*सत्यशोध ककांचे अंतरंग

*सत्यशोध ककांचे
अंतरंग
सत्यशोधक होता. तेव्हा त्यांच्या सत्यशोधकी विचारांचा परामर्श घेणारा स्वतंत्र लेख*
या ग्रंथात हवा होता. त्यांचे अध्यक्षीय भाषणही हवे होते. मात्र असे झाले नाही. या ग्रंथांच्या समारोपात प्रसिद्ध केलेल्या वा. रा. कोठारी जीवनपटात ‘१९१८ – अकोला येथे महाराष्ट्र सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष’ इतकाच अतित्रोटक उल्लेख केलेला आहे. खरे तर वा. रा. कोठारी यांनी ‘प्रभात’मध्ये १९७१-७२ मध्ये लिहिलेल्या आणि पुढे १९७३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘जुन्या आठवणी’ हा ग्रंथ संपादकांनी चाळला असता तर सत्यशोधक समाजाच्या अनुषंगाने कोठारींच्या काही आठवणी हाती लागल्या असत्या, त्या आठवणी या ग्रंथात समाविष्ट करता आल्या असत्या, मात्र असे झाले नाही. त्यामुळे या का होईना सत्यशोधक विचारांच्या अंगाने कोठारी झाकोळले गेले. भल ग्रंथापुरते यामुळे कडव्या सत्यशोधकांच्या सर्वांगीण सत्यशोधकी परिचयासाठी सत्यशोधक ग्रंथांची आवश्यकता भासते आहे. हे तर केवळ वाणगीदाखल उदाहरण झाले.
जोतीराव फुले यांच्या चरित्राच्या अनुषंगाने आज शेकडो छोटे-मोठे चरित्र ग्रंथ उपलब्ध आहेत. बहुतांश ग्रंथ ‘महात्मा फुले’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक शैक्षणिक संस्थांना, सहकारी संस्थांना ‘महात्मा फुले’ या नामाभिधानाचे आकर्षण आहे. त्यात गैर काही नाही; मात्र मानवमुक्तीची लढाई यशस्वी करून एकमय जगताची संकल्पना जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाने विस्तारित केली. सत्यशोधक चळवळही महाराष्ट्रातील समाज सुधारणेची पहिली चळवळ होय. पुरोगामी विचारांची ती मातृसंस्था होय. आज पुरोगामी महाराष्ट्राला जोतीराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या हाताळलेल्या सत्यशोधक चळवळीची पाऊलवाट मार्गदर्शक आहे; मात्र नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांच्या ‘सत्यशोधक’ नाटकाचा अपवाद वगळता फुले, सावित्रीबाईंवर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांना, चरित्रांना सत्यशोधक शीर्षक नाही. इतकेच नव्हे तर सत्यशोधक डॉ. विश्राम रामजी घोले, सदाशिवराव गोवंडे, मोरेश्वर वाळवेकर, कृष्णराव पांडुरंग भालेकर, सावित्रीबाई रोडे, तानुबाई बिर्जे, ताराबाई शिंदे, ना. भास्करराव जाधव, प्रा. अण्णासाहेब लड्ठे, वणीकर रावसाहेब थोरात, काकासाहेब वाघ, मुकुंदराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, पं. सी. पाटील, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी सत्यशोधक महामानवांवर प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांना सत्यशोधक शीर्षक स्वतंत्रपणे अथवा संयुक्तिकपणे पाहावयास मिळत नाही. पुढेही अनेक सत्यशोधकांनी लेखन केले; मात्र सत्यशोधक
सावटविनाच (एखाद दुसरा अपवाद वगळून आज मात्र ‘सत्यशोधक’ शीर्षकाचे साना विवितकालिके प्रसिद्ध होत आहेत. असो). त्यामुळे सर्वांगी तळपणास जीविक प्रतिमा झाकोळली गेली. संपूर्ण सत्यशोधकांचे चरित्र लिहिण्याचे प्रेरणाही थोडीशी मागे पडली. त्यामुळे सत्यशोधकांच्या परिचय लेखनाचे काम जिकिरीचे झाले असावे.
क्रांतियाँ सावित्रीबाई फुले यांच्या अनुषंगानेही अशीच पुनरावृत्ती झाली. वास्तविक सत्यशोधक समाज स्थापनेपासून त्या समाजाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. १८७७ च्या दुष्काळात समाजाच्या वतीने स्थापलेल्या क्षुधानिवारण कॅम्पच्या त्या सर्वेसर्वा होत्या. पुढे जोतीराव निवर्तल्यावर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. १८९६ सालच्या दुष्काळात समाजाच्या बतीने पीडितांची सेवा केली. इतकेच नव्हे तर प्लेगची लागण झालेल्या बालरुग्णाची सेवा करता करता त्यांनी मृत्यूला कवटाळले.
असे असताना आजच्या जनसामान्यांसमोर देशातील पहिली शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका एवढीच प्रतिमा सीमित आहे. खरे तर त्या आद्यक्रांतिकारी भारतीय माँ आहेत. त्यांचे काव्यही या मुद्याला पूरक आहे. त्यांनी केशवसुतांच्या अगोदर क्रांतीची तुतारी आवेशाने फुंकली. मात्र, अर्वाचिन आद्य कवीचा मान केशवसुतांकडे गेला. याचे कारण काय? सत्यशोधक जागर मंदावत राहिला. खरे तर १४० वर्षांच्या समाजाच्या इतिहासात त्या एकमेव स्त्री अध्यक्षा आहेत. ही बाब सावित्रीबाईंच्या अनुषंगाने उपेक्षित राहिली. तेव्हा या देदीप्यमान मूल्यांना दिग्दर्शित करण्यासाठी सत्यशोधकांच्या परिचयाची आवश्यकता नाही का? *शिवक्रांती टीव्ही
तीन बंधू न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

