सोशल

मंडलनामा क्रमशः 47.औरंगाबादकरांनी स्वीकारले

मंडलनामा क्रमशः

47.औरंगाबादकरांनी स्वीकारले

औरंगाबाद येथील पहिला मेळावा नेहरू भवनमध्ये १५ जानेवारी १९९५ रोजी आयोजित केला होता. संघटना विस्तार मोहिमेत हा दुसरा राज्यव्यापी मेळावा होता. हा मेळावा आमखास मैदानात घ्यायचा होता. पण मेळाव्याची घोषणा केल्यानंतर तेथील काही मुस्लिम कट्टरवाद्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. विरोधाचे मुद्दे जुनेच होते. ओबीसी प्रवर्गाचे लाभ घेण्यासाठी मुस्लिमांना राजी करणे हे आमचे कर्तव्य होते. औरंगाबादमधील विरोधक धार्मिक मुद्दा सोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे खुल्या मैदानातील मेळावा मैदानासमोर असलेल्या नेहरू भवन येथे स्थलांतरित केला. या मेळाव्यासाठी आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध नेते प्रा. अरुण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्याचे तत्कालीन समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनाही निमंत्रण दिले होते, पण कार्यबाहुल्ल्यामुळे ते आले नाहीत. हा मेळावा आयोजित करण्यात व्हिडिओकॉन कंपनीतील कर्मचारी महबूबभाई, पत्रकार गजनफर जावेद व जहिरोद्दीन सिद्धिकी, आंबेडकरी नेते व नगरसेवक रतनकुमार
पंडागळे यांचे मोठे सहकार्य मिळाले.

मेळाव्याला राज्यभरातून संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहिले. नेहरू भवन पूर्ण भरले. मेळावा उधळून लावण्यासाठी विरोधकांनीही काही लोक मेळाव्यात घुसवले होते. मेळावा सुरू झाल्यानंतर त्यांनी गडबड सुरू केली. मंचावरील रतनकुमार पंडागळे यांच्या कार्यकत्यांनी त्यांना रोखले. त्यांची झडती घेतली असता दगड सापडले. म्हणजे दलित कार्यकर्त्यांनी संभाव्य दगडफेक रोखली. आरक्षणामुळे समाजाचा कसा लाभ होतो, हे पटवून देण्यासाठी आम्ही मेळाव्यांमध्ये आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना आमंत्रित करत असू. माझी प्रेरणाही फुले-आंबेडकरी आहे. या मेळाव्यात सर्व वक्त्यांनी ओबीसोंचे लाभ घेण्यासाठी मुस्लिम धर्माची आडकाठी कशी येत नाही, यावर भर दिला. ओबीसी प्रमाणपत्र घेणे म्हणजे मुस्लिम धर्माला विरोध होत नाही. तुम्हाला धर्माच्या नावाने बहकावण्यात आले आहे, हे मी ठासून सांगितले. मेळावा शांततेत पार पडला. मात्र अपेक्षित परिणाम झाला नाही.

कालांतराने अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र काढून लाभ घेण्यास सुरुवात केली. त्याला औरंगाबादकरांचाही अपवाद नाही. शिक्षण व नोकऱ्यात लाभ मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संघटनेला औरंगाबादमध्ये होणारा विरोध कमी कमी होत गेला. नेहरू भवनच्या मेळाव्यानंतर तीन वर्षांनी १३ जून १९९८ रोजी शहागंजमध्ये चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित केली. खुल्या मैदानात झालेल्या या सभेला शेकडो मुस्लिमांनी उपस्थिती लावली. तीन वर्षांत वातावरण एवढे बदलले की, ज्या शहरात मला विरोध होत होता, तेथे इज्जत मिळण्यास सुरुवात झाली. शब्बीर अन्सारी यांचे काम ‘नफीलची नमाज’ पढण्यासारखे आहे, या शब्दांत दिलीपकुमार यांनी माझ्या कामाचा गौरव केला. पुण्य मिळवण्यासाठी नफीलची नमाज पढली जाते.

***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button