महात्मा फुले यांचा निर्णय योग्य होता

महात्मा फुले यांचा निर्णय योग्य होता
तात्कालिक परिस्थितीमध्ये महात्मा फुले यांचा निर्णय योग्य होता. मराठा धनगर तेली माळी सामाजिक स्थिती सारखीच होती. 1960 पासून फार मोठा बदल झाला. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सर्व साखर कारखाने, सहकारी बँका संस्था, शाळा, कॉलेज, शिक्षणसंस्था, गावातील जुनी मंदिराचे ट्रस्ट, मंदिराच्या जमिनी, ग्रामपंचायत पासून
आमदार खासदार, केंद्रीय मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, कृषिमंत्री, राष्ट्रपती, उपपंतप्रधान सर्व राजकीय पद, मुख्यमंत्री पासून सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदापर्यंत पर्यंत वर्चस्व राहिले.
पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येक तालुक्याला दोन सूतगिरण्या दिल्या, सर्वे केल्यानंतर माहित पडेल 90% सूतगिरण्या मराठा समाजाला दिल्या. अनेकाने नुसते शेअर गोळा केले. कमी भावात मोफत जमीन घेतल्या. सूतगिरण्या चालूच केल्या नाहीत त्या शेत जमिनीचे काय झालं कळत नाही. सूतगिरणी, दूध डेऱ्या, सर्वच तिजोरीच्या चाव्या एकाच मराठा समाजाकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी सरकारने दिल्या. बाकी 85 टक्के समाजाची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे मराठा समाज फॉरवर्ड कम्युनिटी जमीनदार, जागीरदार, वतनदार, पाटील, देशमुख झाला राज्यकर्ते झाले. धनगर माळी आहे तसाच राहिला. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले त्यावेळेला अजिबात चुकले नाहीत. त्यानंतर आलेले मराठा पुढारी चुकलेले आहेत. त्यामुळे ही दरी निर्माण झालेली आहे. सामाजिक समतोल बिघडलेला आहे. आज महात्मा फुले असते तर मराठा पेक्षा ब्राह्मण बरा म्हटले असते. कारण तो मराठा आज धनदांडगा समाज झाला आहे. त्याच्या जोरावर ओबीसी एससी एसटी अल्पसंख्यांक वर अन्याय करत आहे. अशी सर्वसाधारण सामान्य माणसं सुद्धा बोलू लागली आहेत. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा.
सरकारी तिजोरीचे वाटप जातनिहाय जनगणना करून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी प्रमाणे करावे ही काळाची गरज आहे.
शिवक्रांती टीवी दिनबंधूंनी व संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा




