माळी समाज परिचय संमेलन सुधारणा कृती समिती

*(माळी समाज परिचय संमेलन सुधारणा कृती समिती)*
* समाज बांधव सहमत असतील त्यांनी गृप जॉईन करून कृती समितीचे सदस्य व्हायचं असेल त्यांनीच गृप जॉईन करावा गृप मधे ऍड झाल्या नंतर सर्वांनी आप आपला परिचय द्यावा आपल्या सूचना मार्गदर्शनाचे स्वागत!*
*माळी समाजाचा प्रतेक घटक हा श्री संत सावता माळी संघटन परिवाराचा अविभाज्यभाग समजून समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता श्री संत सावता माळी संघटन महाराष्ट्र चे माध्यमातून कार्य करीत आहोत*
*कुणी ही व्यक्ती विशेष किंवा कोणताही माळी समाज परिचय मेळावा यांना आमचा व्यक्तिगत विरोध नाही*
*फक्त वैचारिक विरोध आहे तो सिस्टीम ला आज ज्याप्रमाणे परिचय संमेलनाची वाटचाल सुरू आहे ती समाजातील एका वर्गासाठी अत्यंत चुकीची व धोकादायक आहे त्यामध्ये अमुलाग्र बदल घडणे आवश्यक आहे काळानुरूप परिचय संमेलनामध्ये सुधारणा काळाची गरज आहे.*
*कोणते बदल आवश्यक आहे*
*१) शाखा भेद रहित एक संध समाज निर्मिती साठी सर्व प्रथम परिचय संमेलनाचे पुस्तकांमध्ये पोट जातीचा उल्लेख टाळावा*
*२) शेती च कॉलम नसावा*
*३)अपेक्षा हा कॉलम नसावा*
*४) पालकांचा मोबाईल नंबर संपर्क क्रमांक नसावा असल्यास*
*५) युवक युवतींचे पालकांनी सोयरिक जुळविताना फोन वर कोण्याच प्रकारची माहिती देऊ नये मोबाईल फोन फक्त संपर्काचे माध्यम म्हणून वापरावे**
*६) परिचय संमेलनाचे माध्यमातून मिळणारा पैसा हा सामाजिक कार्यासाठी वापरला जावा*
*समाज संघटित करण्यासाठी पाऊल उचलणाऱ्या सामाजिक सुधारणेचे स्वागत
करणाऱ्या कोणत्याही परिचय संमेलनाना आमच कायम सहकार्य व समर्थन राहील!*
*माळी समाजामध्ये युवक युवती परिचय संमेलन यांचे प्रस्त वाढल्याचे संपूर्ण महाराष्ट्र मधे अलीकडच्या काळामध्ये दिसत आहे जिल्हा जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये अशा मेळाव्यांची संख्या वाढतच आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु असे मेळावे सामाजिक एकात्मते साठी किती महत्त्वाचे, व खरोखर मेळाव्याचा उपयोग मध्यमवर्गीय व्यावसायिक अल्पभूधारक शेतकरी बांधवांना कितपत होतो?*
*परिचय संमेलनाचे आयोजन मुळे समाजातील श्रीमंत उच्च शिक्षित नोकरदार वर्गाला लाभ होताना दिसतो मात्र समाजातील ग्रामीण भागात राहणारा शेतकरी शेतकरी शेतमजूर अल्पभूधारक व्यावसायिक मुलांना डावलण्याचं काम या माध्यमातून होत आहे आज ग्रामीण विभागात अविवाहित मुलांची संख्या लक्षणीय आहे अविवाहित मुलांची वाढत चाललेली संख्या ही सामाजिक संतुलन बिघडवू पाहते आहे समाजातील अनेक युवा व्यसनाधीनतेकडे वळले आहेत याला जबाबदार परिचय संमेलने असल्याचे अनेक पालक ओरडुन सांगतात*
*पूर्वी सणासुदीला लग्न समारंभ नातेवाईकांच्या गाठीभेटी एकमेकांच्या सुखदुःखात सहभाग यानिमित्ताने समाज येकत्र येत होता त्यामधून आपल्या उपवर मुला-मुलींसाठी विवाहयोग्य जीवनसाथी यांचा शोध घेतला जायचा लग्न समारंभ मधे लक्ष ठेऊन असलेले चाणाक्ष पालक त्या कुटुंबा कडे जाऊन आपल्या मुला मुलींसाठी हात मागायचे आता मात्र परिचय पुस्तिकेच्या माध्यमातून सर्व विवाहयोग्य उपवर युवतींचे कॉन्टॅक्ट नंबर यांचे सविस्तर माहिती घर बसल्या आयती मिळत असल्याने लोकांनी आपले भाऊबंद नातेवाईक या सर्वांना दूर केले त्यांना कुठल्याच नातेवाईकांची गरज उरली नाही यामधून एक सामाजिक विषमता निर्माण झाली आणि ही परिस्थिती समाजासाठी अत्यंत घातक आहे*
*[*सामाजिक सुधारणा करत समाजातील मध्यमवर्गीय , व्यावसायिक अल्प भुदारक शेतकरी बांधवांच्या हितासाठी माळी समाज युवक युवती परिचय मेळाव्यामधे पुढील बाबींचा समावेश करून पुस्तिकेच स्वरूप पुढीप्रमाणे असावे]*
*१)उपवर युवक युवतींचे नाव*
*२) जन्म तारीख*
*३)शिक्षण*
*४) व्यवसाय*
*५)भाऊ बहिण*
*६) मामाचे नावं*
*परिचय संमेलनाचे आयोजन आयोजनाचे दिवशी समाज बांधवांचा अमूल्य वेळ वाचावा याकरिता सर्व सत्कार सोहळे रद्द करून शब्द सुमनाने सर्वांचे स्वागत करावे*
*समाज संघटन काळाची गरज ओळखून एक किंवा दोन प्रखर वक्त्याला बोलण्याची संधी देऊन उर्वरित सर्व वेळ युवक युवतींचे परीचायासाठी उपलब्ध करून द्यावा*
*संघटित सशक्त माळी समाजाच्या निर्मितीसाठी समाजातील गोरगरीब शेतकरी बांधवांच्या हितासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी*
*परिचय संमेलनाचे पुस्तिकेत अपेक्षित बदल करण्यासाठी श्री संत सावता माळी संघटन महाराष्ट्र राज्य पुढाकार घेऊन सर्व आयोजकांना भेटी देणार व पुस्तिकेत बदल करण्याची विनंती करणार!*
*जय सावता महाराज*
*जय जोती!*
*जय क्रांती!!*
*एक पाऊल सामाजिक सुधारणेकडे!*
दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा कमेंट करा


Your address and district and state or contact number please share