सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.115

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.115
जाधव रायभान रंभाजी
(जन्म १९४३ – मृत्यू २५-१२-१९९७)
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे एक भूतपूर्व अध्यक्ष व सत्यशोधक समाज अधिवेशनाचे अध्यक्ष, आमदार रायभान रंभाजी जाधव हे मौजे पिशोर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथील मूळ रहिवासी असून त्यांचा जन्म इ. स. १९४३ साली झाला. भूतपूर्व आमदार रायभान जाधव हे बहुजन समाजातील आय. ए. एस. (सुपर क्लास वन दर्जाचे) उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्व असून ते शासनाच्या सेवेत सनदी अधिकारी म्हणून कार्यरत होते. इ. स. १९७५ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात सक्रिय सहभागी झाले. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तीनदा नेतृत्व केले. त्यांनी या कालावधीत विधानसभेत कन्नड मतदारसंघाचे प्रश्न धसास लावले.
इ. स. १९५० मध्ये सत्यशोधक ल. ब. मिसाळ गुरुजींचे उंडणगाव, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद येथे सत्यशोधक विद्यार्थी संघाचे शिबीर सुरू असताना पिशोर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथील गावकऱ्यांनी पिशोर येथे ल. ब. मिसाळांचे शिबीर मागून घेतले. या गावकऱ्यांच्या आग्रहाखातर रामचंद्र दौड आणि ल. ब. मिसाळ यांनी पिशोर येथे गुरुवर्य केशवराव विचारे यांच्या सत्यशोधकी विचारावर आधारित सत्यशोधक शिबिर घेतले. या वर्गाला सात-आठ वर्षांचा एक कोवळा विद्यार्थी बसला होता. हा विद्यार्थी म्हणजे रायभान जाधव होत. गुरुवर्य केशवराव विचारे यांच्या निधनानंतर पुढे सत्यशोधक समाज संघटन मंदावत गेले.
अशावेळी विखुरलेल्या सत्यशोधकांनी इ. स. १९७१ साली नामदार बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समाजाचे १९ वे अधिवेशन मुंबई येथे घेतले. या
सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.115
जाधव रायभान रंभाजी
(जन्म १९४३ – मृत्यू २५-१२-१९९७)
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे एक भूतपूर्व अध्यक्ष व सत्यशोधक समाज अधिवेशनाचे अध्यक्ष, आमदार रायभान रंभाजी जाधव हे मौजे पिशोर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथील मूळ रहिवासी असून त्यांचा जन्म इ. स. १९४३ साली झाला. भूतपूर्व आमदार रायभान जाधव हे बहुजन समाजातील आय. ए. एस. (सुपर क्लास वन दर्जाचे) उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्व असून ते शासनाच्या सेवेत सनदी अधिकारी म्हणून कार्यरत होते. इ. स. १९७५ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात सक्रिय सहभागी झाले. कन्नड विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तीनदा नेतृत्व केले. त्यांनी या कालावधीत विधानसभेत कन्नड मतदारसंघाचे प्रश्न धसास लावले.
इ. स. १९५० मध्ये सत्यशोधक ल. ब. मिसाळ गुरुजींचे उंडणगाव, तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद येथे सत्यशोधक विद्यार्थी संघाचे शिबीर सुरू असताना पिशोर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथील गावकऱ्यांनी पिशोर येथे ल. ब. मिसाळांचे शिबीर मागून घेतले. या गावकऱ्यांच्या आग्रहाखातर रामचंद्र दौड आणि ल. ब. मिसाळ यांनी पिशोर येथे गुरुवर्य केशवराव विचारे यांच्या सत्यशोधकी विचारावर आधारित सत्यशोधक शिबिर घेतले. या वर्गाला सात-आठ वर्षांचा एक कोवळा विद्यार्थी बसला होता. हा विद्यार्थी म्हणजे रायभान जाधव होत. गुरुवर्य केशवराव विचारे यांच्या निधनानंतर पुढे सत्यशोधक समाज संघटन मंदावत गेले.
अशावेळी विखुरलेल्या सत्यशोधकांनी इ. स. १९७१ साली नामदार बाळासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समाजाचे १९ वे अधिवेशन मुंबई येथे घेतले. या

