सोशल

*मरीआई भटक्या समाजाची करूण कहाणी क्रमश:1 जमिनी हकीकत सत्यशोधक शंकराव लिंगे * सर्वांनी हा लेख वाचलाच पाहिजे!

*मरीआई भटक्या समाजाची करूण कहाणी क्रमश:1 जमिनी हकीकत सत्यशोधक शंकराव लिंगे
*
सर्वांनी हा लेख वाचलाच पाहिजे!

कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर अठरा विश्व दारिद्र्य गरिबी वंचित पीडित समाज यांना योग्य मार्गदर्शन नाही, शिक्षण नाही,सरकारी सुविधांचा लाभ नाही, घरदार जागा जमीन व्यापार उद्योग यापैकी काहीही नाही कुटुंब नियोजन नाही, एका एका जोडप्यांना 22 मुलं झालेले आहेत. आता थोडं कळू लागला आहे त्यामुळे चार पाच दहा पर्यंत प्रमाण आला आहे त्यांचे रेशन कार्ड वेगळे होत नाही. ऑनलाईन करण्याची माहिती नाही. त्यामुळे मोफत रेशनचा या समाजाला फायदा होत नाही.अंत्योदय रेशन कार्ड मध्ये 2 माणसालाही 35 किलो आणि 22 माणसालाही 35 किलो मिळते. तेही कधी कधी मिळत नाही. अशी या समाजाची करूण कहाणी आहे. यांचे पूर्वज महादेव कोळी एसटी आदिवासी असले तरी पुराव्या अभावी त्यांना दाखला मिळत नाही. महाराष्ट्र सरकारने NT-B मध्ये त्यांना ठेवले आहे.तोही दाखला पुराव्या अभावी मिळत नाही. शिक्षणाच्या सवलती,नोकरीच्या सवलती मिळत नसल्यामुळे यांच्या मुलांनी शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. या वंचित समाजापेक्षा जमीनदार मराठा कुणबी यांना सरकार ताबडतोब तीन-तीन न्याय दिवसाच्या कमिटी नेमून दाखले देत आहे लाभ देत आहे. मग या वंचित समाजाला सामाजिक शैक्षणिक,आर्थिक ,राजकीय लाभापासून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले तरी यांना वंचित कोणी आणि का ठेवला आहे?
हा संशोधनाचा आणि सरकारचा ना करते पणाचा विषय.

‘जिसकी लाठी उसकी भैस’ गुंडशाही झुंडशाही ठोकशाही मागेल ते नियम रात्रीत केल्या जातात हम करे सो कायदा नियमाने सरकार वागत आहे. यांच्याच वाटणीचं यांच्याच ताटातील ओबीसी आरक्षण मराठा जमीनदार मागत आहे या समाजाच्या नावावर पिढ्यानपिढ्या आजपर्यंत एक फूट जागा नाही आणि त्यांच्या बरोबरीने मराठा समाज आरक्षण मागतो आणि मुख्यमंत्री त्याला रातोरात जीआर काढून देतो याचा सर्व समाज बांधवांनी विचार केलाच पाहिजे असे भरपूर समाज आहेत 42 समाज महाराष्ट्रामध्ये आहेत सरकारने त्वरित अशा भटक्या समाजासाठी स्वतंत्र समिती नेमून भटक्या वंचित समाजाच्या सर्वे करून त्यांना अन्न वस्त्र निवारा मोफत दिलाच पाहिजे व्यवसाय, शिक्षण, आरोग्य अशा सर्व सोयीने युक्त वसाहत उभारावी.शासनाच्या सर्व सोयी सुविधा सवलत म्हणून वेगळी आर्थिक तरतूद करावी. अशा वंचित समाजाचा शोध घेण्याचं काम महाराष्ट्रभर सध्या चालू आहे सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने हे काम हाती घेण्यात आलेला आहे अगोदर तळागाळातल्या माणसांना न्याय दिला पाहिजे सरकार देत नसेल तर आम्ही तो मिळवून देणार असल्याचे सत्यशोधक शंकरावलिंगे यांनी याप्रसंगी पाहणी करून सांगितले आहे.
🟢🟢🟢🟢
🔶🔶🔶🔶🔴🔴🔴🔴
कडलास सांगोला

आरक्षणाची गरज कोणास आहे? जमीनदार कुणबींना की मरीआई कोळी भटक्यांना..?
प्रत्यक्ष पाहणी करून मुलाखत
शंकरराव लिंगे यांचा रिपोर्ट..

कडलास,तालुका सांगोला,जि सोलापूर येथे 1955 साली मरीआई कोळी भटक्या जमाती मधील काही कुटुंब या ठिकाणी गावाशेजारी गावठाण जागेत राहत होते. त्यांचे पूर्वज कर्नाटक आंध्र बॉर्डरवरील घनदाट जंगलामध्ये एका नदीच्या काठी राहून मासेमारीचा धंदा करत होते.ते शिवभक्त असल्यामुळे त्यांना महादेव कोळी म्हटले जात होते.नदीला नेहमी पूर येत होता. पुरामध्ये घर संसार वाहून जात होता. त्यातच एका त्यांच्या पूर्वजांना स्वप्नामध्ये मरीआई देवी आली आणि त्या देवीने सांगितले नदीमध्ये गोल गोटे दगड आहेत ते घेऊन त्यांना आपण टोपल्यात ठेवून सिंदूर हळदी कुंकू लावून गावोगावी पश्चिम दिशेला जाऊन वाजत गाजत माझा तुम्ही प्रसार करा. ज्या गावातील लोक तुम्हाला दानधर्म देतील त्यावर तुमची उपजीविका चांगल्या प्रकारे होईल.

आपण इथून जावे असे सांगितले जाते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आंध्रा कर्नाटक सीमेलगत असलेल्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मंद्रूप, दक्षिण सोलापूर,पेनुर,मोहोळ, सांगोला, कडलास, महूद सांगोला शहर मंगळवेढा शहर, फुफुसंगी मंगळवेढा इत्यादी ठिकाणी हा समाज मोठ्या प्रमाणात गावाच्या बाहेर गावठाण जागेमध्ये किंवा सध्या काही समूहांनी एकत्र येऊन राहण्यासाठी दोन एकर तीन एकर जमीन घेऊन त्या ठिकाणी राहतात. या गावांमधून पश्चिमेकडे दिशेस पश्चिम महाराष्ट्रातील आणि कोकणामध्ये देवीला टोपल्यात किंवा कपाटात ठेवून महिला डोक्यावर घेतात.पाठीवर लहान मुल झोळी करून बांधलेले असतात.दोन्ही हाताने ढोलकी सारखं गुबू गुबू आवाज येणारे वाद्य वाजवतात.पुरुष मंडळी मरीआई कडकलक्ष्मीचा वेश कमरेपासून खाली रंगीबेरंगी कपड्याचे तुकडे जोडलेले धारण केला जातो. मोठ्या चाबकाने स्वतःला बडवून घेतले जाते.

त्यानंतर टोकदार दाबनाने दंडाला टोचून घेऊन रक्तबंबाळ केले जाते रक्त बंद होण्यासाठी महिला रक्तबंबाळ झालेला दंड हात तोंडात धरतात दुसऱ्या हाताने पैसे मागण्याचा कार्यक्रम चालू होतो आणि नंतर देवीसाठी अन्नदान, पैसे दान करण्याची मागणी केली जाते. जोरजराने ओरडून आपण दान करा देवी आपणास आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवील साथीचा रोग तुम्हाला होणार नाही असा आशीर्वाद देतात.नोव्हेंबर पासून जून पर्यंत सहा महिने गावोगावी भटकंती करून मिळालेले अन्नधान्य कपडे घेऊन पावसाळा चालू झाला की परत सोलापूर जिल्ह्यातील मूळ ठिकाणी येतात .सहा महिने धंदा व्यवसाय नसल्यामुळे घरी बसून खातात. कमी पडल्यास त्यांच्या नातेवाईकाकडून व्याजाने उदार उसने घेऊन उपजीविका करतात. वर्षातून एकदा श्रावण महिन्यात प्रत्येक गावात समाजाची जातपंचाची मीटिंग होते त्यामध्ये आर्थिक देणे घेणे सामाजिक भांडण पाहुणे मंडळीचे नवरा बायकोचे वाद याचा न्याय निवाडा समाज पंच दिल तो निर्णय मान्य करून श्रावण महिन्यात केला जातो

त्यांचे राहणीमान आदिवासींसारखे आहे. बहुतांश अशिक्षित आहेत. विकासापासून कोसो दूर आहेत स्वतःची जागा, जमीन, शिक्षण दाखला पुरावा मिळत नसल्यामुळे त्यांना कोणत्याच आरक्षणाचा लाभ मिळत नाही.अशा रीतीने कडलास गावामध्ये कडलास गावठाणा मध्ये राहणारा हा समाज यांची बोलीभाषा तेलगू आहे. गावातील लोकांना त्यांचे राहणीमान,बोलणे चालणे गरिबीमुळे अपुऱ्या कपड्यात फिरणे याचा गावातील लोकांना त्रास होऊ लागला. म्हणून गेल्या सात आठ वर्षापासून कडलासगावापासून दोन किलोमीटर अंतरावर सरकारी जागेमध्ये राहण्यासाठी ठेवले आणि त्या जागेवर तहसीलदाराचे नियंत्रण ठेवले.आज या ठिकाणी सुमारे दीडशे घर आहेत.काही लोकांना घरकुल मिळाले आहे. लोकांना जागा नावावर नसल्यामुळे घरकुल piमिळाले नाही.

काही लोक झोपडी मध्ये राहतात किंवा लोकांनी स्वतः खर्च करून पत्रे मारून राहण्याची व्यवस्था केली आहे.कडलास ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले आहे. नळ पाणीपुरवठा केले आहे.काँक्रीटचे रस्ते झोपड पट्टी अंतर्गत केले आह गटारीची योजना राबवली नाही त्यामुळे धुणी भांडी अंघोळीच सांडपाणी दारातच साठून राहते. कोणत्याही तंत्रज्ञान न वापरून तयार केलेली पत्र्यांची घरे पावसाळ्यात सर्व घर गळते.घरातील सर्व संसार उपयोगी सामान भिजून जाते.उन्हाळ्यात पत्रे गरम होतात, थंडीत गार पडतात,पावसाळ्यात गळतात, वारा आले की उडून जाण्याची भीती असते. काही समाज ताडपत्री कापडाच्या काळाच्या कुडाच्या तंसाच्या झोपडी मध्ये राहतात आता पहिला च पाऊस सांगोला तालुक्यात पडला.

त्यावेळी रस्ते घराच्या उंबऱ्यापासून उंच असल्यामुळे घरासमोरील सांडलेले सांडपाणी आणि पावसाचे पाणी सर्व झोपड्यांमध्ये आणि घरांमध्ये शिरले. अशा नरक यातना सहन करत जीव मुठीत घेऊन हा समाज रात्रभर झोपण्यासाठी निवारा नसल्यामुळे दलदल झाल्यामुळे रात्र जागून काढतो.अशा परिस्थितीमध्ये रोगराईचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. तहसीलदाराने प्रत्येक रहिवाशी घरट्यांना सनद त्यांच्या नावाने करून द्यावी गटार योजना त्वरित करावी सर्वांना घरकुल त्वरित मिळावे अन्न वस्त्र निवारा त्वरित मोफत द्यावा अशी सर्वांची मागणी आहे ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार निवडणुकीच्या वेळी येतात आश्वासन देतात आणि हा गरीब वंचित समाज आपलं काही करू शकत नाही असे गृहीत धरून नंतर पाच वर्षे अनेक कर्ण दाखवून वेळ काढू पणा करतात कोणतेही काम करत नाहीत असे सर्व नागरिकांचे म्हणणे होत मराठा समाजासाठी या वंचिताची दखल सरकार घेईल का असे प्रश्न मरीआई कोळी समाजाने विचारले

पुढील रिपोर्ट मध्ये सांगोला शहरातील मरीआई समाजाचा ग्राउंड रिपोर्ट दिला जाईल

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा
🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button