सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 88

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 88

https://youtu.be/YSiyU9ZV_KI

१९. ओबीसी अन्याय शोषणाधिष्ठीत व्यवस्थेचा बळी

प्रा. अभय जायभाये

ओबीसी आणि दलित हे गेल्या अनेक शतकापासून प्रस्थापित वर्गाबरोबर ब्राम्हणी नीतीला विरोध करत आहेत. वर्चस्ववादी व्यवस्था संपुष्टात यावी यासाठी पुरोगामी, साम्यवादी, सत्यशोधक, दलित चळवळी उभ्या राहिल्या. अनेक ब्राम्हणेतर चळवळीने सामाजिक सुधारणेच्या ध्येयाने झपाटून काम केले. ब्राम्हणी वर्चस्व झुगारणे, उलथून टाकून सामाजिक न्यायाची अंमलबजावणी सर्व ब्राह्मणेतर एकत्र येऊन करतील अशी भाबडी आशा ओबीसी, दलितांना होती. अनेक शतकाचा हा लढा अजूनही ब्राह्मणी कट कारस्थान आणि बहुजन असाच सुरु आहे.

शतकानुशतके लढल्या जात असलेल्या या लढ्यातुन जाती अंत झाला असे आशादायक चित्र नक्कीच नाही. सामाजिक न्यायाच्या ध्येयापर्यन्त तरी आपण पोहचलो का? याबाबतही आपण साशंक आहोत. समाजातील एक तृतीयांश वर्ग सामाजिक न्यायासाठी लढत असताना सुद्धा आपण अपेक्षित यशापर्यंत का पोहचू शकलो नाही, यावर ओबीसी आणि दलितांनी चिंतन करणे गरजेचे आहे. वर्ण व्यवस्थेमध्ये सर्वाधिक लाभ ब्राम्हण वर्णाच्या झोळीत पडले हे वास्तव असले तरी याचा लाभ वर्ण व्यवस्थेने जसे ब्राम्हण वर्चस्व सर्व व्यवस्थेवर निर्माण केले तसे क्षत्रिय वर्णालासुद्धा त्याचा लाभ झाला हे नाकारून चालणार नाही. वैश्य आणि शूद्र यांना कायम अशा लाभापासून चाणाक्ष पणे दूर ठेवले गेले.

वर्णाचे रूपांतर जेंव्हा जातीत झाले तेंव्हा क्षत्रियांनी वर्चस्ववादी जातीची जागा घेतली. ज्याला समाजशास्त्रीयदृष्ट्या प्रबळजात म्हणतात. सत्ता केंद्र मानून सत्ता कायम कशी आपल्याकडे राहील यांची व्यवस्था केल्या गेली. क्षत्रियांच्या वर्चस्वाला शह देण्याचे काम प्राचीन काळापासून ब्राह्मणांनी केले. सत्ता कधी ब्राह्मणाकडे तर कधी क्षत्रियाकडे जात राहिली. यामध्येही क्षत्रियाचा वरचष्मा कायम राहिला. इतिहासात चार्वाक आणि गौतम बुद्ध यांनी या व्यवस्थेला हादरे नक्कीच दिले. हिंदू धर्म कर्मकांडी व्यवस्थेला त्यांनी नक्कीच दणका दिला. पण काळ जसा बदलला तसा गौतम बुद्ध यांचा बौद्ध धर्म विचार भारतातून प्रवाहित विचारधारेतून दूर सारला

गेला. यामध्ये जसा ब्राम्हणी वर्चस्ववाद जसा कारणीभूत आहे तसा क्षत्रिय विचार पण कारक आहे हे नाकारता येणार नाही.

वर्ण व्यवस्थेच्या जागी जेंव्हा जात प्रबळ होत गेली तेंव्हा धर्माच्या निष्टेपेक्षा जातीवर अधिक निष्ठा वरिष्ठ जातीची वाढत गेली. धर्मापेक्षा जातीला अधिक महत्व प्राप्त होत गेले. जसे हे महाराष्ट्रात आहे तसे प्रत्येक राज्यात एक जात नक्कीच वरिष्ठ आहे जी सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्ट्या प्रबळ आहे. किमान मध्ययुगीन कालखंडापासून तरी उपलब्ध माहितीनुसार मोगल काळात सुद्धा निजामशाही, आदिलशाही कुतूबशाहीत सत्तेच्या वाटणीत ब्राम्हण आणि क्षत्रिय यांचा गावागाड्यापासून ते राजदरबरापर्यंत सहभाग नक्कीच मोठा होता. ब्राम्हण आणि क्षत्रिय कायम सत्तेच्या सुपात होते कधी कधी एकमेकांचे हितसंबंध जपण्यासाठी परस्परपूरक भूमिका गावापासून ते राजसत्तेपर्यंत घेतल्या जात असत आणि आजही घेतल्या जातात.

प्राचीन काळापासून ते अलीकडच्या काळापर्यंत वर्चस्ववादी अधिक काळ सत्तेत आहे. पूर्वी धार्मिक, सांस्कृतिक, महापुरुषाच्या प्रभावात्मक प्रतिकाबाबत ओबीसी, दलिताच्या जीवनावर ब्राह्मणी विचारधारा प्रभावित करण्यासाठी सक्रिय होती तीच नीती हल्ली वर्चस्ववादी वर्गाची नीती झाली आहे. ब्राम्हण व क्षत्रिय यांचेच वर्चस्व कसे सर्वसामान्याच्या मनात कायम राहील अशी व्यवस्था धर्म, राज्य संस्थेला हाताशी धरून सुरु आहे. ब्रिटिशांनी सुद्धा राज्य करत असताना ब्राम्हणी व्यवस्थेला जसा धक्का दिला नाही तसाच त्या त्या राज्यातील पाटीलकी, जहागीरदारी, जमीनदारी या क्षत्रियाच्या व्यवस्थेला सुद्धा धक्का दिला नाही. वेळप्रसंगी क्षत्रियांनी ओबीसी आणि दलितांवरची आपली सत्ता कायम असावी यासाठी ब्रिटिशांचे मांडलिकत्व जसे स्विकारले तसे तडजोड करून गादी वारसा सुरु ठेवला.

ओबीसी, दलित गेल्या अनेक शतके केवळ सेवा देणे या श्रम संस्कृतीवर आधारित प्रणालीवर जगणारा सेवेकरी होता. क्वचित प्रसंगी बलुतेदार, आलुतेदार यांना जमिन हक्क मिळाले पण ही संख्या अगदी नगण्य अशा स्वरूपाची होती. त्यामुळे कायम भू मालकावर अवलंबित्व असणारा हा वर्ग असे. यामुळेच समर्पणाची भावना हे आपले संस्कार या तत्वानुसार गावगाड्यात कामासाठी जुंपलेला हा वर्ग होता. मालकाशी कायम प्रामाणिक असणारा वर्ग होय. त्यांच्या दैनंदिन गरजा जेमतेम पूर्ण होत असे इतकंच उत्पादन साधन त्यांच्याकडे असे.

मात्र मध्ययुगीन कालखंडात ब्रिटिशांचे आगमन भारतात झाले. जगाला भारताची आणि भारताला जगाची ओळख होण्यास सुरुवात झाली. ब्रिटिश

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
88

शिव क्रांती टीव्ही दिन बंधू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button