ओबीसी परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष लक्ष्मण दादा ढवळे यांची दिलखुलास मुलाखत

एकूणच बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत आहे त्यानिमित्ताने सत्यशोधक ओबीसी परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष लक्ष्मण दादा ढवळे यांची दिलखुलास मुलाखत आणि बीडच्या राजकारणावरील मनसोक्त गप्पा राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यातील संवाद सर्वांनी ऐकलाच पाहिजे बघितलाच पाहिजे!
बीड लोकसभेसाठी पंकजाताई मुंडे यांना पक्षाने लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे
त्या ओबीसीच्या असल्या तरी आजपर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत माधव
अर्थात माळी धनगर वंजारी या समाजाला केंद्रबिंदू मानून त्या काम करत आल्या आहेत हे तीन समाज म्हणजे संपूर्ण ओबीसी असा त्यांनी समज करून घेतलेला आहे
परंतु नजीकच्या काळात जे अल्पसंख्यांक ओबीसी 12 बोलुतेदार या अंतर्गत येणारा छोट्या छोट्या समूहात विभागलेले ओबीसी वर्ग या वर्गाबद्दल पंकजाताईंकडून कधीही सहानुभूतीपूर्वक त्यांचा विचार त्यांनी कधीच केलेला नाही
आज अशी परिस्थिती आहे की ही ओबीसी मंडळी कळत नकळत त्यांच्यापासून दुरावली जात आहे
ही मंडळी वास्तविक पाहता बीजेपीला मानणारी आहे परंतु जिल्हा पातळीवर या ओबीसींना एक संघपणे बांधून ठेवणाऱ्या नेतृत्वाचा अभाव हा गेल्या अनेक वर्षापासून जाणवत आहे ओबीसी समाजामधे लक्ष्मण ढवळे दादा हे सातत्यपूर्ण जागृतीचे काम करत आलेले आहेत, त्यांनी केलेल्या सर्वे नुसार ओबीसी जातसमूह यावेळेस पंकजाताई च्या किती कामे येईल हे सांगता येत नाही कारण येथील ओबीसींच्या मनात येथे दिलेल्या उमेदवाराविषयी साशंकता आहे संभ्रम आहे या उलट हा संभ्रम दूर करण्यासाठी कोणी प्रयत्नशील असल्याचेही दिसत नाही परिणामी आपली एक सीट बीड लोकसभा जाती की काय इतपत शंका घेण्यास वाव आहे
तेव्हा आमची विनंती आहे की येथील ओबीसींना विश्वासात घेऊन योग्य त्या व्यक्तीच्या पारड्यामध्ये ही वजन कशा पद्धतीने टाकता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे
आम्हाला देखील मनातून वाटते ही एक सीट आपली कमी होता कामा नये या जागेसाठी खुप अटीतटीचे प्रयत्न करावे लागतील बीड लोकसभेची परिस्थिती अतिशय गंभीर आहे त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे कारण
मराठा मतदान जरांगे फॅक्टर मुळे किती आपल्या सोबत राहील हे आज तरी सांगता येत नाही
परंतु आपला जो पारंपारिक मतदार आहे त्याची नाराजी दूर करून त्याला बीडच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे हे आपण करू शकतो,आज बीडची परिस्थिती… 2014 पेक्षा अतिशय भयानक झालेली आहे कारण जंरागेंनी मराठा आरक्षणाच्या मागणी साठी मराठा समाजाची माथी भडकून
ठेवली आहेत त्यामुळे ओबीसी समाजामधे अंगार फूलवणाराची आज गरज आहे, मराठ्यांच्या प्रत्येक
घरात आज एकच नारा दिला जातोय आणि तो म्हणजेच
— ‘ वाजवा तूतारी “—-
—” हटवा वंजारी “—
या पार्श्वभूमीवर पंकजाताई व त्यांचे
स्टार प्रचारक काय काय करतात
हे पाहूया , आम्हास म्हणजेच ओबीसी समाजास पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी
हवे आहेत, त्या अनुषंगानेच बीड
लोकसभा भाजपा जिंकणे आहे
जय ओबीसी
नमो नमो
लक्ष्मण ढवळे दादा
मराठवाडा विभागीय अध्यक्ष
सत्यशोधक ओबीसी परिषद
शिवक्रां
ती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१।

