राजकारण

जागो धनगर, माळी, ओबीसी बहुजन जागो जागते रहो सावधान!!

!! जागो धनगर, माळी, ओबीसी बहुजन जागो जागते रहो सावधान!!

बंधू भगिनींनो, मातांनो, सज्जनांनो.
नमस्कार.
बारामती लोकसभा मतदार संघातून दौंड चे सुपुत्र ही निवडणूक लढवणार आहेत.
प्रस्थापीत व्यवस्थेच्या विरोधातील ही ओबीसी बहुजणांची लढत आहे.
ओबीसी आरक्षणाचे रक्षण करण्यात महाराष्ट्रातील ढोंगी पुढारी, प्रस्थापित वर्गाच्या दादागिरीला घाबरून शेपूट घालून मूग गिळून गप्प बसले. यात सर्वपक्षीय आमदार खासदार मंत्री सर्वच्या सर्वं, ओबीसी आरक्षणाचे मारेकरी ठरले.
महाभारतात महाराणी द्रौपदीचे भर दरबारात मोठमोठ्या ब्रम्हास्त्र धारी वीर योध्याचे समोर वस्त्रहरण झाले होते. अगदी तसेच महाराष्ट्रातील ६ कोटी ७५लाख ओबीसिंच्या हक्काचे वस्त्रहरण झालेले आहे.
दंडेलशाही, जोर जबरदस्ती, हुकूमत, आणि दडपशाहीने राज्य चालू आहे.
साडेपाच हजार वर्षांपूर्वी जसा कौरवांचा निप्पात करून धर्माचे राज्य पुनःरस्थापित झाले होते. अगदी तसेच माजलेल्या व्यवस्थेला वठनिवार आणण्यासाठी आत्ता आरक्षण वाल्याच मत आरक्षण वाल्याला हीच आपली प्रचाराची लाइन.
आपल्यातील चाटुकार, विक्राऊ, भुललेले फसलेले कार्यकर्ते, अंधभक्त यांना बाजूला ठेऊन संपूर्ण मतदार संघातील ओबीसी बहुजणांनी एकच निर्णय करा की महेश आण्णा भागवत यांना निवडून आणा.
ओबीसी बहुजन राजकारणाची पायाभरणी चालू झालेली आहे. ही फाईट देशातील हेवीवेट फाईट आहे.
इथ तीन शक्तींची इज्जत पणाला लागलेली आहे.
(१) ओबीसी ::- या मतदार संघात एकवीस लाख मतदारंपैकी नऊ लाख ओबीसी, सहा लाख मागासवर्गीर, व सहा लाख प्रस्थापित आहेत.
उघडा डोळे बघा नीट.
या पंधरा लाख मतदारांची इज्जत पणाला लागलेली आहे.
(2)मोदी, शहा, फडणवीस, अजितदादा यांचीभी इज्जत पणाला लागलेली आहे.
भला मोठा गवगवा करून दादांना यांनी घेतला खर पण हा बार १००%फुसका निघणार आहे.
(3) पवारसाहेब ::-जाणते राजे, महाराष्ट्राचा मानबिंदू, भल्याभाल्या नां धोबीपछाड देणारा अजस्त्र सिंह आज जाळ्यात आहे, जागे झालेल्या ओबीसिंच्या.
जर ओबीसी मतदार खरच जागृत झालेला असेल तर, महेश आण्णा सारख्या चानाक्ष, बुद्धीवादी, चरित्रशील व्यासंगी, प्रामाणिक,, स्वाभिमानी तरुणाला आपला मोहरा बनवून लोकसभेत पाठवतील.
सुवर्णमोहोत्सवी लोकसभेतील मतदार अजूनही प्रस्थापित व्यवस्थेच्या षडयंत्रा ला कंटाळलेला, त्रासलेला, ह्या व्यवस्थेचा ऊबग जर आलेला नसेल तर मग तुम्हांला या जगात परमेश्वर सुद्धा वाचऊ शकणार नाही.
एवढ बिभस्त राजकारण अनुभवून ही पुन्हा त्याच वाटेने मतदार जाणार असेल तर ह्या लोकशाहीचे बारा नाही तेरा वाजलेच म्हणून समाजा.
यदाकदाचित ही भारतीय लोकसभेची शेवटचीच निवडणूक असू शकते. म्हणून मोदी शहा भाजप तर घरी बसवावेच लागतील पण आदरणीय साहेबांना सुद्धा आत्ता भविष्यकालीन चिंतनासाठी जबरदस्तीचा विश्राम द्यावाच लागेल.
मला काही कळत नाही या मतदार संघातील मतदारांचे, अहो साहेबांकडून किती काम करुन घेणार आहात तुम्ही. आत्ता जरा त्यांना शांत राहू द्या बर. उगाच सारखी कटकट लावता त्यांचे मागे.
मतदार बंधू भगिनींनो आपणांसर्वांना एकच विनंती आहे. महेशराव भागवतांची उमेदवारी ही आपल्या सर्वांच्या अस्मितेची, भाव भावनांची, न्याय हक्काची, अधिकाराची लढाई आहे असे समजूनच ही लढाई लढा. अत्यंत निकराच्या या लढाईत निश्चित “”आण्णा “”च निवडून आण्णा व भारतीय जनतेला बारामतीच्या मतदारांची प्रगल्भता दाखवा हीच नम्र विनंती करतो आणि थांबतो.
जय हिंद.जय महाराष्ट्र.
जय ओबीसी जय भीम.
हा लेख आवडल्यास सर्वत्र प्रसारित करावा.
कळावे.
आपला सर्वांचा नम्र सेवक.


पांडुरंग मेरगळ.
9822022996,8329532711.

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ मेसेज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button