ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी पीडित कुटुंब समाधान संत्रे जवखेडा दानवे तालुका भोकरदन जिल्हा जालना यांना सोबत घेऊन माननीय विजयजी वडटीवार यांना त्यांचा शासकीय बंगला मुंबई मधील सी सहा मध्ये भेटून निवेदन दिले

ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी पीडित कुटुंब समाधान संत्रे जवखेडा दानवे तालुका भोकरदन जिल्हा जालना यांना सोबत घेऊन माननीय विजयजी वडटीवार यांना त्यांचा शासकीय बंगला मुंबई मधील सी सहा मध्ये भेटून निवेदन दिले
ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी पीडित कुटुंब समाधान संत्रे जवखेडा दानवे तालुका भोकरदन जिल्हा जालना यांना सोबत घेऊन माननीय विजयजी वडटीवार यांना त्यांचा शासकीय बंगला मुंबई मधील सी सहा मध्ये भेटून निवेदन दिले*
सविस्तर चर्चा केली सुरुवातीला प्रकरण त्यांना समजले नाही पण नंतर प्रकरण समजल्यानंतर त्यांनी आम्हाला खाली सोप्यावर बसवून सविस्तर चर्चा करून विधानसभेत हा प्रश्न उचलणार आणि त्यानंतरही त्याचा पाठपुरावा करून आपणास न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले
प्रति, विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य
विषय :- माझ्या कुटुंबावर हल्ला करून, मध्यरात्री घर पाडले, गुन्हा दाखल करूनही आरोपींना कठोर शासन करण्यात आले नाही हो मला कुठलीही आर्थिक मदत मिळाली नाही, मला आर्थिक मदत मिळवून देऊन न्याय देण्याबाबत.
महोदय,
वरील विषयी विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की भी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचे जवखेडा या गावात राहत असून, माझ्या घराच्या जागेवर डोळा ठेवून दिनांक 22/05/2024 रोजी रात्री साडेअकरा वाजता घर पाडून कुटुंबातील व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली, आपण घडलेल्या घटनेची माहिती घेऊन माझ्या कुटुंबाला शेकडो कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष भेट दिली पत्रकार परिषद घेऊन आम्हाला धीर दिला आम्हा कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळवून दिले म्हणून आम्ही आपले ऋणी आहोत यावेळी ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष घेतलेला ग्राउंड रिपोर्ट वृत्तांत त्यांना समजावून सांगितला
माझे घर राष्ट्रीय महामार्ग लगत असून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी 104 स्क्वेअर मीटर एवढी जागा भूसंपादन करून त्या जागेचा मोबदला मला देण्यात आला व उर्वरित जागेत माझे स्वतःचे घर होते आणि त्या ठिकाणी मी राहत होतो, प्रत्यक्षात माझी जागा 1860 स्क्वेअर फुट असून त्यापैकी 1100 स्क्वेअर फुट मी शासनाला दिली होती, परंतु रावसाहेब दानवे यांचे बंधू मधुकर
दानवे हे उर्वरित जागेसाठी आम्हाला मागच्या दोन-तीन वर्षापासून त्रास देत होते व आता रोजी रात्री 22मे 2024 रोजी उर्वरित
जागा व संपूर्ण घर गाव गुंडाच्या साह्याने उध्वस्त करून आम्हाला रस्त्यावर आणली आहे, मध्यरात्री घरात घुसून दहशत निर्माण
केली व संपूर्ण कुटुंबाला जबरा मारहाण करून माझ्या सहित माझ्या भावंडाचे ही हात पाय बांधून नदीच्या कडेला नेण्यात आले,
व जेसीबी चा वापर करून संपूर्ण घर जमीन उध्वस्त करण्यात आले, यासंदर्भात मी हसनाबाद पोलीस स्टेशन या ठिकाणी
तक्रार करूनही मला अद्याप पर्यंत न्याय मिळाला नाही, सध्या माझे कुटुंब रस्त्यावर असून आमच्या डोक्यावरचे छत हिरावून
घेण्याचा प्रकार घडला आहे. अध्याप पर्यंत शासनाकडून मला कुठलीही आर्थिक मदत मिळाली नसून आपल्या मार्फत या घटनेचा पाठपुरावा करून मला
शासनाकडून आर्थिक मदत नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी व या घटनेमध्ये सहभागी असलेल्या आरोपींना कटोरी शासन करून मला
न्याय मिळवून द्यावा.
आपला
समाधान संत्रे
रा. जवखेडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना




