शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोला विधानसभेसाठी कैलास वाशी गणपतरावजी देशमुख साहेब यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपला अर्ज निवडणूक अधिकारी सांगोला यांच्याकडे भरला!..

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोला विधानसभेसाठी कैलास वाशी गणपतरावजी देशमुख साहेब यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपला अर्ज निवडणूक अधिकारी सांगोला यांच्याकडे भरला!..
अर्ज भरताना बाबासाहेब देशमुख म्हणाले 2024 विधानसभेची निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असणार असल्याचे सांगितले शासन प्रशासन यांच्यावर ताण पडू नये म्हणून वाजा गाजा गर्दी न करता मिरवणूक न काढता प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख,डॉ. निकीताताई देशमुख,शोभाताई पाटील,चिटणीस दादाशेठ बाबर,प्रा.विठठलराव शिंदे सर,सूतगिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी,माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर,उद्योगपती बाळासाहेब एरंडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि.रमेश जाधव,मार्केट कमिटीचे चेअरमन समाधान पाटील,माजी नगरसेवक पप्पू उर्फ प्रशांत धनवजीर,अॅड.नितीन गव्हाणे, नंदकुमार शिंदे,उद्योगपती अरुण पाटील,जेष्ठ नेते प्रभाकर चांदणे, संजय इंगोले,अॅड.विशालदिप बाबर इ.मान्यवर उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना डॉ.बाबासाहेब देशमुख पुढे म्हणाले की,स्व. आबासाहेबांनी तालुक्यामध्ये नाही रे घटकांचे प्रतिनिधीत्व केले,तोच वारसा विचार टिकविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे गेल्या ५ वर्षामधील परिस्थितीची प्रत्येकाला जाणीव आहे,त्यामुळे जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.शेतीला पाणी, शेतीमाल पिकाला व दुधाला भाव मिळाला पाहिजे आणि केजी ते पीजी चांगले शिक्षण मिळाले पाहीजे,हा विचार पुढे ठेवून तालुक्याचे विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करणार आहे.स्व.आबासाहेबांनी पुरोगामी विचार तालुक्यात टिकवला.तालुक्यातील जनता ही निष्ठावंत व स्वाभिमानी असल्यामुळे सांगोल्यात लाल झेंडा फडकेल,असा ठाम विश्वासही डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला.
खरंतर बाबासाहेब देशमुख आणि कार्यकर्त्यांनी गेले पाच वर्ष तालुक्यात निरंतर काम केले आहे सर्व जनतेच्या सुखा दुःखामध्ये नेहमीच सामील झाले आहे अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी ठामपणे भूमिका घेऊन त्यांना बळ दिले आहे पाठिंबा दिले आहे त्यातून जनतेची सोडवणूक करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे तालुक्यातील जनतेची सेवा केली आहे तालुक्यातील पुरोगामी जनतेची सुरक्षिता जान मालमत्ता याचे कार्यकर्त्यांच्या मदतीने संरक्षण केले आहे सांगोला तालुक्यामध्ये तिरंगी लढत होण्याची जास्त शक्यता आहे त्यामध्ये नेहमीचे सहकारी दीपक आबा साळुंखे पाटील शिवसेनेच्या तिकिटावर उभा राहिले आहेत राज्य पातळीवर शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीची युती असताना साळुंखे पाटील यांना तिकीट दिलेले आहे त्याचा फायदा नक्कीच शेतकरी कामगार पक्षांना होईल साळुंखे पाटील हे
शहाजी भोसले पाटलांची 50% पेक्षा जास्त मते खातील मराठा मताचे विभाजन होईल दलितांची धनगरांची आणि ओबीसींची मते लिंगायत अल्पसंख्यांकां मुस्लिमांची मते सुज्ञ पुरोगामी विचारवंत मराठ्यांची मते शेतकरी कामगार पक्षाला मिळतील स्व गणपतराव देशमुख आबा यांनी केलेल्या साठ वर्षातील विकास कामे यांच्या जोरावर शेतकरी कामगार पक्षाचे पारडे भक्कम झाले आहे दीपक आबा दोन नंबरला राहतील आणि काय गाडी काय काय झाडी डोंगर खोके ओके बहाद्दर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू भोसले पाटील यांनी तालुक्याचा संधी असूनही विकास केला नाही तरुणांसाठी रोजगार निर्मिती केली नाही तालुक्याला एमआयडीसी मंजूर असताना तालुक्यातील एमआयडीसी चालू केली नाही गोवा दिल्ली, गोवा नागपूर गोवा हैदराबाद गोवा कानपूर कोल्हापूर सांगोला गोहाटी रेल्वेच्या नव्या गाड्या चालू केल्या नाहीत पाण्याच्या सुविधा पूर्णपणे कार्यान्वित केल्या नाहीत सर्व नदी नालेवड्यामधील वाळू संपविले वाळू माफियास त्यांच्या कार्यकर्त्यास संरक्षण दिले मुंबई सुरत गुहाटी नुसते फिरत राहिले काय गोवा काजू काय माणिकचंद काय हॉटेल काय खाना पिना जेवण काय पाणी काय खाणं पिणं करत राहिले त्यामुळे यावेळी त्यांना निम्म्यापेक्षा कमी मतं पडतील सांगोला तालुक्यात विधानसभेची निवडणूक तिरंगी होऊन शहाजी भोसले पाटील तिसऱ्या नंबरला फेकले जातील आणि शेतकरी कामगार पक्षाचा प्रचंड विक्रमी बहुमताने विजय होईल यात शंका नाही .
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

