सोशल

आरक्षणाची गरज कोणाला? जमीनदार मराठ्यांना की, विस्थापित भटक्या मरिआई कोळ्यांना!!!

आरक्षणाची गरज कोणाला? जमीनदार मराठ्यांना की, विस्थापित भटक्या मरिआई कोळ्यांना!!!

संपूर्ण प्रत्यक्ष पाहणी रिपोर्ट-खुपसंगी
*खुपसंगी:-शंकरराव लिंगे –

आरक्षणाची गरज कोणाला? जमीनदार मराठ्यांना की, विस्थापित भटक्या मरिआई कोळ्यांना!!!*

संपूर्ण प्रत्यक्ष पाहणी रिपोर्ट-खुपसंगी
खुपसंगी:-शंकरराव लिंगे – भाग-३रा

मरिआई कोळी समाज प्रत्यक्षात महादेव कोळी असताना महाराष्ट्रात त्यांना एस.टी चे आरक्षण सर्टीफिकेट मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये त्यांना एन.टी-ब (ओबीसी) मध्ये घातले आहे. हा समाज सुमारे ७० वर्षापूर्वी तेलंगणातून महाराष्ट्रात स्थलांतरित झाला आहे. त्यांची संख्या खूपसंगीत आज 900 शे च्या आसपास आहे. त्याची पूर्ण माहिती- भाग-१ मध्ये दिली आहे. असाच एक समाजाचा गट खुपसंगी तालुका, जिल्हा सोलापूर येथे ७० वर्षापासून गावाच्या बाहेर राहत आहे.

गावठाण नसल्यामुळे जागा मालक त्यांना जागा सोडण्याबद्दल, तगादा लावू लागले.म्हणून सर्वांनी एकत्र येऊन चार एकर – जमीन विकत घेवून त्याठिकाणी राहत आहेत. पुरावा नसल्यामुळे त्यांना कोणताही दाखला, सवलती मिळत नाहीत. घरकुल मिळण्यास अडचण येत आहे. सध्या ज्या जागेत राहत आहेत त्या जागेवरही मूळ मालकाचे अतिक्रमण आहे. अतिशय अपुऱ्या जागेमध्ये काडाच्या कुडाच्या, पत्र्याच्या घरामध्ये हा समाज कसा राहत आहे. कळत नाही उन्हाळ्यात पत्रा गरम होतो, थंडीत गार होतो, पावसाळ्यात – गळतो, गटार व्यवस्था नाही, त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते. दास माशा तर पाचवीला पुजले आहेत मरणयातना सोसाव्या लागतात. अनेक प्रकारच्या रोगराईला सामोरे जावे लागते.

अठरा विश्व दारिद्रय,गरीबी बेकारी, भुकमारी शिळे-पाके खावून अत्यंत मानहानीकारक जीवन जगावे लागते. पारंपरिक व्यवसाय देवी डोक्यावर घेवुन, कडकलक्ष्मीचा वेष धारण करून, मोठ्या चाबकाने आवाज काढून स्वताला बडवून घ्यावे लागते. टोकदार दाभणाने दंडामध्ये टोचून रक्तबंबाळ करावे लागते.आणि रक्त आल्या नंतर महिलेच्या तोंडामध्ये हात देवून पैशाची, कपड्याची, धान्याची मागणी दानधर्म म्हणून करावी लागते. यावेळी महिलेच्या डोक्यावर देवीचे कपाट, पाठीवर लहान बाळ झोळी करून बांधलेले असते.दोन्ही हातांनी गुबगुबू आवाज करणारे ढोलकी सारखे वाद्य वाजवावे लागते

.महिला मोठ्या कसरतीने बॅलन्स राखून डोक्यावरील दोन अडीच फूट उंचीचे देवीचे कपाट हात न धरता वाद्य वाजवत रक्ताळलेला दंड तोंडात धरून पुरुषांच्या मागे दानधर्म मागण्यासाठी फिरतात नोव्हेंबर ते जून सहा महिने पश्चिम महाराष्ट्रात फिरून सुगीच्या दिवसात धन-धान्य, कपडे,दान धर्म मिळालेले साहित्य घेऊन पावसाळ्यात मूळ गावी खूपसंगीला येतात. शिक्षण नाही, कोणाचेही मार्गदर्शन नाही, कुटुंब नियोजन नाही,नोकरी धंदा नाही, सरकारच्या कसल्याही सवलती नाहीत.एका-एका जोडप्याचे चार ते बावीस पर्यंत मुले असल्याचे समजते.

दान धर्म मिळालेले धन धान्य पावसाळ्यात पुरत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होतात. नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज, कौटुंबिक समस्या, वर्षातून एकदा जात पंचायत, श्रावण महिन्यात जो न्याय निवाडा होईल त्याप्रमाणे सर्व समाजाला बंधनकारक असते. रेशन कार्डाची फोड होत नाही.त्यामुळे मोफत धान्य मिळत नाही. कमी मिळते कधी मिळत नाही मोफत धान्याची वाटमारी होते रहिवाशी दाखला, जातीचा दाखला, स्वताची जमीन जागा नसल्यामुळे मुलांना शिक्षणाच्या सवलती मिळत नाहीत. आश्रमशाळेत प्रवेश मिळत नाही. लाडकी बहीण लाडका भाऊ योजनेमध्ये सर्वांना भाग घेता येत नाही. मुलांना नोकरी नाही,उद्योगधंद्यासाठी कर्ज मिळत नाही.

आत्ता या भटक्या समाजाची तरुण मुलं सेंट्रींग काम हॉटेलात,शेतावर मोल मजुरी करू लागले आहेत काच,पत्रा, बाटली,टाकाऊ वस्तु,रद्दी,भंगार, केसावर फुगे गोळा करणे विकण्याचाही व्यवसाय करू लागले आहेत. हा व्यवसाय करतानाही गावोगावी नागरिकांमार्फत त्रास दिला जातो. चोरीच्या संशयावरून पोलीस शोषण करतात.महिला व काही कुटुंबकर्ते आत्ता टोळीने एकत्रित येऊन गटागटाने शेतीची कामे,मोलमजुरी ऊसतोड कामगार म्हणूनही साखर कारखान्याच्या परिसरात कामाला जातात त्या ठिकाणीही अन्न,वस्त्र, निवाऱ्याची परवड होते.मुलांचे शिक्षण होत नाही

.एकंदरीतच या समाजाचा वाली कोणीही नाही. त्यांच्या वस्तीवर नळ,पाणी गटारी योजना,अंतर्गत रस्ते आरोग्य, स्वच्छतागृह यांची सोय नगण्य आहे. आमदार, खासदार, ग्रामपंचायत नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीच्या वेळी येऊन साम-दाम-दंड-भेद निती वापरून मतदान करून घेतात त्यानंतर कोणतीही दखल घेण्यात येत नाही.अशी खंत मरीआई समाजातील जाणकारांनी व्यक्त केली.

मरीआई समाजासाठी आदिवासी किंवा एस.सी.मध्ये समावेश करावा. त्वरित एक तज्ञ समिती नेमून यांना सर्व सोयींनी युक्त वसाहत उद्योग व्यवसायासाठी कर्ज ,अनुदान,नळ पाणी,आरोग्य सुविधा,गटार व्यवस्था, आश्रम शाळा,घरकुल सर्व शासनाच्या सोयी सुविधा त्वरित मोफत द्याव्यात.असा हा वंचित पीडित समाज यांना सत्तर वर्षांपासून दाखले मिळत नाहीत. परंतु जमीनदार मराठ्यांना एका रात्रीत जीआर काढून सरकार दाखले देते, मागासवर्गीय आयोग नेमून आरक्षण देते,आर्थिक महामंडळ देते वस्तीग्रह देते , उच्च शिक्षणासाठी सारथी योजना देते.

या जमीनदार मराठ्यांना या सोयी इतक्या तत्पर्तने मिळतात मग या वंचितांना का मिळत नाहीत? जमीनदार मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे का मरीआई कोळी सारख्या भटक्यांना शेवटच्या पंक्तीतील,शेवटच्या माणसाला गरज आहे का नाही? का सत्ताधारी मराठ्यांनाच आरक्षण पाहिजे? हे मराठे या वंचित भटक्या समाजाच्या (ओबीसी)मधून आरक्षण मागत आहेत.
ही मागणीफुले,शाहू,आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारी आहे का?असा संतप्त सवाल मरीआई कोळी भटक्या समाजाने केला आहे.

प्रत्यक्ष पाहणी रिपोर्ट शिवक्रांती टीव्ही, दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी संकलित केला आहे.पुढील चौथ्या भागात मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर येथील मरीआई कोळी समाजाचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल लवकरच प्रकाशित केला जाईल. हा लेख सर्वांनी वाचून विचार केलाच पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केले आहे.
सोबत व्हिडिओ फोटो पहा

***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button