महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशः भाग दुसरा

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशः भाग दुसरा
-आधुनिक पद्धतीची शेती करणे, तलाव तळी, धरणे बांधून शेतीला “नळाद्वारे” पाण्याचा पुरवठा करणे, शेतीला जोड धंदे, पुरक उद्योग यातून शेती किफायतशीर बनविण्याचा नकाशा त्यांनी मांडून दाखवला होता. अशाप्रकारे आजच्या ठिबक सिंचनचे बीजरुपच जणू ते दाखवित होते. ज्याकाळात ९० टक्के भारतीय शेतीवर उपजिविका करीत होते. त्याकाळात शेतकऱ्यांच्या समस्या देशाच्या ओपिनियन मेकर्ससमोर ऐरणीवर आणणारे पहिले कृषी अर्थशास्त्रज्ञ फुलेच होते. त्यांच्या शाळांमध्ये मुलामुलींना वयाच्या ६ व्या वर्षापासून शेती आणि उद्योगाचे शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले होते. त्यांनीच पहिल्यांदा त्रिभाषा सुत्र सुचवले.
शैक्षणिक गळतीच्या प्रश्नाचे मूळ शोधून त्यावर गरिब मुलांना विद्यावेतन (पगार) देण्याचा उपाय त्यांनी अंमलात आणलेला होता. त्यांनी दाखवलेल्या याबाबतच्या इतर १५ कारणांचा आणि उपायांचा अभ्यास आजही मार्गदर्शक ठरावा. द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ म्हणून जोतीरावांची प्रस्तुतता आजही कमी झालेली नाही.
१८७६ ते १८८३ याकाळात ते पुण्याचे आयुक्त (कमिशनर) होते. घरोघरी बंद नळाद्वारे पाणी पुरविण्याची योजना यशस्वी करण्यासाठी ते झटले. उत्तम रस्ते, शाळा, आरोग्य, शहर स्वच्छता यावर त्यांचा भर होता. गव्हर्नरच्या स्वागतावर अनाठायी पैसा उधळण्याला तसेच मंडईच्या बांधकामाला त्यांनी विरोध केला. त्याच पैशाचा वापर शिक्षणासाठी करावा असा त्यांचा आग्रह होता. आज सर्वच शहरांतील बेकायदा बांधकामांच्या प्रश्नाने अक्राळविक्राळ रुप धारण केलेले आहे. या पार्श्वभुमीवर कमिशनर फुले यांनी आपल्या घरातील स्नानगृहाच्या अंतर्गत बांधकामात सुधारणा करण्यासाठीसुद्धा नगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केलेला बघून चकित व्हायला होते.
स्वतः फुले एक बांधकाम व्यावसायिक होते. कात्रजचा बोगदा, बंडगार्डनचा पुल, डावा कालवा, रस्ते, इमारतींची अनेक कामे त्यांच्या “पुणे व्यावसायिक आणि कंत्राटदार कंपनी” द्वारे करून एक यशस्वी उद्योगपती म्हणून त्यांनी नावलौकिक कमावलेला होता. बिल्डर या शब्दाला आता “आदर्श” रूप प्राप्त झाल्याने ते बिल्डर होते असे म्हणायची हिंम्मत मी करणार नाही. पण ते “नेशन बिल्डर” होते याबाबत दुमत होवू शकत नाही.
शेयर बाजारात यशस्वी होण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी यावर त्यांनी कविता लिहिल्या. ते ग्रंथप्रकाशनाच्या व्यवसायात होते. दागिन्यांचे साचे विकण्याची त्यांच्याकडे एजन्सी होती. शेती, उद्योग, व्यापार यातली त्यांची ही चौफेर
कामगिरी पाहिली की ते मळात सामाजिक नेते असूनही ते उत्तम उद्योगपती कसे
शिवक्रांती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१

