गृहमंत्रीअमितशहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानस्पद वक्तव्य केल्यामुळे देशाची माफी मागून राजीनामा देण्याबाबत.
संविधान संवर्धन समिती सोलापूर शहर जिल्हा
.: निवेदन:- संविधान संवर्धन समिती, सोलापूर
दि १/ १/२०२४
प्रति, मा. राष्ट्रपती साहेब, भारत सरकार, नवी दिल्ली.
यांना
मा. जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर यांचे मार्फत
विषय :- गृहमंत्रीअमितशहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानस्पद वक्तव्य केल्यामुळे देशाची माफी मागून राजीनामा देण्याबाबत.
महोदय,
.गेल्या ५००० वर्षापासून आपल्या देशातील सुरु असलेल्या मनुवादी व्यवस्थेमुळे आपल्या देशातील नागरिकांचे शोषण होत आहे. त्यामुळे मनुवादी व्यवस्थेने. भारतीय जनतेला जिवंतपणातच नर्क भोग दिला. अश्या समाजात बाबासाहेब जन्माला आलेत त्यांनी या मनुवादी व्यवस्थेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी काय परिश्रम घेतले, काय-काय हाल अपेष्ठा सहन केल्या. हा इतिहास या देशातील सर्व नागरिकांना माहीत आहे. आणि संविधानाच्या माध्यमातून या समाजाला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, दर्जाची व संधीची समानता. राष्ट्राची एकता आणि एकात्मता, बंधुभाव निर्माण होईल असे संविधानात लिहीले. आणि वर्ण व्यवस्था, जुलमी मनुवादी व्यवस्था मोडून या देशातील प्रत्येक नागरिकाला समान केले. भारतातील संपूर्ण नागरिकांना बाबासाहेबांनी मिळवून दिलेल्या हक्क अधिकारामुळे जिवंतपणे याच जन्मात स्वर्ग मिळाला. त्यामुळे आंबेडकर यांचं नाव घेणं हे पेंशन आहे. (अभिमान आहे; अतिशय आवड आहे; तीव्र भावना आहे) त्यामुळे सम्पूर्ण देश त्यांचं आदराने नाव घेतात. त्यांचा सन्मान करतात.
संपूर्ण देशातील नागरिकांच्या हृदयात बाबासाहेब आहेत. हे सर्व माहीत असून सुद्धा दि. १७/१२/२०२४ रोजी संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्त संसदेत बोलताना, गृहमंत्री अमित शहा यांनी जाणीव पूर्वक आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेची थट्टा उडवत ” आज आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, अआंबेडकर, म्हणण्याची फॅशन झाली आहे. एवढं आंबेडकर यांचं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर, सात जन्म स्वर्ग प्राप्त झाला असता असे वक्तव्य केलं.
धर्मस्वातंत्र्याचा व अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे, त्यामुळे कोणाला कोणाचं नाव घ्यायचं आहे आणि किती वेळा घ्यायचा हा ज्याचा- त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. त्यामुळे आंबेडकरांचं नाव घेणं बंद करा, आणि देवाचं नाव घ्या अश्या अर्थाने अप्रत्यक्ष बोलणे अत्यंत निंदनीय आहे त्यांच्या मते लोकांनी आंबेडकर यांचं नाव घेणं बंद करावं आणि देवाचं नाव घ्यावं. म्हणजे ज्या व्यक्तीने भारतीय जनतेला याच जन्मात स्वर्ग तयार करून दिला. त्यांचं नाव घेणं बंद करावं आणि देवांचे नाव घ्यावं असा त्या वक्तव्याचा अर्थ निघतो. या वक्तव्यातून अमित शहा यांचा खरा मनुवादी चेहरा जनतेला दिसला, त्यांच्या पोटातलं जहर ओठांवर आलच, तसेच त्यांच्या मनातील आंबेडकरांबद्दल व आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेबद्दल चा राग, चीड, द्वेष स्पष्ट दिसून पडला. त्यामुळे सम्पूर्ण भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून अमित शहा यांनी बाबासाहेब यांच्यामुळेच देशातील नागरिकांना जिवंतपणातच स्वर्ग मिळाला. आणि आपण संविधानाचं पालन प्रामाणिक पणे केलं तर अंनत पिढ्यांना हा स्वर्ग मिळेल असं म्हणत जाहीर माफी मागावी. व पश्चताप म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी संविधान संवर्धन समिती सोलापूर तर्फे करीत आहोत. माफी न मागितल्यास संविधान संवर्धन समिती सोलापूर तर्फे तीव्र आंदोलन केल्या जाईल, याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे .
कळावे, निवेदनावर सह्या करनारे पद अधिकारी
उत्तम भैव्या नवगिरे
मिलींद (नाना) प्रक्षाळे
रशिद (भाई) सरदार
अशोक आगावणे
प्रकाशक मिलिंद (नाना) प्रक्षाळे, जैनोद्दीन शेख, अशोक आगवणे, मल्लेश सुर्यवंशी, संजय निवेदने गायकवाड इ. मान्यवर
.. पुनममे गेट सोलपुर येथे अक्रोश अंदोलन कराताना
बोरिजिनस राइटर मैन आनंद-
मामने लटेल
राजेन्धा माने
विदयोडफ्रेंग
राजू कोवले
• रागीह बरदार
युवराज पवार
नागनाथ कहम
उभय नवधने
नागेश बंगले
नागनाथ शॉने
संविधान स्वर्णिम वर्ष
सुरूजाराम अधवम सत्यशोधक शंकरराव लिंगे इत्यादि
मान्यवरानी आपल मनोगत व्यकत – केले निदर्शन केले
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी .व्ही . संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा फारवड करा कॉमेट करा आई कॉन बेल दाबा .


