सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमश:54

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाने,प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमश:54

आली आहे. यातूनच एकीकडे दलित व इतर मागासवर्गीय यांच्याबद्दल जातीय आकसातून टीका करणारी वक्तव्ये व व्हिडिओ बनवले जात आहेत, तर दुसरीकडे मराठा नेतृत्वाकडून झालेली निराशा समोर येत आहे. वाढलेली वर्गीय दरी आज मराठा-कुणबी तणावात स्पष्टपणे दिसून येत आहे. ‘कुणबी शब्दाची लाज वाटते त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे असे जरांगेनी म्हणणे आणि ‘क्षत्रिय’ म्हणवू पाहणाऱ्या मराठ्यांच्या वतीने सर्व मराठे कुणबी नाहीत, शेती इतर जाती सुद्धा करतात असे म्हणत, आणि कुणबी नोंदी झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ९५ टक्के मराठे आरक्षणापासून वंचित राहतील अशी घोषणा ९६ कुळी मराठा नेत्यांनी करणे याच वर्गीय तफावतीची अभिव्यक्ती आहे.

अस्मितावादाला खतपाणी घालण्यासाठी सर्वपक्षीय एकता

आंदोलनामध्ये कष्टकरी आणि कामगार वर्गातून येणाऱ्या मराठा बेरोजगार युवकांची मोठी संख्या आहे. त्यांची भांडवलदार वर्गाचा हिस्सा असलेल्या उच्चभ्रू मराठा नेतृत्वाकडून झालेली निराशा आता अधिक आक्रमकपणे समोर येणे सुरू झाले आहे. या आंदोलनाच्या एकंदरीत चरित्रामध्ये राजकीय-वैचारिक भरकटलेपण असतानाही स्वतःस्फूर्ततेचा भाग मोठा असल्याचे, आंदोलनाची धार खालूनही वाढत असल्याचे समोर येत आहे. नेत्यांना गावबंदी, सभाबंदी सारख्या पावलांमुळेही जी धार दिसून आली आहे. थोडक्यात मराठा अस्मितेच्या आंदोलनाचे नेतृत्व आता प्रस्थापित बड्या भांडवलदार सत्ताधारी वर्गातील मराठ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे.

भारतात भांडवली व्यवस्थेला जातीय अस्मितांच्या राजकारणाची गरज आहेच. भांडवली निवडणुकांमध्ये वर्ण, लिंग, जात, व इतर अस्मितांचे राजकारणच भांडवलदार वर्गाला नेहमी विविध मुद्दे व आयुधे निर्माण करून देत राहते. देशात जातीय अस्मितांचे राजकारण व्हावे ही सर्वच भांडवली पक्षांची गरज आहे, फक्त त्याचे नेतृत्व त्या-त्या जातीतील भांडवलदार, उच्चभ्रू वर्गाच्या हातात म्हणजेच नियंत्रणात आणि राज्यसत्तेच्या चौकटीत राहिले पाहिजे ही त्यांची पूर्वशर्त आहे. याचा अर्थ हा निश्चित नव्हे की असे अस्मितावादी आंदोलन इतर नेतृत्वाच्या हाती योग्य ठरते. परंतु नुकत्याच उभ्या झालेल्या आंदोलनाने संपत्तीधारक

मराठ्यांविरूद्ध दर्शवलेले रूप निश्चितपणे सर्व पक्षांमधील बड्या भांडवली नेतृत्वाला

चिंता करण्यास लावणारे आहे.

आरक्षणावरून भांडवलदार वर्गाचे द्वंद्व समजले पाहिजे. आरक्षणावर असलेले ५० टक्क्यांचे वा तत्सम बंधन ही एकीकडे जास्त वेगवान भांडवली विकासाची गरज आहे, कारण कोणत्याही जातसमूहातील जास्त ‘सक्षम’ व्यक्तींना कमीत कमी मजुरीत कामाला लावता येणे आणि कामगारांच्या निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असणे ही मालक वर्गाची गरज असते, आणि आरक्षणामुळे त्याला काही प्रमाणात का होईना छेद जातो. दुसरीकडे भांडवली विकासाच्या परिणामी निर्माण होणारी बेरोजगारी राजकीय असंतोषाला जन्म देत राहते, ज्याला नियंत्रणात ठेवण्याकरिता अस्मितेचे व आरक्षणाचे राजकारण याच वर्गाच्या कामीही येते. यात अस्मितेचे राजकारण बड्या भांडवलदार वर्गाच्या नियंत्रणात राहणे ही राजकीय स्थिरतेची गरज नक्कीच असते.

या सर्व जाणीवेमुळेच शिंदे, फडणवीसांसहित धनिक शेतकरी वर्गाचे प्रमुख नेते असलेले शरद पवार व इतर नेत्यांची संयुक्त बैठक होऊन आश्वासन देण्यात आले की २४ डिसेंबर पर्यंत निर्णय होईल. ही सत्ताधारी वर्गाची वर्गएकताच आहे, अन्यथा, शिंदे, फडणवीस सरकारला धारेवर धरण्याचे काम विरोधी पक्षांनी का केलेले नाही? ज्यांच्या नोंदी सापडतील त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची घोषणा करत, ऐतिहासिक कुणबी नोंदी शोधण्याचे कामही सरकारने लगोलग हाती घेतले आहे. सोबतच हे सुद्धा विसरू नये की एखाद्या आंदोलनाला कह्यात आणण्यासाठी त्याच्या नेतृत्वाला लालूच देणे, नेतृत्वाचे दमन करणे, खोटे-नाटे आरोप करून आंदोलनाचे दमन करणे, आंदोलनाला भरकटवत व भडकावत त्याच्या दमनाची संधी तयार करणे या राज्यकर्त्यांच्या क्लृप्त्या देशाने ७५ वर्षे अनुभवल्या आहेत. याचाच भाग म्हणून सरकार मध्येच मंत्रीपदी असलेले छगन भुजबळ व कॉग्रेससहीत पक्षांमधील ओबीसी नेत्यांची संयुक्त आघाडी बनवून ओबीसी-मराठा तेढ वाढवण्याची योजना अंमलात आणली गेली आहे, आणि जरांगेच्या नेतृत्वाला आव्हान देणारी पावले टाकणे सुद्धा सुरू केले गेले आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी दोन्ही आंदोलनांना दिलेला पाठिंबा यासाठीच आहे की अस्मिता भडकवून,

परिस्थिती चिघळवून आंदोलनांना भरकटू द्यावे.

रोहिणी आयोग, ओबीसी अंतर्गत आरक्षणाची मागणी

आरक्षणाच्या मागणीची बनलेली निरर्थकता यातूनही दिसून येते की आता ओबीसी अंतर्गत विविध गट करून त्यांना आरक्षण देण्याची मागणी पुढे गेली आहे. ओबीसींच्या ६३३ जातींमधील मूठभर जातींनाच या आरक्षणाचा

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button