केंद्रराज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली आणि आज मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांचे आभार मानले

- र*…केंद्रराज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली आणि आज मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा नि
- घेतल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांचे आभार मानले, तसेच आपल्या या मागणीसाठी आपल्या पाठपुराव्याला सातत्याने बळ दिल्याबद्दल मा. फडणवीस साहेब यांचे देखील मनापासून आभार मानले. याप्रसंगी मा. फडणवीस साहेब यांनी देखील माझे अभिनंदन केले.


सरकारच्या वतीने जातनिहाय जनगणना
करण्याची घोषणा ; समता परिषदेच्या वतीने मुंबई नाका येथील फुले स्मारकात पेढे वाटत जल्लोष*
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रदीर्घ लढ्याला मोठ यश – प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे
नाशिक,दि.३०एप्रिल:- केंद्र सरकारने आज जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सन १९९२ सालापासून सुरू असलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीच्या लढ्याला यश प्राप्त झाले आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र राज्य सरकारचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी व्यक्त केली आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली आज फुले स्मारक मुंबई नाका येथे वाजतगाजत पेढे वाटून केंद्र सरकारच्या निर्णयाचे जल्लोष करण्यात आला. यावेळी समता परिषदेच्या वतीने महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.




