महाराष्ट्र

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ओबीसी महामेळावा

ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ओबीसी महामेळावा आज संपन्न झाला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ही केवळ एक समाजाची नसून ती समाजातील सर्वच घटकाची आहे. समता परिषदेमध्ये माळी, दलीत, तेली, चांभार, कुंभार, मुस्लिम सर्वच समाजाचे प्रतिनिधी यात आहेत.

[gspeech-button]

ओबीसी आरक्षणाच्या लढाईत समता परिषद मागे हटणार नाही. संविधानाने दिलेल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी शेवटपर्यंत लढणार, हा निर्धार दृढ करून महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे, तो टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन यावेळी केले.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण कमी होत आहे. त्यामुळे आरक्षणाची लढाई संपलेली नाही. आम्ही शेवट पर्यंत लढू आणि ओबीसी घटकाचे आरक्षण कमी होऊ देणार नाही असे ठाम मत व्यक्त केले.

यावेळी आमदार राजू भोळे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ, उपाध्यक्ष ईश्वर बालबुधे, बाळासाहेब कर्डक, सुभाष राऊत, सत्संग मुंढे, कल्याण दळे, मुकुंद सपकाळ, दिवाकर गमे,अनिल निकम, वसंत पाटील, विजय महाजन, शंकरराव लिंगे, अनिल महाजन, सतीश महाजन, शाळीग्राम मालकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button