लढाई अस्मितेची

*लढाई अस्मितेची*
*ओबीसींच्या हक्काची.*
ओबीसी मतदारांनो,
*मानसीकता बदला खासदार बदलेल.*
माझे एक मत निश्चितपणे आपल्या आरक्षण संरक्षणासाठी झटणारा खासदार करु शकते. याची जाणीव प्रत्येक व्हायला हवी.
ज्यांनी चार -पाच महिन्यात आरक्षण गिळंकृत केले, आज अपणास समजणार नाही पण होत्याचे नव्हते केले, ते मोठा पक्षाचा ब्रॅंड घेवून,
मोठा लवाजमा घेवून,
टिव्हीमेडीया/प्रिंट मेडियातून वारंवार बातम्यातून प्रचाराचा पाऊस पाडून,
वारेमाप अर्थाचा वापर करुन तुमच्या मतापर्यंत येतील…
तुम्ही या माहोलात पुढील दिड एक महिना मती भ्रष्ट होऊ देवे नका.
आरक्षण गेले आहे, आपण, आपली पुढील पुढील रस्त्यावर ह्यांनी आणली आहे, हे आपण मत देईपर्यंत कदापी विसरु नका. नसल्यास नाशास आपणच कारणीभुत होवू.
ज्यांनी आरक्षण गिळंकृत केले त्याला मत दिल्यास आरक्षण घालविण्यास आपणच सामील आहोत, आपणासच देशोधडीला लागायचे आहे असा अर्थ होईल.
आपण आपले, आपल्या घरातल्यांचे आपल्या सार्या सग्यासोयर्यांचे मत त्यांना मिळणारच नाही यासाठी महतप्रयास करा.
हा दिड महिना आपला ओबीसीच्या संरक्षणाचाच खासदार सभागृहात पाठविण्यासाठी जास्तीतजास्त ओबीसी मतदारापर्यंत स्वत: जावा. एकही ओबीसी मत आरक्षण गिळंकृत करणार्यास दिले जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्या.
आपले मत “कुर्हाडीचा दांडा गोतास काळ” होणार नाही याची काळजी घ्या…
ओबीसी नेतृत्वांनी दिलेला कोणताही उमेदवार, कितीही सामान्य असला तरीही त्यालाच आपले द्या.
निश्चितपणे तो उमेदवार खासदार होईल.
लोकसभेत एकही मत आरक्षण विरोधकास देवून वाया घालवू नका,
याचि परिणार निवडणुकीनंतर जाणवेल.
विधानसभा निवडणुक असल्याने सरकार लोकसभेनंतर तात्काळ चार महिन्यात ओबीसींवरील अन्यायी आदेश रद्द करेल.
फत्क तुमचे एकही मत ओबीसी आरक्षण विरोधकास गेले नाही पाहिजे.
आता मताची ताकद दाखवा,
आरक्षण कुठलाही मोर्चा, कुठलेही निवेदन, कुठेही आंदोलन न करता पुर्वीप्रमाणे अबादित ठेवा..




