सोलापूर

🟥 बुलढाणा जिल्ह्यात ओबीसी लढ्याला नवे नेतृत्व; गजानन खंडारे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड – “आधी जातनिहाय जनगणना, मगच मतदान”चा बुलंद इशारा!

🟥 बुलढाणा जिल्ह्यात ओबीसी लढ्याला नवे नेतृत्व; गजानन खंडारे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड – “आधी जातनिहाय जनगणना, मगच मतदान”चा बुलंद इशारा!

बुलढाणा | प्रतिनिधी : अखिल भारतीय माळी महासंघाने मा. गजानन परशराम खंडारे (मु.पो. पिंपरखेड, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष मा. विजय राजाभाऊ खरात, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. मधुकरजी घिरके, प्रदेश संघटक (डॉ. सेल आघाडी) मा. डॉ. गजाननजी अजगर आणि किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. भानुदासजी अजगर यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

बी.ए. शिक्षित असलेले गजानन खंडारे हे जय बजरंग विद्यालय, टाकरखेड हेलगा येथे लिपिक म्हणून कार्यरत असून सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले की, बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावात “जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे” असा ठराव ग्रामपंचायतीमार्फत मंजूर करून तो केंद्र व राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल.

खंडारे यांनी सांगितले की, जातनिहाय जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून सामाजिक न्याय, संविधानिक हक्क, समान प्रतिनिधित्व आणि ओबीसी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जनगणनेमुळे प्रत्येक जातीची खरी लोकसंख्या, शिक्षणातील विषमता, आरक्षणाचा हक्क, प्रशासनातील प्रतिनिधित्व, अर्थसंकल्पातील वाटा, महिला-बालक-वृद्धांसाठी नियोजन, घरकुल, जमीनधारणा, आर्थिक स्थिती आणि सामाजिक वास्तव देशासमोर येईल.

त्यांनी ठाम भूमिका मांडली की, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण, राजकीय प्रतिनिधित्व, विकास निधी आणि संविधानिक अधिकार मिळविण्यासाठी जातनिहाय जनगणना अपरिहार्य आहे. तसेच ओबीसींवरील अन्याय, अत्याचार, आरक्षण संरक्षण आणि सामाजिक न्यायाची चळवळ गावागावांत पोहोचविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

खंडारे यांनी ओबीसी समाजाला आवाहन केले की, प्रत्येक ग्रामपंचायतीने “जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे” असा ठराव मंजूर करून केंद्र व राज्य सरकारला पाठवावा. त्यांनी इशारा देताना म्हटले की, “जातनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्यांना ओबीसी समाज लोकशाही मार्गाने राजकीय उत्तर देईल. आता एकच निर्धार – ‘आधी जातनिहाय जनगणना, मगच मतदान!'”

निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा. शंकरराव लिंगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, प्रदेशाध्यक्ष मा. गौतमजी क्षिरसागर तसेच संघटनेतील विविध पदाधिकाऱ्यांनी गजानन खंडारे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

✍️ संपादकीय संदेश

जातनिहाय जनगणना हा कोणत्याही एका समाजाचा विषय नसून भारतातील सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानिक प्रतिनिधित्वाचा मूलभूत प्रश्न आहे. समाजातील वंचित घटकांचे वास्तव समोर आणण्यासाठी पारदर्शक माहिती आवश्यक आहे. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी तथ्याधारित धोरणनिर्मिती महत्त्वाची आहे

📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही

संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📱 आपला WhatsApp क्रमांक : 73 87 37 78 01

✅ हा नंबर आपल्या सर्व WhatsApp ग्रुपमध्ये Add करा.

👍 बातमी Like करा.
🔁 Share करा.
📲 Forward करा.
💬 Comment करा.
▶️ Subscribe करा.
🔔 Bell Icon दाबा.

🟡 दिनबंधू न्यूज WhatsApp Channel Follow करा.
दररोज ताज्या, सविस्तर आणि जनहिताच्या बातम्या पाहण्यासाठी आम्हाला जोडलेले राहा!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button