सोशल

पर्यावरण संवर्धन काळाची गरज…. आपणा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या पर्यावरण पूरक हार्दिक शुभेच्छा….

पर्यावरण संवर्धन काळाची गरज….

आपणा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या पर्यावरण पूरक हार्दिक शुभेच्छा….



पर्यावरणाला गृहित धरण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.त्याचा सर्व सजीव सृष्टीवर विघातक परिणाम होत आहे.यातूनच पर्यावरणा बाबतच्या जागृतीची गरज निर्माण झाली.म्हणूनच 1972 साली युनोच्या सर्वसाधारण सभेने मानव व पर्यावरण या विषयी आयोजित केलेल्या परिषदेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले.संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सामाजिक, राजकीय,औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले.त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात आला.
संपूर्ण जगात पर्यावरण साक्षरता वाढीस लागून आपला मूलाधार असलेले पर्यावरण सुरक्षित राहावे यासाठी वसुंधरेवरील प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन संकल्प,वृक्षारोपण,वृक्ष संगोपन तथा इतर पर्यावरण संवर्धनात्मक उपक्रमांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा होणे काळाची गरज झालेली आहे.
पर्यावरण प्रेमी, शासन,प्रशासन,सामाजिक कार्यकर्ते,विविध सेवाभावी संस्था व संघटणे आपापल्या परीने पर्यावरण संवर्धन करीत असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन चळवळीत सहभागी होऊन उचित योगदान दिल्यास पर्यावरण संवर्धन चळवळ ही लोक चळवळ होईल.असा विश्वास वाटतो.
पर्यावरणाबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेतुन प्रत्येकाने राष्ट्रीय सण – उत्सव,थोरा मोठ्यांची जयंती – पुण्यतिथी, वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस, मैत्रीचे प्रतीक,प्रेमाचे प्रतीक, जीवनातील सोनेरी क्षण तथा कुटुंबातील मयत व्यक्तीच्या स्मृती निमित्ताने उचित ठिकाणी देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन केल्यास मोठ्या प्रमाणात वृक्ष लावल्या जातील व त्याचे संगोपन झाल्याने काही प्रमाणात पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यात यश मिळेल.
अन्न,वस्त्र,निवारा, जळतण,लाकूड फाटा, औषधी,सावली,फळे,फुले, ऑक्सिजन या आणि अनुषंगिक गरजांसाठी मानव प्राणी वनस्पतींवर अवलंबून आहे.वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये कार्बन-डाय-ऑक्साइड घेतात व ऑक्सिजन सोडतात त्यामुळे कार्बन चक्रात त्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे मानवाला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू वनस्पती पुरवितात.परंतु वनांचे अस्तित्व कमी होऊ लागले आहे.कारण माणसाच्या मनात स्वार्थ आणि पैशाचे प्रेम श्रेष्ठ ठरले व चोरटा व्यापार सुरू झाला.शेती, कारखाने,वाहतूक मार्ग, वाढती लोकसंख्या, घरबांधणी यासाठी बेसुमार जंगलतोड होऊ लागली. “जिथे माणसाचे पाय लागतात तिथे वाळवंट निर्माण होते”असेच अक्षरशः झालेले आहे. आता भारतात वनांचा भाग कमी झाला आहे.एवढेच नव्हे तर काही वन्य प्राण्यांच्या जातीही नष्ट झाल्या आहेत.प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.संपूर्ण जगात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. ऋतुचक्र बदलल्यामुळे मानव प्राणी हवालदिल आहे.कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षण,कधी वादळ वारे,तर जीव घेण्या विजांचा वर्षाव! यामुळे जगणे फार कष्टदायक होत चाललेले आहे.
भूतलावरील सर्वात बुद्धिमान असलेल्या मानव प्राण्याला जर सुखासीन जीवन जगावयाचे असल्यास श्वास घेऊन जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निसर्गासोबत मैत्री करून निसर्गाच्या अर्थात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उचित योगदान देणे क्रमप्राप्त आहे तरच वर्तमान काळ तथा भविष्यकाळ हा सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा असेल यात शंकाच नाही.अन्यथा विनाश अटळ !!
चला सर्वजण वसुंधरेला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प करूया…

लेखन /शब्दांकन

वनश्री.जनाबापू द्वारका नामदेव मेहेत्रे…
संपर्क:- 8275233377

सी.एम.डी.
निसर्गाई फाऊंडेशन द्वारा संचालित धरती बचाओ परिवार…

मास्टर ट्रेनर
राष्ट्रीय हरित सेना
सामाजिक वनीकरण
विभाग महाराष्ट्र शासन

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button