💧 उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास अखेर सुरुवात — दिलासा की श्रेयवाद?

🔴 ब्रेकिंग न्यूज | सोलापूर जिल्हा
💧 उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास अखेर सुरुवात — दिलासा की श्रेयवाद?
सोलापूर : वाढत्या उन्हामुळे कोरडी पडलेली भीमा नदी आता पुन्हा वाहू लागणार आहे. उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यामुळे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
👉 पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.
👉 मात्र, गेल्या दोन दिवसांपासून खासदार प्रणिती ताई शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यांच्या प्रयत्नामुळेच पाणी सोडण्यात आल्याचा दावा देखील समोर येत आहे.
⚡ मग नेमकं पाणी कुणाच्या प्रयत्नाने सुटलं?
👉 पालकमंत्र्यांचा पाठपुरावा?
👉 खासदारांच्या पत्राचा प्रभाव?
👉 की जिल्हा नियोजन मंडळ (DPDC) स्तरावरील निर्णय?
❗ की ही फक्त श्रेयवादाची लढाई?
📌 वस्तुस्थिती अशी की, उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा (डेड स्टोरेज 30-40%) शिल्लक असतानाही कालव्याचे पाणी वेळेवर का सोडले गेले नाही, हा मोठा प्रश्न आहे.
📌 पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याआधीच निर्णय होणे अपेक्षित होते.
💬 जनतेची भूमिका स्पष्ट आहे —
“पाणी कोणाच्या श्रेयाने आले यापेक्षा, वेळेवर आले का हे महत्त्वाचे!”
आज मात्र एक गोष्ट निश्चित —
💧 पाणी आलं… आणि
😊 सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं!
📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती TV
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📲 बातमी लाईक 👍 करा | शेअर 🔁 करा | सबस्क्राईब 🔔 करा
📞 संपर्क: 7387377801
#Solapur #UjaniDam #BhimaRiver #WaterPolitics #BreakingNews #Maharashtra #PranitiShinde #JaiKumarGore #WaterRelief #ShivkrantiTV #DeenbandhuNews




