माळी समाज केव्हा जागा होईल? महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा असणारा माळी समाज हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये इतका मागे का ? यावर अनेकदा अनेकांनी आपले विचार मांडले

माळी समाज केव्हा जागा होईल? महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा असणारा माळी समाज हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये इतका मागे का ? यावर अनेकदा अनेकांनी आपले विचार मांडले .अनेक वर्ष लोटली तरीही परिस्थिती जशाच्या तशीच आहे. काटोल ,वरुड,कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये कधी नव्हे ते आता काही राजकीय मंडळी सामोरे येत आहे .आपल्या भागातून राजकीय पक्ष तिकीट देत नाही म्हणून उभे राहायचं नाही का? राजकारणी मंडळी माळी समाजाला कधीही तिकीट देऊ शकत नाही. कारण की आपली ही एकी राजकीय दृष्ट्या अजूनही झालेली नसावी ,परंतु आता आपण जागृत व्हायला हवे.
आपल्या लोकांसाठी, पुढील पिढीसाठी आपण आवाज केलाच पाहिजे यावेळी आमदार ,खासदार आपल्या भागामधून निवडून येण्यासाठी ,उमेदवारी मिळण्यासाठी आपण आवाज नक्कीच करायला हवा, जेणेकरून आपल्या माळी समाजाचा दबदबा तयार होण्यासाठी आणि सर्व गुण असुनही राजकारणामध्ये मागे असणाऱ्या अनेक युवकांना संधी सुद्धा मिळू शकते.त्यासाठी आपण गुण-दोष न पाहता मागणी तर करू शकतो ना ! इतरांसाठी आपल्या चपली कशाला झिजवायच्या? ..चला तर आप-आपल्या भागासाठी माळी समाजाला उमेदवारी मिळण्यासाठी आपण पुढाकार घेऊ या…..
जय ज्योती, जय क्रांती शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा

