धर्मपितामह महात्मा बसवेश्वर यांची गाथा लेखक चनवीर भद्रेश्वर हिरेमठ क्रमशः

धर्मपितामह महात्मा बसवेश्वर यांची गाथा लेखक चनवीर भद्रेश्वर हिरेमठ क्रमशः शतकात बसवण्णांसोबत शरण बनून जगणं निखाऱ्यांवर चालण्यापेक्षा कठीण होतं. तरीही त्यांच्या सोबत १ लाख ९६ हजार शरण होते. हा इतिहास आहे. विसाव्या शतकात बहुजन लिंगायतांची मुलं शिकल्यावर, सजग झाल्यावर त्यांनी आपल्या खऱ्या बापाचा शोध घ्यायला सुरुवात केली. लपवून ठेवलेली बसवण्णांची आणि शरणांची वचनं शोधून काढली मठाधिपती सांगतात त्यापेक्षा बसवण्णांचा लिंगायत धर्म वेगळाच असल्याचं त्यांना कळू लागलं. सनातन्यांचं आठशे वर्षांचं कारस्थान उघडे पडू लागलं. अभ्यासक, संशोधकांनी लिंगायतांच्या ब्राह्मणीकरणाचा इतिहास आणि भूगोलच आरशासारखा लख्ख दाखवायला सुरुवात केली. तुम्ही बदकं नाही, तर राजहंस आहात, हे बसवण्णांच्या वचनांच आधार देत लोकांपर्यंत पोचवायला सुरुवात केली. आता ही चळवळ ‘धर्मपिता महात्मा बसवण्ण्णा’ या प्रस्तुत पुस्तकाच्या रूपाने अगदी जतसारख्या आडवळणाच्या गावपातळीवरही पोहोचल्याचे आपल्याला दिसत आहे. हीच बसवण्णा नावाच्या विचाराची महती आहे.
अवैदिक असलेल्या बसवधर्माचे बसवोत्तर काळात वैदिकीकरण करण्याचा सुनियोजित कार्यक्रम राबविण्यात आला. नंतरच्या मंडळीनी वचनांतील प्रतिमा आणि प्रतीकांचे संस्कृतीकरण करून आगम, श्लोक, पुराण कथा रचल्या. त्यातूनच सिद्धांत शिखामणीसारख्या ग्रंथाचा जन्म झाल्याचे दिसून येते. वचनांचे संपादन झाल्याचे दिसून येते. बसवोत्तर काळात म्हणजे कल्याण प्रतिक्रांतीनंतर १४ व्या शतकापर्यंत वचन लेखन ठप्प होते. मात्र शरणांचे चरित्र – पुराण लिखाणही याच काळी झाले. या काळात काव्यात्म चरित्र, आख्यायिका, चमत्कार, कल्पनाविलास, दैवतीकरण, अतिशोक्तीपूर्ण शैली हाच आधार असलेल्या चरित्रांची पोथ्या पुराणांची निर्मिती झाली व्रत, नवस, कैलास, – तपश्चर्या, मंदिर, जागृत देवस्थान, साधना, दृष्टांत, संकेत, अवतार, जंगमकृपा अशा संकल्पनांना शरणांनी आपल्या आचार विचारांत अजिबात थारा दिला नव्हता. परंतु नंतरच्या वैदिक विचारांच्या लेखकांनी शरणांच्या चरित्रात ते सार नव्याने घुसविल्याचे दिसून येते. बसवण्णांनी जसा मंदिरातला स्थावर देव नाकारला, तसा त्यांनी वेद- आगमही नाकारले. शरीराला मंदिर, इष्टलिंगाला -देव, आत्म प्रज्ञेला गुरू (अरीवू) आणि कर्म म्हणजे काम हेच कैलास मानले.
महात्मा बसवण्णांचा धर्म बुद्धिप्रामाण्यवादाचा आग्रह धरतो. कर्मकांड, बहुदेवोपासना, मूर्तिपूजेला इथे थारा नाही. बसवण्णांवर भक्ती असणारे, बसवादी शरणांच्या वचन साहित्यांवर निष्ठा असणारे स्वतःचा बसवधर्मी असा गौरवपूर्ण उल्लेख करतात. ही
सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
( X )

