आरक्षण म्हणजे काय आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाही आणि आरक्ष0ण म्हणजे रोजगार हमी योजनाही नाही!

आरक्षण म्हणजे काय
आरक्षण हा गरिबी निर्मूलन कार्यक्रम नाही आणि आरक्ष0ण म्हणजे रोजगार हमी योजनाही नाही!
आरक्षण म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेने ज्यांना स्वतःचे हक्क अधिकार नाकारले त्यांना वरिष्ठ पातळीवर आणण्याचा एक प्रयत्न आहे आणि यात ओबीसी जे महाराष्ट्रात ४५० जाती आणि केंद्रात ६५०० चे वर जाती आहेत याचाच अर्थ आरक्षणाची सर्वात जास्त गरज आपल्याला ओबीसी वर्गाला आहे.
मराठा आरक्षानसाठी रस्त्यावर उतरले ओबीसी सुद्धा यात आरक्षण साठी आक्रमक आहे कित्येक आंदोलने ,मोर्चे करूनही आज देशातल्या ६५ टक्के ओबीसी वर्गाला यांचे स्वतःचे आरक्षण नाकारले जाते पण सवर्ण आरक्षण दहा टक्के कोणतेही आंदोलन,मोर्चे न काढता आणीं संसदेत यावर कोणतीही चर्चा न करता दहा टक्के दिले जाते आणि त्यावर तातडीने राष्ट्रपती सही करून अध्यादेश काढून त्याला कायद्याचे रूप देतात
यावरून आपल्या लक्षात आले पाहिजे की आरक्षण ही किती महत्वाची बाब आहे आणि आपण फक्त जातीय दृष्टीकोनातून आरक्षण सारख्या मजबूत आधाराला आपणच नाकारतो यापेक्षा दुर्दैव ते काय ?
रशियात आरक्षण आर्थिक आधारावर आहे कारण तिथे भेदभाव आर्थिक आधारावर आहे पण भारतात आरक्षण हे जातीय आधारावर आहे कारण एक जात दुसऱ्या जातीला तुच्छ मानण्यात अग्रेसर आहे
जाती व्यवस्था संपवा म्हणजे आरक्षणाची गरजच राहणार नाही आणि जाती व्यवस्था मजबूत करण्यात भारतीय समाज सर्वात पुढे आहे.
जाती व्यवस्थेचे निर्मूलन
या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर विधान केलेलं आहे
जाती ह्या पापपुण्याशी जोडलेल्या आहेत म्हणून जातींवर भारतीय समाज अभिमान बाळगतो.
जाती आहेत म्हणूनच काल आणि आजही एक जात दुसऱ्या जातीवर अन्याय अत्याचार करते आहे.
सर्वांचा जर धर्म एक आहे तर जाती हजारो करून त्यात भेदाभेद करून जगात कोणताही धर्म आज सुरक्षित नाही.
धर्माचा अभिमान असावा पण माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस
या प्रश्नाचे उत्तर धर्मांध शोधणार नसतील तरीही आपल्या सर्वच महापुरुषांनी शोधले आहे
कोणताही बहुजन समाजातील महापुरुष त्यांच्या कोणत्याही गाथेत आणि ग्रंथात,पुस्तकात धर्म आणि जातींचे अवडंबर माजवत नाहीत कारण त्यांना समजले आहे की जातीचा अती गर्व गुलामीचे भयानक मोठे कारण आहे.
माणूस जात एक आहे तर सर्वांची जात एक का नाही ?
सर्वांची जात एक नाही म्हणूनच जात पाहून न्याय अन्याय भारतीय समाजात पाहायला मिळतो.
सर्वात आधी जाती संपवा आपोआप आरक्षणाची गरज संपेल
जातनिहाय जनगणना करा!
मी आरक्षण चे शंभर टक्के समर्थन करणे माझा हक्क माझा अधिकार आणि माझे कर्तव्य समजतो आणि समान नागरी कायद्याचं समर्थन तोपर्यंत करत नाही जोपर्यंत भारतात जाती व्यवस्था आहे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बिल दाबा

