मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 75

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
75
वेध ओबीसी-मराठा आरक्षण गुंत्याचा…!
डॉ. प्रभाकर गायकवाड
एकीकडे मोदीकाळात भारताचा डंका जगभर वाजतोय म्हणुन दंवडी पिटवायची, जागतिक महासत्तेचे मनोरे रचायचे. आणि दूसरीकडे आपल्या देशातील गरिबांना मोफत धान्य दिले नाही, तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, हे वास्तव नजरेआड करायचे ? इतकी वर्षे सत्ता भोगूनही गरिबांची संख्या फुगत आहे आणि ८० कोटी लोकांना मोफत धान्य वाटप योजना, ही कौतुकाने सांगितले जात असेल तर वस्तुतः ही बाब शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. सत्ताधा-यांनी ‘अच्छे दिन’ ची गाजर दाखवलीत. जेव्हा ८० कोटीचा । दारिद्र्याचा) आकडा सांगण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा संवेदना किती बोथट झाल्या आहेत, हे दिसून येते.
ही बाब फक्त आकड्यांच्या खेळाची आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालण्या-या नैतिकतेची नसून आपल्या पक्षीय भूमिका बळकटीकरणासाठी आणि नवउदारवादी धोरणे अंमलबजावणीसाठी चंग बांधलेल्या उच्च जातवर्ग सत्ताधारी हितसंबंधाचा आहे. देशाचा तथाकथित आर्थिक विकास दर जो आहे तो निम्न जात वर्गाच्या लुटीतून आहे. बेरोजगारी, कुपोषणाची गंभीर समस्या कोट्यवधी लोकांना भेडसावत आहे. जाती जन्य दारिद्य हे बहुआयामी असल्याने आकड्यात प्रमाणित करणे कठीण बाब आहे. गरीब आणि गरीबी विदेशी पाहुण्यांच्या नजरेआड करण्यासाठी भलीमोठी भिंत / कंपाऊंड बांधुन त्यावर ‘सबका साथ सबका विकास’ ची जाहीरात डकवायची व मोफत राशनची तरतुद करायची, यातून सरकारचा खरा चेहरा समोर येतो. खरच मोदीशहामुळे गरीबांची संख्या घटली, आत्मनिर्भर भारत विकासाची गॅरटी बळावली का? मोदी आणि मोदी सरकारच्च्या धोरणातून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सिध्द करण्यात सरकारी विचारवंत (भक्त सोशल मिडियात) तास न् तास मिडीयात मश्गुल ते देशभक्त, आणि जे सरकारी धोरणांची पोलखोल करतील ते देशद्रोही. ही लोकांच्या डोळ्यात धुळफेक आहे.
शेती व शेतकरी वर्गावर चोहोबाजूंनी हल्ले होत आहेत, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर शिक्षण, बेरोजगारी, गगनाला भिडत चाललेली महागाई इत्यादीमुळे सर्वच निम्न जातवर्गातील, शेतकरी, कामगार लोक अत्यंत हलाखीचे जीवन
जगत आहेत. गरिबीच्या झळाझोंबीतून वाढत्या आरक्षण मागण्यांनी मोठे गुंतागुंतीचे प्रश्न उभे राहिले आहेत. वेगवेगळ्या राज्यात आरक्षण मागणीसाठी विविध आंदोलने होताहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी निकराचा लढा सुरू आहे. मराठा ओबीसी वाकयुद्धाने वादळ निर्माण केले आहे. त्याअनुषंगाने लेखात आरक्षणाचा मागोवा – वेध घेत उहापोह करणे गरजेचे आहे. लेखाच्या विस्तार भयामुळे काही मुद्दे सविस्तर मांडणी न करता सुटेपणाने सुतोवाच केले आहे.
म. जोतीराव फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्थेला भारतीय समाजव्यवस्थेचा पाया मानले आहे. त्यांचा या व्यवस्था बदलावर अधिक भर होता. तर कॉ. शरद पाटील भारतीय समाजव्यवस्था ही जातवर्गपितृसत्ताक समाजव्यवस्था असल्याचे प्रतिपादन करतात. भारतीय समाज-व्यवस्था ही अपरिमित व बहुपदरी शोषण आणि गुलामगिरीवर आधारलेली आहे. अंतोनिओ ग्रामशीच्या प्रतिपादनाप्रमाणे, ‘सत्ताधारी वर्ग केवळ बळाचा वापर करून आपली सत्ता टिकवत नसतो तर सत्तेच्या समर्थनात विचारसरणी व संस्कृती घडवत असतो. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा आणि बळाच्या साह्याने जात वर्ग पितृसत्ताक सत्ताधारी आपले हितसंबंध अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करत असतो. या हितसंबंधाला उचलून धरण्याच काम मध्यम वर्ग करत आहे. आणि ज्या गरीब वर्ग जाती जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी झगडत आहे, त्यांना वरचढ वर्गजाती हक्क अधिकारांपासून कायम दूर ठेवतात, त्यांच्यातील असंतोष, संघर्षशीलता शमविण्यासाठी कार्यरत असतात. आपल्या देशात हजारो वर्षापासून व्यक्तींच्या
जन्मजातीनुसार ज्ञान, संपत्ती, प्रतिष्ठा आणि हक्क मिळतील की नाही ते मनुस्मृति संहिता ठरवत असे. ते मनुस्मृतीतील पुढील काही श्लोकातून अधोरेखित होते-
जातीमात्रोपजीवी वा कामं स्याद ब्राह्मणब्रुव : ।
धर्मप्रवक्ता नृपतेर्न तु शुद्र: कथंचन ।। ८.२० ।। राजाने धर्मशास्त्रानुसार न्यायदान करण्यासाठी नेमलेला न्यायाधीश हा एक वेळ ब्राह्मण जातीवर गुजराण करणारा, स्वताला ब्राह्मण म्हणून केवळ मिरवणारा असा असला तरी चालेल. पण तो कोणत्याही परिस्थितीत शूद्र असता कामा नये.
यो लोभादमो जात्या जीवेदुत्कृष्टकर्मभि: ।
ते राजा निर्धन कृत्वा क्षिप्रमेव प्रवासयेत् । १०.९६.
जो जन्माने खालच्या जातीचा आहे. पण लोभाने वरच्या जातीच्या लोकांनी करण्याजोगी कामे करून उपजीविका करीत आहे त्याची संपत्ती जप्त
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

