सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.100

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.100
चौबळ व्ही. बी.
अॅड. विठ्ठल बंधूजी चौबळ हे अमरावती जिल्ह्यातील सत्यशोधक असून, सत्यशोधक डॉ. पंजाबराव देशमुखांचे एकनिष्ठ सहकारी होत. नोव्हेंबर १९२७मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली, अमरावती येथील प्रसिद्ध अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह सत्यशोधक आणि अस्पृश्य समाजाच्या वतीने करण्यात आला. अवघ्या तीन महिन्यात अस्पृश्य बांधवांना अंबादेवी मंदिरात प्रवेश खुला करण्यात आला. या सत्याग्रह समितीचे अॅड. व्ही. बी. चौबळ एक सदस्य होते.
इ.स. १९४० साली, भालजी पेंढारकरांचा ‘भगवा झेंडा’ चित्रपट महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात ओढूनताणून (अन् ऐतिहासिक) कुळवाडीभूषण शिवाजीराजांचे गुरू रामदास स्वामी असल्याचे प्रसंगानुसार चित्रित करण्यात आले होते. या अन्यायी चित्रणाच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी सत्यशोधकांनी आंदोलन उभे केले होते. अमरावती येथेही राजकमल सिनेमागृहात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटप्रसंगी आणि शिवाजी रामदास चित्रणाच्या प्रसंगी सत्यशोधक वीर उत्तमराव मोहिते यांनी पडदाच सुऱ्याने कापून काढला. या क्रांतिकारी आंदोलनात चौबळ सहभागी होते.
इ.स. १९३३मध्ये विदर्भात सत्यशोधक समाजाचा हीरक महोत्सव साजरा करण्यात आला. नागपूरकर सत्यशोधक बाबूराव भोसले यांच्या संपादकत्वाखाली एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या कार्यकारी मंडळाचे चौबळ हे अध्यक्ष होते. पुढे डॉ. पंजाबराव देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली ‘शेतकरी संघ’ स्थापन करण्यात आला. या संस्थेचे चौबळ हे उपाध्यक्ष होते. तसेच २८ जून १९३० मध्ये स्थापन झालेल्या गणेशपेठ, नागपूर येथील ‘अनाथाश्रम’ संस्थेचे चौबळ उपाध्यक्ष होते.
संदर्भ – १. युगप्रवर्तक डॉ. भाऊसाहेब देशमुख अॅड. अप्पाराव मैंद, २. वऱ्हाड मध्यप्रांत सत्यशोधक हीरक महोत्सव प्रांतिक ज्युबिली ग्रंथ- संपादक बाबूराव भोसले, ३. सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ – संपादक – माधव खंडेराव बागल
(सतरा)
छायाचित्र आता रद्द झाले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाईंचेही एक चुकीचे छायाचित्र प्रस्तृत झाले होते. आपण सत्यशोधक पालकर यांच्या संग्रहातील निगेटीव्हवरून सावित्रीबाईंचे अस्सल चित्र मिळवून त्यावरून तेजस्वी तैलचित्र तयार करून घेऊन त्याला शासन मान्यता मिळवून दिल्याने आता ते मागे पडले आहे. सावित्रीबाईंचे हे रंगीत तैलचित्र सर्व शासकीय कार्यालयात आणि शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांत लावण्याचा शासनादेश काढण्याच्या कामी छगन भुजबळ यांचे मौलिक मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शासनातर्फे प्रकाशित महापुरुषांच्या “छायाचित्र मालिकेत ” या छायाचित्राचा आता समावेश झाला आहे. हे छायाचित्र मंत्रालयासकट सर्वत्र झळकले आहे. त्याचे टपाल तिकीट काढले जावे
यासाठी आपण भारत सरकारच्या टपाल खात्याकडे खूप प्रयत्न केले. त्याला यश येऊन सावित्रीबाईंचे टपाल तिकीट काढण्यात आले. न्हाव्यांच्या संपात सावित्रीबाईंचे विश्वासू सहकारी म्हणून कार्यरत असलेले सत्यशोधक नेते, नारायण मेघाजी लोखंडे यांची स्मृती कायम रहावी यासाठी आपले नारायण मेघाजी लोखंडे प्रतिष्ठान कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून लोखंडे यांचेही टपाल तिकीट काढण्यात आले. त्याचे प्रकाशन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्लीत झाले. लोखंडे यांचे चरित्रकार मनोहर कदम यांचे कर्करोगाने अकाली निधन झाले. त्यांनी लिहिलेल्या लोखंडे चरित्राचा हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद करण्याचा समितीचा प्रयत्न आहे. सावित्रीबाईंच्या लेकींचा वारसा चालविणाऱ्या आणि त्यांचा अर्धपुतळा पुण्यात उभा करणाऱ्या फुलवंताबाई झोडगे आणि सत्यशोधक चळवळीचे इतिहासकार दादासाहेब झोडगे यांचे निधनही चटका लावून गेले.
सावित्रीबाईंचा जन्म नायगांव येथे ज्या घरात झाला त्याची संपूर्ण पडझड झालेली होती. गावातील लोक त्याठिकाणी कचरा टाकत असत. नेवशे मंडळी दि. ३ जानेवारीला तात्पुरती साफसफाई करून जयंतीचा कार्यक्रम करीत आणि पुन्हा तो उकिरडा कायम राही. मधल्या काळात काही मंडळींनी गावातील दुसऱ्याच एका ठिकाणी एक छोटासा पुतळा बसवला आणि त्यालाच सावित्रीबाई फुले स्मारक असे नाव दिले. छगन भुजबळ उप मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना नायगावला भेट द्यायची आपण विनंती केली. पुण्यातील महात्मा फुले स्मारक उभारण्यातला त्यांचा झपाटा माहीत असल्याने या कामी तेच न्याय देऊ शकतील असा विश्वास होता. १९७२ पासून प्रलंबित असलेले फुले चाड्याचे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

