🔥 महिला आरक्षणाच्या नावाखाली ओबीसींचा हक्क हिरावला जातोय? – राहुल गांधींचा थेट आरोप! 🔥

🔥 महिला आरक्षणाच्या नावाखाली ओबीसींचा हक्क हिरावला जातोय? – राहुल गांधींचा थेट आरोप! 🔥
नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशात पुन्हा राजकीय वाद पेटला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, महिला आरक्षणाच्या नावाखाली ओबीसी समाजाचा वाटा कमी करण्याचा डाव रचला जात आहे.
राहुल गांधी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जातीवार जनगणना न करता महिला आरक्षण लागू करणे म्हणजे मागासवर्गीय समाजावर अन्याय आहे. यामुळे ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
👉 त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटले की,
“ही फक्त महिला सक्षमीकरणाची बाब नाही, तर सामाजिक न्यायाशी संबंधित मोठा प्रश्न आहे. ओबीसींचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
दरम्यान, या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. देशभरात यावर चर्चा रंगली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आणखी गाजण्याची शक्यता आहे.
—
📢 बिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकराव लिंगे
📲 आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये हा नंबर जोडा: 73 87 37 78 01
👉 बातमी लाईक करा 👍
👉 शेअर करा 🔄
👉 सबस्क्राईब करा 🔔
👉 फॉरवर्ड करा 📩
👉 कॉमेंट करा 💬
📸 आपल्याकडील सत्य बातम्या, फोटो, व्हिडिओ आम्हाला पाठवा – विसरू नका!




