सोशल

मराठे होते म्हणून तुमचे मुसलमानांकडून रक्षण झाले हा जो तुमचा समज आहे ना तो बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्यासारखा झाला आहे..

 

मराठे होते म्हणून तुमचे मुसलमानांकडून रक्षण झाले हा जो तुमचा समज आहे ना तो बैलगाडीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्यासारखा झाला आहे..बैलगाड़ीखाली चाललेल्या कुत्र्याला वाटत असते की गाडी आपणच ओढत आहोत.. गद्दार तर मराठे पण होते .. गणोजी शिर्के, खंडोजी खोपडे, बाजी घोरपडे ..आदिलशाही, निजामशाही मध्ये त्यांच्या बाजूने लढणारे मराठेच होते… आणि शिवरायांनी 18 पगड जाती घेवून स्वराज्य राखला.. देशातील जी जुनी मोठी मंदिरे आहेत ना ती जातीने धनगर असणाऱ्या अहिल्याबाई यांनी केलेल्या जीर्णद्धाराच्या मुळे नाहीतर पंढरपूरचा विठोबा जात्यात घालून दळताना अफजलखानाच्या फौजेत 7 मराठे सरदार तमाशा पहात होते.. मुरारबाजी देशपांडे, कान्होजी आंग्रे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाले, मल्हारराव होळकर, कुर्तोजी गुर्जर हे मराठे नव्हते.. ज्या शिवा काशीद ने शिवरायांचा वेश घेवून मरण पत्करले तो जातीने न्हावी होता… आणि आज त्या ओबीसी नव्ह्यांच्या आरक्षणावर डोळा ठेवून आहात तुम्ही लोक..
सत्ता केवळ तुमच्या हातात राहावी आणि बाकीच्यांनी तुमची गुलामगिरी करावी हा अट्टाहास नेहमी तुमचा असतो हे समजत नाही का आम्हाला.. तुमच्या शेतात काम करणाऱ्या ओबीसी समाजाच्या बायकांना झालेल्या ओबीसी मुलांना तुम्ही उसाच्या फडात झालेली पाटलाची पैदास म्हणून हिनवता..

लावणीच्या फडात, तमाशात पैसे उडवण्यासाठी आलाय जमीन गुंठा गुंठा विकून आपल्या पोरांना रस्त्यावर यायला मजबूर करणारे तुम्हीच आहात..

तुमच्यामध्ये सगळे श्रीमंत नाही हे मान्य आहे आम्हाला.. त्या गरिबांना आरक्षण मिळावे हा शुद्ध हेतू आहे आमचा… त्यासाठी आर्थिक निकषावर आरक्षण लागू आहे तुम्हाला… तुमच्या समाजात अनेक मोठे मराठा नेते आहेत त्यांना जाब विचारा आजपर्यंत गरीब मराठा समाजासाठी त्यांनी काय केले??

झालेल्या स्वतंत्र आरक्षण 10 टक्के मिळाले आहे ना मग आमच्या पोरांच्या ताटातील घास हिरावून तुम्हाला काय मिळणार आहे??

मराठा मोर्चाला आम्ही खुल्या मनाने समर्थन दिले ओबीसी बांधवांनी.. कोपर्डीच्या ताई ला न्याय मिळावा, राहुल फटांगले याने शिवाजी महाराजांची टी शर्ट घातली म्हणून त्याची दगडाने ठेचून केलेली हत्या आणि त्याविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवणारे माझ्यासारखे अनेक ओबीसी बांधव होते..

परत एकदा सांगतो आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही आहे तुम्हाला आरक्षण मिळावा या मताचे आम्ही आहोत पण स्वतंत्र आरक्षण नको आम्हाला तुमच्या ताटातील घास हिसकावून घ्यायचा आहे ही जी काही तुमची प्रवृत्ती आहे ना त्याला विरोध आहे….
[6/24, 10:46 PM] OBC Nivant Kolekar: ओबीसी आरक्षण बचाव.
ज्यांची कुनबी नोंद आहे. त्यांनी अगोदरच ओबीसी दाखले काढलेत.
अनेकांनी स्थानिक सत्तेचा वापर करुन कुनबी लावून ओबीसी दाखले काढले.
स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसी आरक्षित जागा हस्तगत केल्या.
त्या प्रत्येक कुनबी दाखल्यांची चौकशी व्हावयास हवी.

सरकारने दबावात येवून ५७ लाख नोंदी शोधल्याचा दावा केला.
ज्या जिल्ह्यांत नोंदी अढळल्या नाहीत किंवा कमी मिळाल्या त्याबाबत सरकारवतीने नाराजी दर्शवून पुन्हा शोधण्याचे आदेश दिले होते.
काहीही करुन नोंदी दाखवावयाच्या होत्या.

त्यामुळे मुळ ओबीसींचे बरंच आरक्षण गिळंकृत झाले आहे.
अक्षरश: ओबीसीसाठी संपले आहे.

नव्याने शोध दाखविलैल्या ५७ लाख नोंदी रद्द केल्या तर आरक्षणास धक्का लागणार नाही.
————————-
ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या पार्श्वभुमीवर लोकसभा निवडणुका झाल्या.
त्यात ओबीसींनी स्वत:ची स्वत:हून ससेहोलपट करुन घेतली.
ओबीसी मतदान जागृत कधी होणार हे काळ ठरवेल.

किमान शिक्षित ओबीसींनी यापुढे ओबीसी उमेदवारालाच मतदान करण्याचा निर्णय घेतल्यास कुठेही पराजय दिसणार नाही.
आज लोकसभा सभागृहात दिसणारे ३२ आणि विधानसभेत असणारे १६८ सदस्य सभागृहापासून खड्यासारखे दूर होतील.

अगदी आताच्या मुंबई, नाशिक, कोकण शिक्षक व पदवीधर निवडणुकीत हक्काचे मत निष्ठा म्हणून नाही तर व्यवस्थेला विरोध म्हणून वापरा.
बदल हमखास जाणवेल.

निवांत कोळेकर सांगली
ओबीसी बहुजन पार्टी

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button