मराठा आरक्षणासाठी माळी समाजाच्या तरुणाचा बळी? तारापूर नाला ता. पंढरपूर जि. सोलापूर येथील स्व. विलास किसन क्षीरसागर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणे
तारापूर नाला, ता. पंढरपूर जि.सोलापूर येथील रहिवासी असलेले स्व. विलास किसन क्षीरसागर यांचा दि. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी गावातील झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मात्र आढळलेला हा मृतदेह संशयास्पद मृत्यू असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
स्व. विलास किसन क्षीरसागर यांच्या मृत्यूबाबत काही संशयास्पद बाबी आढळून आल्या आहे. यामध्ये सदर व्यक्ती हा अपंग असल्याने तो झाडावर जाऊन गळफास घेणे शक्य नाही. तसेच ज्या झाडाला गळफास घेतला आहे त्या ठिकाणी मृताचे पाय पूर्णतः जमिनीला टेकलेले आहे. गळफास लावलेली फांदी जवळच आहे हा रिकामी आहेत हात लांबून तो पकडू शकतो जमिनीला टेकलेले पाय जमिनीवर कुठली हालचाल झालेली नाही माती वगैरे उतरलेले नाही शासनाच्या प्रेत यात्रा जळत असताना रात्री त्याला अग्नी देण्यात आली त्यावेळी त्याला त्या अग्नीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झालेला आहे तोंडामध्ये का असे म्हणण्यात आवाज येत आहे शोक सभेमध्ये मराठा आरक्षण नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा जोरजोराने घोषणा दिलेले आहेत मराठा आरक्षणासाठी एका माळी समाजाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलेले आहे असा अपप्रचार केला जातो त्या गावांमध्ये त्याचे कोणीही नातेवाईक नाहीत तो एकटाच त्या गावांमध्ये हॉटेलमध्ये आणि ट्रॅक्टरवर काम करत होता त्यामुळे स्व. विलास किसन क्षीरसागर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा खून करण्यात आला असल्याचा आरोप नातेवाईक व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आलेला आहे. याप्रकरणाबाबत सखोल चौकशी करण्याची नितांत आवश्यकता आहे.
स्व. विलास किसन क्षीरसागर तारापूर नाला, ता. पंढरपूर जि. सोलापूर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे




