाला मिटवून घ्यायचे आहे परंतु आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्ही मिटवून घेतलेले आहे परंतु असा अन्याय दुसऱ्या कोणावर होऊ नये अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली या निमित्ताने राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष शंकराव लिंगे यांनी हरी काशीद यांच्या घरी जाऊन त्यांचे आई-वडील पत्नी मुलं शेजारचे लोणारे समाजाचे मारुती खाडे काशीद यांची दोन मुले यांची समक्ष भेट घेऊन त्यांचे मनोगत जाणून घेतले

त्यांना दिवाळीचे फराळ साहित्य देऊन धीर दिला त्याचबरोबर त्यांच्या पॅनलचे प्रमोद वसेकर यांच्याशीही फोनवर चर्चा केली यातूनही एक जाणवलं की प्रस्थापितांची किती दहशत असते एवढा प्राण घातक हल्ला करून एवढं मोठं नुकसान करून सुद्धा ही लोकं कॉम्प्रमाईज करण्यासाठी तयार कशी झाली असतील कानोसा घेतला असता समजलं की गावागावात त्यांचे नातेवाईक नाभिक समाजाची कटिंग सलून दुकाने आहेत ती सर्व प्रस्थापितांच्या अधिपत्याखाली ग्रामपंचायत च्या जागेत किंवा त्यांच्या पाहुणेरावळे यांच्या शॉपिंग सेंटर मध्ये या नाभिक समाजाची दुकान आहेत त्या दुकानांमध्ये त्यांनी 20- 20 लाख रुपयांचे फर्निचर केले आहे जर केस नाही माघारी घेतली तर या न त्या कारणाने त्यांचे नातेवाईक यांना आज ना उद्या दुकाने खाली करावे लागतील आणि मग पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल या भीतीपोटी या काशीद कुटुंबीयांनी केस माघारी घेणे केस न करणे किंवा त्याच्याविरुद्ध आवाज न उठवणे अशी भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे

याबद्दल आता सरकारने सीआयडीमार्फत चौकशी करावी किंवा न्यायालयीन चौकशी करावी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या विरुद्ध काय कट शिजले आहेत आणि त्यांना किती त्रास यातना भोगावे लागत आहेत अतिशय दुर्दैवी घटना आहे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे महाराष्ट्राचा फुले शाहूवा आंबेडकरांच्या वारसा विचार भाईचारा मानवता धर्म राज्यात दुरावत चाललेला आहे याकडे शासनाने दुर्लक्ष करू नये अन्यथा मोठा अगडबंब महाराष्ट्राचा मणिपूर होण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याचा प्रचार प्रसार होऊ नये एवढीच दक्षता सरकारने घ्यावी असं मला सरकारला सांगावसं वाटतं

त्यासाठी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्यामध्ये या अल्पसंख्यांक एससी एसटी ओबीसी अल्पसंख्यांक यांना संरक्षण देणे त्यासाठीच्या ओबीसी ना ॲट्रॉसिटी कायद्याची निर्मिती करणे इत्यादी निर्णय तातडीने घ्यावे लागतील अन्यथा सर्व हाताबाहेर गेल्यानंतर उपाययोजना करण्यात काहीच अर्थ नाही काशीद यांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी बापूसाहेब भंडारे जिल्हा उपाध्यक्ष समता परिषद आमचे माजी सरपंच पती गणेश वसेकर उपस्थित होते शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 शून्य एक

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button