सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 34

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 34

तदनंतर त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. अध्यापन कार्य करत असताना राष्ट्रीय क्रांतिकारकांशी संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना नोकरी सोडावी लागली. दरम्यान, कराड येथील डुबल आळीतील बाळनाथ बुवांचा मठ या सुमारास तरुण कार्यकर्त्यांचे केंद्र बनले होते. या मठात कळंबे यांचा संचार-वावर असे.

बेळगाव येथील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेला ते उपस्थित राहिले. या परिषदेत त्यांनी प्रभावी भाषण केले. येथून पुढे ते सत्यशोधक चळवळीकडे आणि स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षिले गेले. पुढे युवकांमध्ये सत्यशोधकी विचारांचे दृढीकरण व्हावे म्हणून त्यांनी डुबल आळीतील एक मोठा वाडा भाड्याने घेऊन ‘विजयाश्रम’ नावाची संस्था सुरू केली. विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांचे मूलगामी मानव मुक्तीचे तत्त्वज्ञान विशद केले जात असे.

सत्यशोधक तत्त्वज्ञान समाजात रुजवायचे असेल, तर शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादले जात असे. या आश्रमात यशवंतराव चव्हाणांचे एक बंधू गणपतराव चव्हाणही राहत असत. गणपतराव, शालेय विद्यार्थी यशवंतराव चव्हाण यांच्यासमवेत सत्यशोधकी चर्चा करत असत. यशवंतराव सत्यशोधकी विचार समजून घेत असत, प्रसंगी शंकाही उपस्थित करत असत. प्रभावित होत असत.

भाऊसाहेब कळंबे यांनी सत्यशोधक ‘जलशा’साठी संवादही लिहून दिले. गद्य-पद्य लेखनही केले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाच्या संशयाने पोलिसांनी त्यांच्या घरावर छापे टाकले. या छाप्यात पोलिसांनी त्यांचे सत्यशोधक वाङ्मय नष्ट केले. दरम्यान, भाऊसाहेब कळंबे यांनी कराड येथून ‘शिक्षकांचा कैवारी’ हे पत्र सुरू केले. हे पत्र त्यांच्या मृत्यूनंतर बंद पडले. या पत्रासाठी विठोजीराव थोरात हे आर्थिक साह्य करत असत.

भाऊसाहेब कळंबे हे उत्तम संघटक असल्याकारणाने कराड, पाटण, वाळवे येथील अनेक बहुजन समाजातील कार्यकर्ते त्यांच्याकडे आकर्षिले गेले होते. संदर्भ – कृष्णाकाठ-खंड पहिला-यशवंतराव चव्हाण

सत्यशोधकांचे अंतरंग /५०

काकडे तुकाराम रघुनाथराव

(इ.स. २४ ऑक्टोबर १९०७-इ.स.१९३०)

सत्यशोधक प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना गुरुस्थानी मानणारे तुकाराम रघुनाथ काकडे हे मौजे काकडवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली येथील एक सत्यशोधक होत. सत्यशोधक तुकाराम काकडे यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९०७ रोजी झाला. तुकाराम काकडे हे १९२४ साली व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास झाले.

पुढे दोन वर्षांनी म्हणजे १९२६ साली ते पाटील-तलाठी परीक्षेसाठी कोल्हापुरात गेले. या कोल्हापूरच्या वास्तव्यात त्यांचा कल सत्यशोधक चळवळीकडे झुकत गेला, पुढे त्यांनी कोल्हापूरच्या शिवाजी क्षत्रिय वैदिक शाळेत प्रवेश घेतला. हा पुरोहिताचा ट्रेनिंग कोर्स पूर्ण करून ते सत्यशोधक चळवळीचे कार्य करू लागले. काकडवाडी या गावाला पंचक्रोशीतील सत्यशोधक केंद्र बनवले. काकडवाडी येथे शाहू वाचनालय सुरू केले. या वाचनालयासाठी त्यांनी शेकडो सत्यशोधकी ग्रंथ खरेदी केले. मुंबईला वास्तव्यास गेल्यावर मुंबईतही सत्यशोधक चळवळीचे कार्य त्यांनी केले.

दरम्यान, ५ जून १९२९ रोजी त्यांचा विवाह झाला. हा विवाह सत्यशोधक मते पार पडला. या विवाहात प्रबोधनकार ठाकरे यांनी पौरोहित्य केले. या विवाहाला कर्मवीर भाऊराव पाटील, ‘राष्ट्रवीर’कार श्यामराव देसाई आदी मान्यवर बिनीचे सत्यशोधक उपस्थित होते.

व्याख्याता म्हणून गणलेले सत्यशोधक तुकाराम काकडे यांना अवघे २३ वर्षांचे आयुष्य लाभले. १९३० साली पोटाच्या विकाराने आजारी पडून तुकाराम काकडे यांचे मिरजेतील कॅलेन्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

संदर्भ – सत्यशोधक प्रबोधनकार आणि कर्मवीर- प्रा. महावीर मुळे

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button