सावित्रीमाईंच्या स्मृतिदिनी आटपाडीत अभिवादन… फुले पुतळ्याला तात्काळ अधिकृत परवानगी द्या – सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची ठाम मागणी

सावित्रीमाईंच्या स्मृतिदिनी आटपाडीत अभिवादन… फुले पुतळ्याला तात्काळ अधिकृत परवानगी द्या – सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची ठाम मागणी
आटपाडी (सांगली) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२९ व्या स्मृतिदिनानिमित्त आटपाडी येथे त्यांच्या तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ओबीसी नेते तथा अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे आणि आटपाडी नगरपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष यू. टी. जाधव सर यांनी पुष्पांजली अर्पण करून क्रांतीज्योती सावित्रीमाईंना कृतज्ञ अभिवादन केले.
आटपाडी–सांगली बायपास रोडवरील आबा नगर येथे आयोजित या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. फुले प्रेमींनी मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामाजिक क्रांतीच्या या महामानवांना अभिवादन केले.
दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी फुले प्रेमींनी अनधिकृतरीत्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा अर्धपुतळा स्थापित केला होता. या पुतळ्यासाठी संबंधित नगरपालिकेकडे अनेक वेळा अधिकृत परवानगी मागण्यात आली; मात्र अद्यापपर्यंत परवानगी देण्यात आलेली नाही.
मात्र आज नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष यू. टी. जाधव स्वतः उपस्थित राहून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केल्याने या पुतळ्याला अधिकृत मान्यता देण्याचा मार्ग आता खुला व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
हा पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणी वाहतुकीला कोणतीही अडचण होत नाही. तसेच या पुतळ्याच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी फुले प्रेमी घेण्यास तयार आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने विलंब न करता या पुतळ्याला तात्काळ अधिकृत परवानगी द्यावी, अशी ठाम आणि आक्रमक मागणी त्यांनी केली.
लिंगे पुढे म्हणाले की, ११ एप्रिल २०२७ ते ११ एप्रिल २०२८ या कालावधीत महात्मा ज्योतिराव फुले यांची २०० वी जयंती देशभर साजरी करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केली होती. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी जयंती उत्सवाचे औचित्य २०३०–३१ मध्ये येत आहे. त्यामुळे देशभरातील गावोगावी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारून त्या ठिकाणी स्मारकांचे सुशोभीकरण करण्याला शासनाने प्राधान्य द्यावे, अशीही ठाम भूमिका त्यांनी मांडली.
या कार्यक्रमाला बजरंग फडतरे, सुरज लवटे, नवनाथ भारते, पिंटू भुजे, नितीन केंगार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व फुले प्रेमी उपस्थित होते.
🙏 अभिवादन सावित्रीमाईंना 🙏
📢 सोशल मीडिया संदेश
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01
हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जोडा.
बातमी लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कॉमेंट करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
#हॅशटॅग
#SavitribaiPhule
#MahatmaPhule
#Atpadi
#OBCVoice
#PhuleThought
#SocialJustice
#ShankarraoLinge
#DinbandhuNews
#ShivkrantiTV












