सत्यशोधाक धोंडीराव चापूराव उबाळे हे मौजे चिंचगाव, ता. माढा, जिल्हा सोत्वपूर येथील सत्यशोधक असून ते निरक्षर होते. ते बार्शी येथील कापड मिलमध्ये कामगार होते. उबाळे अशिक्षित आणि कामगार असले तरी त्यांचे स्वतःचे वाचनालय होते.

उबाळे
धोंडीराव बापूराव
(जन्म सुमारे १९१०-मृत्यु १९६९)
सत्यशोधाक धोंडीराव चापूराव उबाळे हे मौजे चिंचगाव, ता. माढा, जिल्हा
सोत्वपूर येथील सत्यशोधक असून ते निरक्षर होते. ते बार्शी येथील कापड
मिलमध्ये कामगार होते. उबाळे अशिक्षित आणि कामगार असले तरी त्यांचे
स्वतःचे वाचनालय होते. त्यांनी त्यांच्या नावाचा शिक्का तयार करून घेतला होता. या शिक्क्यावर मधोमध उजव्या अंगठ्याचा ठसा उमटविलेला होता. आवडणाऱ्या ग्रंथाचे ते दुसन्याकडून वाचन करून घेत असत. अशा या अशिक्षित सत्यशीधकाचे जेधे जवळकर आणि तुळशीदास जाधव यांच्याशी मनिष्ठ स्नेहाचे संबंध होत
घोजीराव उवाले हे कडते सत्यशोधक असल्याने ते अंधश्रद्धेवर विश्वास ठेवीत नसत. गावातील आषाढातील निधणाऱ्या लक्ष्मीआईच्या यात्रेला त्यांचा नेहमी विरोध राहत असे. त्यांनी या यात्रेतील देवीचा गाडाही फेकून दिला. त्यांच्या या सत्यशोधकी वर्तनाने त्यांच्यावर अनेक केसेसही झाल्या. मिलमधल्या नोकरीनंतर त्यांनी मेहद येथे उदरनिर्वाहासाठी किराणा दुकान थाटले. अशा या सत्यशोधकाचे
१९६९ साली निधन झाले.
संदर्भ सत्यशोधक ज्ञानेश्वर वावरे, उस्मानाबाद यांचे टिपण
उरवणे
रामचंद्र बापूशेट
(१८३०-२८ सप्टेंबर १८८२)
सत्यशोधक समाजाचे आरंभीचे खजिनदार रामचंद्र बापूशेट उरवणे यांचा जन्म १८३० साली पुणे येथे झाला त्यांचे वडील बापूशेट उरवणे यांची पुणे येथील भवानी पेठेत गुळाची आडत होती. या आडतीवर बरेच देणे झाले होते.
सत्यशोधकांचे अंतरंग ३४
वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सर्व देणे चुकते करून आडत व्यवसाकत पुढे चांगला जम बसविला,
आडती व्यवसाय करता करता पुढे उरवाणे शेट यांचा व्यापाराच्या अनुषंगाने महात्मा फुले यांच्याशी संपर्क आला. या सहवासात इंग्लंड, अमेरिकेतील चोर पुरुषांची चरित्रे त्यांनी अभ्यासली. या चरित्रांचे अध्ययन करून या महापुरुषांच्या विचारांना त्यांनी आत्मसात केले,
या वैचारिक चिंतनातून ते सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वीच्या बैठकांना नियमित उपस्थित राहत असत. सत्यशोधक समाज स्थापनादिनी त्यांनी तळीभंडार उचलून समाजाचे सदस्यत्व स्वीकारले. इ. स. १८७५ साली ते सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी झाले. इ. स. १८७६ साली ते समाजाचे खजिनदार झाले. या प्रसंगी त्यांनी समाजाला पंचावन्न रुपयांची घसघशीत देणगी दिली, तसेच समाजाच्या वतीने संपत्र झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकास त्यांनी पारितोषिक दिले.
कोल्हापुरातील दत्तक प्रकरणात दिवाण बर्वे यांनी गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा गुदरला. अशा प्रसंगी सत्यशोधक समाजाचे उत्पादक जोतीराव फुले यांच्या आदेशानुसार गमशेट उग्नणे पुढे आले. रातोरात दहा हजार सुरती रुपयांची तजवीज केली ही मोठी रक्कम टिळक-आगरकरांच्या जामिनासाठी मुंबईस रवाना केली. रामशेट उरवणे यांच्या निधनानंतरच्या ‘केसरी’ च्या मृत्युलेखात या मदतीचा उल्लेख न विसरता ‘केसरी’ने केला (३-१०-१८८२) आहे.
अशा या निष्ठावंत सत्यशोधकाचे २८ सप्टेंबर १८८२ रोजी वयाच्या बावज्ञाल्या वर्षी निधन झाले.
संदर्भ- १. महात्मा फुले समग्र वाङ्मय य. दि. फडके, २. आम्ही पाहिलेले
फुल-से. हरि नरके, ३. महात्मा जोतीराव फुले- धनंजय कीर
सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




