सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.131

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.131
आत्मचरित्र गाजले. भिक्षुकशाहीचे बंड (१९२१), संत गाडगे महाराज यांचे चरित्र (१९५२), पंडिता रमाबाई; कोदंडाचा टणत्कार (१९२५), ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंड (१९१९), प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी (१९४८), कुमारिकांचे शाप (१९१९), हिंदू जनांचा ऱ्हास व अधःपात, प्रस्थान, हिंदू धर्माचे दिव्य, खरा ब्राह्मण, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे (१९१९), दगलबाज शिवाजी, संगीत सीताशुद्धी (१९०९-नाटक), टाकलेलं पोर (नाटक-१९३०), संगीत काळाचा काळ (नाटक), संगीत विधी निषेध (नाटक – १९३४) आदी जवळपास ३७ ग्रंथ ठाकरे यांच्या नावावर आहेत.
आचार्य अत्रे यांनी १९५४ मध्ये काढलेल्या ‘महात्मा फुले’ या चित्रपटात त्यांनी अभिनयही केलेला आहे.
आयुष्याच्या सायंकाळी हिंदुत्वाविषयीही जिव्हाळा निर्माण झालेल्या केशवराव ठाकरे ‘दादांचे’ २० नोव्हेंबर १९७३ रोजी मुंबई येथे निधन झाले. संदर्भ – सत्यशोधकी साहित्याचा इतिहास (खंड पहिला)-प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर
ठाकरे
नामदेवराव
(सुमारे १९०८ – ८ डिसेंबर १९७९)
कवी नामदेवराव ठाकरे पाटील हे मौजे वाई, जिल्हा वाशिम येथील सत्यशोधक असून त्यांचा जन्म सुमारे १९०८ साली वाई येथे झाला असावा. कवी नामदेव ठाकरे यांनी सत्यशोधकी जलशात, लोकनाट्याचा बाज वापरून सत्यशोधक जलसाप्रेमी जनतेचे प्रबोधन केले. वाशिम जिल्ह्यातील आडवळणी गावी शिक्षणाची लोकचळवळ त्यांनी उभी केली.
नामेदवराव ठाकरे यांचा पिंडच कवीचा असल्याने त्यांनी अनेक कवने करून जलशात गायली. त्यांनी अनेक रचनाही रचल्या. ‘रानबोर’ शीर्षकाचा काव्यसंग्रह त्यांच्या मृत्यूनंतर ८ डिसेंबर १९९९ रोजी त्यांच्या मुलाने प्रकाशित केला. नामदेवराव ठाकरे हे केवळ कागदी पांडित्यपूर्ण कवी नव्हते. त्यांनी गावात
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




