बलीपूजन कसे करणार!

बलीपूजन कसे करणार!
प्रिय ओबीसी बहुजनांनो!
आज बलिप्रतिपदा म्हणजे आपल्या बळीराजाचे पुनरागमन!
१) त्यानिमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देऊन बळीराजाचे स्वागत करु या.
२) प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी सुगंधीत उटण्यांनी आंघोळ करून बलिपूजन करायचे आहे. ३) सगळ्यांनी नवे अथवा स्वच्छ कपडे घातले पाहिजे. अंगणात शेणाचा सडा घालून सुंदर रांगोळी काढायची आहे.
४) मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला कणीस असलेली दोन तृणधान्याची तोटे उभे करायचे आहेत. ताज्या उसाचे तोटे लावले तरी चालतील.
५) घरातील बैठक रुममध्ये नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात एका मोठ्या पाटावर छोटी धान्याची रास तयार करा.
६) राशीच्या आजूबाजूला कडधान्याची छोटे छोटे भुगे तयार करायचे आहे. मुख्य धान्याच्या राशीवर बाजरी, गहू, ज्वारी यासारख्या तृणधान्याची कणसे लावायची आहेत.
७) बाजूला छोट्या पाटावर शेणाचा बळीराजा बनवून तेथे अगरबत्त्या लावायच्या आहेत. ८) घरातील सर्व आबाल-वृद्धांनी तेथे बसून बळीराजाचे स्मरण करायचे आहे. तात्यासाहेब महात्मा फुले यांनी लिहिलेल्या अखंडातून बळीराजाची स्तुती करणाऱ्या काही ओळी लयबद्ध बोलायची आहेत.
९) तात्यासाहेब महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय ग्रंथातील कोणतेही एक प्रकरण सामुहिकपणे वाचणे.
१०) सर्वात शेवटी सर्व उपस्थितांना साखर अथवा गुळ देऊन तोंड गोड करायचे आहे.
११) पूजन पुर्ण झाल्यावर तेथील सर्व धान्य व कणसे एकत्र करुन ते मोठ्या आदराने मोलमजुरी करणाऱ्या स्त्री-पुरुषास विनम्रपणे अर्पण करायचे आहे. १२) त्यांना अर्पण करण्या आधी मजूराच्या कपाळावर कुंकूवाचा टिळा लावून त्याला नम्रपणे अभिवादन करायचे आहे.
१३) त्यानंतर जवळपासच्या गोठ्यात जाऊन बैल, म्हैस, गाय आदी प्राण्यांना प्रेमाने दिवा ओवाळून त्यांना पुरणपोळी खाऊ घालायची आहे
कारण ह्याच प्राण्यांनी अहोरात्र कष्ट करून कृषी संस्कृतीचा विकास केला असून बळीच्या राज्यात संपन्नता व भरभराट निर्माण केली आहे. ते कृषी संस्कृतीचे महान उपनायक आहेत
१४) अशाप्रकारे बलीपूजन झाल्यावर सर्वांनी प्रसन्न मनाने आपापल्या नियमित कामाला सुरुवात करायची आहे….
१५) गावात कुठेही सामुदायिक बलीपूजनाचा कार्यक्रम असेल तर तेथे जाऊन त्या कार्यक्रमात सहभागी व्हा व शक्य झाल्यास वैचारिक प्रबोधनपर दोन शब्द बोला.
१६) या कार्यक्रमात बळीराजा वर व इतर महापुरूषांवर लिहीलेल्या पुस्तकाचे वाटप करा.
१७) दिवसभरात जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा “बळीराजा ते शिवाजी राजा” सांस्कृतिक क्रांतीचे महानायक हे पुस्तक अवश्य वाचा व इतरांनाही वाचायला द्या
बलीपूजन करतांना काय करु नये..
1) बलीपूजन करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला पुजारी म्हणून नियुक्त करु नये.
2) बलीदेव व बलीजन यांच्यातील नाते देव-भक्त स्वरुपाचे नाही, त्यामुळे या दोघात मध्यस्थी करणाऱ्या दलाल पुजाऱ्याची गरज नाही.
3) खान्देशची गणराज्ञी कानबाई मातेच्या रोट-महोत्सवात ब्राह्मण किंवा पुजारी निषिद्ध मानला जातो, याची आठवण ठेवावी.
4) आपल्या सिंधू-हिंदू संस्कृतीत ब्राह्मण-पुजाऱ्याला अ-पवित्र मानले जाते.
5) बलीपूजन करतांना कोणतीही मुर्ती अथवा कोणाचाही फोटो लावू नका. कारण आपला सिंधू-हिंदू धर्म निसर्ग पूजक व पशू-पुजक आहे.
सर्वांना बलीप्रतिपदेच्या शुभेच्छा!
ईडा पीडा आओ!
बळीचं राज्य येवो!!
धन्यवाद, जयजोती जयभीम
– प्रा श्रावण देवरे
संपर्कः 88301 27270

