सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः भाग चार हा लेख दररोज सर्वांनी वाचलाच पाहिजे!

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
क्रमशः भाग चार हा लेख दररोज सर्वांनी वाचलाच पाहिजे!
🟡🟡🟡🟡🔴🔴🔴🔴🙏🙏🙏🙏💐💐💐💐👇👇👇👇
नेतात, आजच्या ओबीसी मध्येच आरक्षण द्या या अतिरेकी स्वविवेकीन आंदोलनामध्ये समतेची चळवळ, बंधुत्वाचे विचार, सामाजिक दुसरीकडे ओबीसी बांधवही भीतीपोटी आत होत असल्याचे त्यांचे प्रतिपादन महत्त्वाचे आहे. ओबीसींना शत्रू मित्रताधी व्यायाची लत्ते कुठेच दिसत नाहीत. तर ते शोषकांच्या बाजूनेच जाताना दिसतात. तसेच गमलेली कारागिरी जातीगत व्यवसायातून स्वतंत्र उद्योजक बनण्याची मानसिकता हा ओकण होत नाही. अजूनही ते। समाज बाळगत नाही, अशी कणखर टीका ते ओबीसीतर करतात. सद्य परिस्थितीवर त्यांनी उपाययोजनाही दिली आहे, हे उल्लेखनीय आहे.



शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही या लेखात रमेश बीजेकर यांनी दोन निष्कर्ष काढले आहेत. पहिला म्हणजे जातनिहाय जनगणनेला विरोध करून त्यातून जातिव्यवस्था बळकट होण्याचा तर्क नवब्राह्मणवादी मांडत आहेत. दुसरा म्हणजे जातियाशिवाय आरक्षणाला अर्थ उरत नाही, आमच्या प्रत्येक लढ्यात शिक्षणा असा जोडूनच पुढली वाटचाल करावी लागेल. ब्राह्मणी-भांडवली व्यवस्थेने बंदीचे हत्यार उपसले आहे. या शिक्षणबंदी विरोधी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाती भूमिका आपण घेऊया.’

मराठा पेचप्रसंग’ या लेखात विवेक घोटाळे यांनी शेतकरी जातींना आरवाण मागण्याची वेळ का आली ? याची चर्चा केली आहे. शेती, रोजगार, शिक्षण या पेड प्रसंगातून समोर येणाऱ्या परिणामातून पुढे येणारी मागणी म्हणजे ‘आरक्षणाची मागणी होय’ तसेच मराठा – ओबीसी संघर्षाची बीजे कशात आहेत याचें चपखल भाष्य ते लेखात करतात. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाकयुध्दाने दोन्ही समाजात तेढ निर्माण झाली आहे. पुढील दिशाही तणावग्रस्त असणार आहे याची जाणीव विवेक घोटाळे करून देतात.

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि वास्तव’ या लेखात डॉ. रेणुकादास उबाळे यांनी मराठा – ओबीसी आरक्षण युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्वेषभावना टोकाला गेल्याचे निरीक्षण नोंदवून त्यावर उपाययोजना ही सांगितली आहे. ‘वैदिक ब्राह्मणी संस्कृतीला नकार, समानतेची वाट चोखळणाऱ्या वारकरी व इतर अब्राह्मणी संस्कृतीशी आपण सर्वांनी वाट चोखळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. थोडक्यात धार्मिक व सांस्कृतिक प्रबोधनातून या प्रश्नाला कायमचे उत्तर दिले पाहिजे असे ते म्हणतात. ‘आजच्या मराठा आरक्षण प्रश्नाच्या मुळाशी सुद्धा जाती अंतर्गत वर्गकलह हे कारण असल्याचे स्पष्टपणे जाणवते. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी मराठा जातीतील वर्गकलहासंबंधी वाडीवरचा मराठा, वाड्यावरचा मराठा व गढीवरचा मराठा
🟠🟠🟠🟠
🔴🔴🔴🔴
🟡🟡🟡🟡

अशी मार्मिक वर्गरचना सांगितली आहे. तसेच ‘मुळातच आरक्षण विरोधी असणाऱ्या व झुंडशाहीचे मानसशास्त्र खोलातून न जाणणाऱ्या ब्राह्मणी भांडवली शक्तीला जात वर्गीय ध्रुवीकरणातून आपले राजकीय हित साधता येणार आहे. हे महाराष्ट्रातील तमाम जनतेने वेळीच ओळखले पाहिजे असे डॉ. उबाळे सांगतात व पुढील जनआंदोलनाची प्रारूपे कशी हवीत याचेही दिशानिर्देशन करतात.

ओबीसी मराठा आंदोलन काही महत्त्वाची निरीक्षणे…!’ या लेखात डॉ. प्रल्हाद सुलेकरांनी अनेक महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. मराठ्यांसाठी आटापिटा करणाऱ्या सरकारला त्यांनी विचारलेला प्रश्न अनुत्तरीतच आहे ते म्हणतात ‘कधीही अंगभर वस्त्र आणि पोटभर अन न न मिळणाऱ्या ओबीसी जातींची चिंता शासनाला का वाटत नाही ? गेल्या दहा वर्षात मणिपूरसह देशभर जातीय हिंसा कमालीच्या वाढल्या आहेत. जातीनिहाय जनगणना आवश्यक असताना नाकारली जाणे हे राजकारण ओबीसींच्या पुढील कैक पिढ्यांचा बळी घेणारे आहे. असे सूचक विधान ते करतात.

आरक्षण धोरण, वास्तव आणि अपेक्षा’ या लेखात डॉ. सुधाकर शेलार यांनी राजकीय आरक्षण नसले तर उपेक्षितांना सत्तेत येण्याची संधीच मिळणार नाही. हा निष्कर्ष काढला असून केवळ आर्थिक आधारावर आरक्षण मागणाऱ्यांचा बुरखा फाडला आहे. तसेच सर्व आस्थापनाचे आणि संस्थांचे राष्ट्रीयीकरण करण्याची मागणी केली आहे. खाऊजा धोरण राबविणाऱ्या प्रस्थापितांना हे कसे जमेल ही शंकाच आहे.

‘बिहार जातनिहाय जनगणना ओबीसी चळवळीचे जात्यांतक क्रांतीपर्व या लेखात श्रावण देवरे यांनी ब्राह्मणी व अब्राह्मणी अशा दोन परस्पर विरोधी छावण्या कार्यरत असून जातनिहाय जनगणनेच्या संदर्भात आपली भूमिका निःसंदिग्ध शब्दात व्यक्त केली आहे. अब्राह्मणी छावणीच्या योगेंद्र यादवांच्या मांडणीचा हवाला देऊन जातनिहाय जनगणनेचा संबंध थेट जातीअंताच्च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयाशी जोडतात. बिहार प्रमाणे महाराष्ट्र सरकार जातनिहाय जनगणना न करण्याचे कारण ही त्यांनी स्पष्ट केले आहे. पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर जातनिहाय जनगणना बंद करून ओबीसी वर्गावर अन्याय केल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण ते नोंदवितात. १९९६ साली देवेगौडा सरकारने ओबीसी जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर करून योग्य दिशेने पाऊल टाकले होते. मात्र देवेगौडा सरकार अल्पकाळ राहिले. बिहारमध्ये नितीश कुमारांनी मात्र जातनिहाय जनगणना करून नव्या जात्यांतक पर्वाला सुरुवात केल्याचे ते सांगतात. क्रमशः
भाग चार
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button