🔥 २६ जानेवारी २०२६ : झेंडावंदनाच्या दिवशी संविधानाचा सवाल, मंत्र्यांची अनुपस्थिती आणि शेतकरी-जनतेचा उद्रेक 🔥

.
🔥 २६ जानेवारी २०२६ : झेंडावंदनाच्या दिवशी संविधानाचा सवाल, मंत्र्यांची अनुपस्थिती आणि शेतकरी-जनतेचा उद्रेक 🔥
२६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर झेंडावंदनाचे कार्यक्रम झाले, मात्र याच दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन, संताप आणि प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. उत्सवाच्या आड दडलेले वास्तव या दिवशी उघडपणे समोर आले.
नाशिक जिल्ह्यातील मुख्य झेंडावंदन कार्यक्रमात वन विभागातील एका महिला अधिकाऱ्याने थेट पालकमंत्र्यांना जाब विचारला. “२६ जानेवारी हा संविधानावर आधारित राष्ट्रीय कार्यक्रम आहे. मग संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही?” असा थेट आणि निर्भीड प्रश्न अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. कार्यक्रमस्थळीच हा सवाल झाल्याने वातावरण अस्वस्थ झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव टाळणे म्हणजे संविधानाच्या आत्म्यालाच नाकारणे असल्याची तीव्र भावना व्यक्त झाली.
बुलढाणा जिल्ह्यात तर प्रजासत्ताक दिनाचा अपमानच झाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्याला दोन पालकमंत्री, एक सहपालकमंत्री आणि दोन मंत्री लाभलेले असतानाही या सर्वांनी झेंडावंदन कार्यक्रमाला पाठ फिरवली. एकही मंत्री उपस्थित राहिला नाही. अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच झेंडावंदन करावे लागले. लोकप्रतिनिधींच्या या अनुपस्थितीमुळे जनतेत तीव्र नाराजी आणि संताप उसळला.
याच्या उलट रायगड जिल्ह्यात वेगळाच विरोधाभास समोर आला. पालकमंत्री पद वादात असतानाही भोगावले येथे झेंडावंदन करण्यात आले. अधिकृत पालकमंत्री नसतानाही एका नेत्याला झेंडावंदनाचा मान देण्यात आला. काही जिल्ह्यांत मंत्री गैरहजर, तर काही ठिकाणी पद नसतानाही मान — या विसंगतीमुळे राजकीय प्रश्न उपस्थित झाले.
बीड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. शेतीमालाला भाव नाही, कर्जमाफी नाही, पीकविमा नाही, दुष्काळी परिस्थिती असूनही शासनाकडून दखल नाही, या कारणांमुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली. वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला, मात्र शेतकऱ्यांची अवस्था किती टोकाला पोहोचली आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले.
इतरही जिल्ह्यांमध्ये शेतकरी, कामगार, आदिवासी आणि विविध सामाजिक संघटनांनी प्रजासत्ताक दिनी निदर्शने केली. कर्जमाफी, वीजदर, पीकविमा, आरक्षण, रोजगार, संविधानाची अंमलबजावणी आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात ठिकठिकाणी घोषणाबाजी झाली. काही ठिकाणी काळे फिती बांधून तर काही ठिकाणी निवेदनांद्वारे आपला रोष व्यक्त करण्यात आला.
एकीकडे तिरंगा फडकत होता, राष्ट्रगीत होत होते; तर दुसरीकडे संविधानावरच प्रश्न विचारले जात होते. २६ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्रात केवळ उत्सवाचा नाही, तर लोकशाहीत प्रश्न विचारणारा, आंदोलन करणारा आणि सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवणारा दिवस ठरला. एकंदरीत शासन प्रशासन या राष्ट्रीय सणाचे अवचित विसरल्याचे दिसून येत आहे त्याबद्दल जनतेतून मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर निघत आहे
दिनबंधू शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३ ८७ ३७ ७८ ०१
#RepublicDay2026 #संविधान #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #नाशिक #बुलढाणा #रायगड #बीड #शेतकरीआंदोलन #लोकशाही #दिनबंधून्यूज




