सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.101

परिषद’ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कृष्णेश्वर थिएटरात पार पडलेल्या या परिषदेत जगताप यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अगोदर १ जानेवारी १९३३ रोजी वाई येथेच ‘मराठा मोफत वाचनालया’चा बारावा वर्धापन दिन कार्यक्रम मानसिंगराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. वाई येथील शेतकरी परिषद, तसेच ब्राह्मणेतर परिषदांना जगताप उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारानुसार आयुष्य कंठणाऱ्या य सत्यशोधकाला उतारवयात हाल-अपेष्टांना सामोरे जावे लागले. अशा या सत्यशोधकाचे १९७४ सालच्या मार्चमध्ये केंजळ येथे निधन झाले.
संदर्भ- १. श्री. मानसिंग केशवराव जगताप अल्प परिचय-विश्वनाथ वाबळे, २. आनंदराव शिंदे, बोपेगाव, तालुका वाई, जिल्हा सातारा यांचे टिपण
जमधाडे हिरामण मोतीराम (जन्म-१८-६-१९५२)
हिरामण मोतीराम जमधाडे हे उच्चशिक्षित, सेवानिवृत्त सहशिक्षक असून, ते मौजे देऊळगावराजा, जिल्हा बुलडाणा येथील सत्यशोधक होत. २००४ साली सत्यशोधक समाजाच्या वतीने दुसरे सत्यशोधकी साहित्य संमेलन जालना येथे भरले होते. या साहित्य संमेलनाला देऊळगावराजा येथून जमधाडे यांनी हजेरी लावली होती. येथून पुढे ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले. पुढे सत्यशोधक समाजाच्या अधिवेशन, साहित्य संमेलनांना आणि सत्यशोधक समाज चळवळीच्या बैठकांना ते नियमित उपस्थित राहू लागले.
देऊळगावराजा येथे सत्यशोधक समाजाच्या वतीने चौथे सत्यशोधकी साहित्य संमेलन डिसेंबर २००६ मध्ये देऊळगावराजा येथे भरले होते. ते संमेलन यशस्वी करण्यासाठी जमधाडे यांनी परिश्रम घेतले होते.
सत्यशोधकांचे अंतरंग
जयस्वाल (बिऱ्हाडे) शिवराम पांडुरंग
शिवराम पांडुरंग जयस्वाल (बिऱ्हाडे) हे मौजे दोनद बु.।, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला येथील सत्यशोधक लेखक-विचारवंत होत. जयस्वाल हे या परिसरातील बहुजन जागृतीकार असून त्यांनी दलित-बहुजन शेतकऱ्यांना तीर्थयात्रा न करता कार्यमग्न राहण्याचा सल्ला दिला होता. त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराज सत्यशोधक संत असल्याचे त्यांनी निधड्या छातीने प्रतिपादित केले होते. जयस्वाल यांनी १९३६ साली ‘मूर्तिपूजेचा निषेध’ ही अठरा पानी पुस्तिका विदर्भ प्रिंटिंग प्रेस अमरावती येथून प्रसिद्ध केली होती. या छोटेखानी पुस्तिकेला सत्यशोधक डॉ. पंजाबराव देशमुखांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तिकेतून दंतकथा आणि आख्यायिका जयस्वाल यांनी खोडून काढल्या आहेत. ९९टक्के मूर्तिपूजकांना दगडाच्या भरवशावर राहू नका म्हणूनही त्यांनी सुचविले आहे. जयस्वाल यांनी मूर्तिपूजेला पर्याय म्हणून ‘वैदिक पंचायत’ ही आणखी एक पुस्तिका लिहिली. मात्र ही पुस्तिका उपलब्ध नाही. या पुस्तिकेचे लेखनही १९३६ सालीच झाले आहे.
जयस्वाल यांनी सत्यशोधकी मताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दोनद येथे ‘मानवधर्म सुधारक मंडळ’ संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता निवारण कार्य केले. सत्यशोधक कलापथकही त्यांनी उभे केले होते.
संदर्भ – विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य- डॉ. अशोक चोपडे
सत्यशोधकांचे अंतरंग / 101
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

