ओबीसींच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक विश्वासघाताची परंपरा असलेल्या भाजपच्या ‘या’ “जुमल्यावर” विश्वास कसा ठेवायचा?प्रा.श्रावण देवरे* यांचा सवाल?????????

ओबीसींच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक विश्वासघाताची परंपरा असलेल्या भाजपच्या ‘या’ “जुमल्यावर” विश्वास कसा ठेवायचा?
प्रा.श्रावण देवरे* यांचा सवाल????????? शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
1) बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केन्द्र सरकारने घेतलेला ‘जातनिहाय जनगणनेचा निर्णय’ म्हणजे “चुनावी जुमला” आहे.
2) हा निर्णय कॉंग्रेसच्या दबावाखाली घेतला नसून केवळ नितीश कुमारांच्या सांगण्यावरून घेतलेला आहे.
3) जोपर्यंत कॉंग्रेस किंवा भाजपा केन्द्रात सत्तेत राहतील तोपर्यंत जातीअंतासाठी जातनिहाय जनगणना होणे शक्य नाही.
4) RSS ची कट्टर ब्राह्मणवादी माणसं सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आहेत. त्यामुळे कोणत्याही पक्षाची सत्ता आली तरी जातनिहाय जनगणना ते होऊ देणार नाहीत.
5) जातिव्यवस्था नष्ट करायची असेल तरी आणी जातिव्यवस्था अधिक मजबूत करायची असेल तरी जातीचे आकडे व जातीचा डेटा आवश्यक असतो.
6) ओबीसी वोटबँक देशभर पसरलेली असली व मजबूत असली तरी तीला कधी कॉंग्रेस लुटते तर कधी भाजपा.
7) ओबीसींचा एकही राजकीय पक्ष अखिल भारतीय नसल्याने कॉंग्रेस-भाजपसारख्या पक्षांची जुमलेबाजी यशस्वी होते.
8) कॉंग्रेस ने 2011-12 साली केलेल्या आर्थिक व जाती जनगणनेची आकडेवारी व डेटा RSS ने जातिव्यवस्था मजबूत करण्यासाठी वापरला व म्हणून संघ-भाजप 2014 साली सत्तेत आलेत.
9) आता 2025-26 साली भाजप सरकारने जर जातनिहाय जनगणना झाली तर तीची आकडेवारी व डेटा अधिक मजबूत व अधिक कट्टर असलेली नवी जातीव्यवस्था निर्माण करण्यासा ।ठीच वापरला जाईल.




