सोशल

साथीयों जय सावता…

साथीयों जय सावता…
कर्मप्रधान भक्तीचा संदेश देणारे संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त महाराजांना वंदन म्हणून ” अवघी विठाई माझी ” या ग्रंथातील ४० अभंगा पैकी तीन तीन सार्थ अभंग दररोज वाचकांसाठी देत आहे .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अभंग – ३० ( उपदेशपर)
० प्रपंची असून परमार्थ साधावा …

प्रपंची असून परमार्थ साधावा I वाचें आठवावा पांडुरंग ॥
उंच-नीच काही न पाहे सर्वथा I पुराणींच्या कथा पुराणच ।।
घटिका आणि पळ साधी उतावीळ । वाउगा तो काळ जाऊं नेदी ॥

सांवता म्हणे वाचें, जपे नामावळी | हृदयकमळीं रामकृष्ण ॥

अर्थ : –

सावता महाराज हे स्वतः प्रापंचिक गृहस्थ होते . त्यांनी प्रपंचात राहून केलेल्या विठ्ठल भक्तीने आपले चित्त शुध्द केले होते .आणि शुद्ध चित्तात शुद्ध विचार उदित होत असतात . असाच शुद्ध विचार सावता महाराजांनी प्रस्तुत अभंगात मांडला आहे .प्रपंचात राहणाऱ्यांना ते म्हणतात की , आपण प्रपंचात राहूनच परमार्थ साधावा . त्यासाठी आपल्या मुखात पांडुरंगाला आठवत राहावे . पुराणामध्ये स्त्री व शुद्रांना भक्ती करण्याचा अधिकार नव्हता . सावता महाराजांनी पोथीनिष्ठ सर्व भेद सपशेल नाकारले होते . त्यांचेमते परमार्थात उच- नीच असा भेद कधीच पाहायचा नसतो . त्या केवळ पुराणकथा असल्याने पुराणातच ठेवाव्यात . याच अभंगाच्या तिसऱ्या चरणात प्रापंचिकांना उपदेश करतांना ते म्हणतात की , प्रत्येक घटका आणि पळ हया महत्वाच्या आहेत . त्यामुळे उगाच वेळ वाया जाऊ देऊ नका.आपल्या वाचेने आपल्या हृदयकमळात विराजमान असलेल्या पांडुरंगाचे तुम्ही अखंड नामजप करा असा उपदेश ते या अभंगात प्रापंचिक लोकांना करतात.
( घटिका = वेळ, घटका / पळ = क्षणाचा काळ [ घटका आणि पळ हे वेळ मोजण्याचे प्राचीन मापक आहेत ] /नामावळी = नाम ( नाव ) आवळी= मालिका याचाच अर्थ अखंड नामजप )

अभंग -३१

० योग, याग, तप धर्म…
योग, याग, तप धर्म | सोपें वर्म नाम घेतां ॥

तीर्थ, व्रत, दान, अष्टांग I याचा पांग आम्हां नको ||

समाधी आणि समाधान | तुमचे चरण पाहतां ||

सांवता म्हणे दया क्षमा | हेंचि तुम्हां उचित ।।

अर्थ : –

अध्यात्मात भक्तीला विशेष महत्व आहे . गीतेने तर भक्ती मार्गाला तिसरी जीवननिष्ठा ( मार्ग ) मानले आहे . योग , याग , तप हे धर्मकर्मे मानली गेली आहेत . प्रस्तुत अभंगात मात्र संत सावता महाराज या प्रचलित कर्मांना ( भक्ती प्रकारांना ) छेद देत ‘ नामाला ‘ प्राधान्य दिले आहे . नवविधा भक्तीमध्ये स्मरण भक्तीला मान्यता आहे .नाम हे स्मरणाचे श्रेष्ठ साधन आहे . याच नामाचे महत्व स्पष्ट करतांना महाराज म्हणतात की …योग , याग व तप हे भक्ती मार्ग असले तरी ईश्र्वराचे ‘ नाम ‘ हे या सर्व प्रकारांचे वर्म आहे . तीर्थ , व्रत , दान या अष्टांग मार्गाची आम्हाला आसक्ती नको आहे . ते विठ्ठलाला म्हणतात की , तुमचे चरण पाहता मला समाधी लागून समाधान मिळते . याच अभंगाच्या तिसऱ्या चरणात सावता महाराज म्हणतात की , तुमच्या ठायी असलेली दया आणि क्षमा हिच आमच्यासाठी सर्वोपरी उचित आहे .

( वर्म= मर्म , रहस्य , गुढ / अष्टांग = भक्ती आठ मार्ग / पांग = आकांशा, उत्कट इच्छा, आसक्ती , आशा / उचिता = उचित , योग्य , बरोबर )

अभंग -३२ ( नाम महिमा )

० साधनांची आटाआटी …

साधनांची आटाआटी । कासया पाठीं लावितां ।।

एक तुमचें नामचि पुरें । हेंचि धुरें साधन ||

भाळी-भोळी करीन सेवा | माना देवा, तुम्ही धन्य ॥

सांवता म्हणे रुक्मिणीवरा | अहो अवधारा वचन माझें ।।

अर्थ : –

संत सावता महाराज या अभंगात श्री विठ्ठलाला म्हणतात की ,आम्हाला तुझी भक्ती करण्यासाठी साधनांची आटाआटी करण्यासाठी कशाला भाग पाडताय . त्यासाठी केवळ तुमचे नामच पुरेसे आहे . तुझे नामच सर्वश्रेष्ठ साधन आहे .मी आपली साधी भोळी सेवा करीन . हे देवा त्या सेवेलाच आपण धन्य मानावे . पुढे सावता महाराज म्हणतात की , हे रुक्मिणीवरा माझे हे वचन आपण लक्षपूर्वक ऐका .
( साधनांची आटाआटी = साधनांची जुळवाजुळव, पुस्तकी ज्ञानाची गरज /कासया = कशाला , कशासाठी / अवधारणे = विचारपूर्वक , लक्षपूर्वक )

[ ‘अवघी विठाई माझी ‘ या पुस्तकातून ] लेखक -जयकुमार चर्जन, परतवाडा
मो .९४२०७१३९९८
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

साथीयों जय सावता…
कर्मप्रधान भक्तीचा संदेश देणारे संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त महाराजांना वंदन म्हणून ” अवघी विठाई माझी ” या ग्रंथातील ४० अभंगा पैकी तीन तीन सार्थ अभंग दररोज वाचकांसाठी देत आहे .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अभंग – ३० ( उपदेशपर)
० प्रपंची असून परमार्थ साधावा …

प्रपंची असून परमार्थ साधावा I वाचें आठवावा पांडुरंग ॥
उंच-नीच काही न पाहे सर्वथा I पुराणींच्या कथा पुराणच ।।
घटिका आणि पळ साधी उतावीळ । वाउगा तो काळ जाऊं नेदी ॥

सांवता म्हणे वाचें, जपे नामावळी | हृदयकमळीं रामकृष्ण ॥

अर्थ : –

सावता महाराज हे स्वतः प्रापंचिक गृहस्थ होते . त्यांनी प्रपंचात राहून केलेल्या विठ्ठल भक्तीने आपले चित्त शुध्द केले होते .आणि शुद्ध चित्तात शुद्ध विचार उदित होत असतात . असाच शुद्ध विचार सावता महाराजांनी प्रस्तुत अभंगात मांडला आहे .प्रपंचात राहणाऱ्यांना ते म्हणतात की , आपण प्रपंचात राहूनच परमार्थ साधावा . त्यासाठी आपल्या मुखात पांडुरंगाला आठवत राहावे . पुराणामध्ये स्त्री व शुद्रांना भक्ती करण्याचा अधिकार नव्हता . सावता महाराजांनी पोथीनिष्ठ सर्व भेद सपशेल नाकारले होते . त्यांचेमते परमार्थात उच- नीच असा भेद कधीच पाहायचा नसतो . त्या केवळ पुराणकथा असल्याने पुराणातच ठेवाव्यात . याच अभंगाच्या तिसऱ्या चरणात प्रापंचिकांना उपदेश करतांना ते म्हणतात की , प्रत्येक घटका आणि पळ हया महत्वाच्या आहेत . त्यामुळे उगाच वेळ वाया जाऊ देऊ नका.आपल्या वाचेने आपल्या हृदयकमळात विराजमान असलेल्या पांडुरंगाचे तुम्ही अखंड नामजप करा असा उपदेश ते या अभंगात प्रापंचिक लोकांना करतात.
( घटिका = वेळ, घटका / पळ = क्षणाचा काळ [ घटका आणि पळ हे वेळ मोजण्याचे प्राचीन मापक आहेत ] /नामावळी = नाम ( नाव ) आवळी= मालिका याचाच अर्थ अखंड नामजप )

अभंग -३१

० योग, याग, तप धर्म…
योग, याग, तप धर्म | सोपें वर्म नाम घेतां ॥

तीर्थ, व्रत, दान, अष्टांग I याचा पांग आम्हां नको ||

समाधी आणि समाधान | तुमचे चरण पाहतां ||

सांवता म्हणे दया क्षमा | हेंचि तुम्हां उचित ।।

अर्थ : –

अध्यात्मात भक्तीला विशेष महत्व आहे . गीतेने तर भक्ती मार्गाला तिसरी जीवननिष्ठा ( मार्ग ) मानले आहे . योग , याग , तप हे धर्मकर्मे मानली गेली आहेत . प्रस्तुत अभंगात मात्र संत सावता महाराज या प्रचलित कर्मांना ( भक्ती प्रकारांना ) छेद देत ‘ नामाला ‘ प्राधान्य दिले आहे . नवविधा भक्तीमध्ये स्मरण भक्तीला मान्यता आहे .नाम हे स्मरणाचे श्रेष्ठ साधन आहे . याच नामाचे महत्व स्पष्ट करतांना महाराज म्हणतात की …योग , याग व तप हे भक्ती मार्ग असले तरी ईश्र्वराचे ‘ नाम ‘ हे या सर्व प्रकारांचे वर्म आहे . तीर्थ , व्रत , दान या अष्टांग मार्गाची आम्हाला आसक्ती नको आहे . ते विठ्ठलाला म्हणतात की , तुमचे चरण पाहता मला समाधी लागून समाधान मिळते . याच अभंगाच्या तिसऱ्या चरणात सावता महाराज म्हणतात की , तुमच्या ठायी असलेली दया आणि क्षमा हिच आमच्यासाठी सर्वोपरी उचित आहे .

( वर्म= मर्म , रहस्य , गुढ / अष्टांग = भक्ती आठ मार्ग / पांग = आकांशा, उत्कट इच्छा, आसक्ती , आशा / उचिता = उचित , योग्य , बरोबर )

अभंग -३२ ( नाम महिमा )

० साधनांची आटाआटी …

साधनांची आटाआटी । कासया पाठीं लावितां ।।

एक तुमचें नामचि पुरें । हेंचि धुरें साधन ||

भाळी-भोळी करीन सेवा | माना देवा, तुम्ही धन्य ॥

सांवता म्हणे रुक्मिणीवरा | अहो अवधारा वचन माझें ।।

अर्थ : –

संत सावता महाराज या अभंगात श्री विठ्ठलाला म्हणतात की ,आम्हाला तुझी भक्ती करण्यासाठी साधनांची आटाआटी करण्यासाठी कशाला भाग पाडताय . त्यासाठी केवळ तुमचे नामच पुरेसे आहे . तुझे नामच सर्वश्रेष्ठ साधन आहे .मी आपली साधी भोळी सेवा करीन . हे देवा त्या सेवेलाच आपण धन्य मानावे . पुढे सावता महाराज म्हणतात की , हे रुक्मिणीवरा माझे हे वचन आपण लक्षपूर्वक ऐका .
( साधनांची आटाआटी = साधनांची जुळवाजुळव, पुस्तकी ज्ञानाची गरज /कासया = कशाला , कशासाठी / अवधारणे = विचारपूर्वक , लक्षपूर्वक )

[ ‘अवघी विठाई माझी ‘ या पुस्तकातून ] लेखक -जयकुमार चर्जन, परतवाडा
मो .९४२०७१३९९८
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

साथीयों जय सावता…
कर्मप्रधान भक्तीचा संदेश देणारे संत शिरोमणी सावता महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त महाराजांना वंदन म्हणून ” अवघी विठाई माझी ” या ग्रंथातील ४० अभंगा पैकी तीन तीन सार्थ अभंग दररोज वाचकांसाठी देत आहे .
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अभंग – ३० ( उपदेशपर)
० प्रपंची असून परमार्थ साधावा …

प्रपंची असून परमार्थ साधावा I वाचें आठवावा पांडुरंग ॥
उंच-नीच काही न पाहे सर्वथा I पुराणींच्या कथा पुराणच ।।
घटिका आणि पळ साधी उतावीळ । वाउगा तो काळ जाऊं नेदी ॥

सांवता म्हणे वाचें, जपे नामावळी | हृदयकमळीं रामकृष्ण ॥

अर्थ : –

सावता महाराज हे स्वतः प्रापंचिक गृहस्थ होते . त्यांनी प्रपंचात राहून केलेल्या विठ्ठल भक्तीने आपले चित्त शुध्द केले होते .आणि शुद्ध चित्तात शुद्ध विचार उदित होत असतात . असाच शुद्ध विचार सावता महाराजांनी प्रस्तुत अभंगात मांडला आहे .प्रपंचात राहणाऱ्यांना ते म्हणतात की , आपण प्रपंचात राहूनच परमार्थ साधावा . त्यासाठी आपल्या मुखात पांडुरंगाला आठवत राहावे . पुराणामध्ये स्त्री व शुद्रांना भक्ती करण्याचा अधिकार नव्हता . सावता महाराजांनी पोथीनिष्ठ सर्व भेद सपशेल नाकारले होते . त्यांचेमते परमार्थात उच- नीच असा भेद कधीच पाहायचा नसतो . त्या केवळ पुराणकथा असल्याने पुराणातच ठेवाव्यात . याच अभंगाच्या तिसऱ्या चरणात प्रापंचिकांना उपदेश करतांना ते म्हणतात की , प्रत्येक घटका आणि पळ हया महत्वाच्या आहेत . त्यामुळे उगाच वेळ वाया जाऊ देऊ नका.आपल्या वाचेने आपल्या हृदयकमळात विराजमान असलेल्या पांडुरंगाचे तुम्ही अखंड नामजप करा असा उपदेश ते या अभंगात प्रापंचिक लोकांना करतात.
( घटिका = वेळ, घटका / पळ = क्षणाचा काळ [ घटका आणि पळ हे वेळ मोजण्याचे प्राचीन मापक आहेत ] /नामावळी = नाम ( नाव ) आवळी= मालिका याचाच अर्थ अखंड नामजप )

अभंग -३१

० योग, याग, तप धर्म…
योग, याग, तप धर्म | सोपें वर्म नाम घेतां ॥

तीर्थ, व्रत, दान, अष्टांग I याचा पांग आम्हां नको ||

समाधी आणि समाधान | तुमचे चरण पाहतां ||

सांवता म्हणे दया क्षमा | हेंचि तुम्हां उचित ।।

अर्थ : –

अध्यात्मात भक्तीला विशेष महत्व आहे . गीतेने तर भक्ती मार्गाला तिसरी जीवननिष्ठा ( मार्ग ) मानले आहे . योग , याग , तप हे धर्मकर्मे मानली गेली आहेत . प्रस्तुत अभंगात मात्र संत सावता महाराज या प्रचलित कर्मांना ( भक्ती प्रकारांना ) छेद देत ‘ नामाला ‘ प्राधान्य दिले आहे . नवविधा भक्तीमध्ये स्मरण भक्तीला मान्यता आहे .नाम हे स्मरणाचे श्रेष्ठ साधन आहे . याच नामाचे महत्व स्पष्ट करतांना महाराज म्हणतात की …योग , याग व तप हे भक्ती मार्ग असले तरी ईश्र्वराचे ‘ नाम ‘ हे या सर्व प्रकारांचे वर्म आहे . तीर्थ , व्रत , दान या अष्टांग मार्गाची आम्हाला आसक्ती नको आहे . ते विठ्ठलाला म्हणतात की , तुमचे चरण पाहता मला समाधी लागून समाधान मिळते . याच अभंगाच्या तिसऱ्या चरणात सावता महाराज म्हणतात की , तुमच्या ठायी असलेली दया आणि क्षमा हिच आमच्यासाठी सर्वोपरी उचित आहे .

( वर्म= मर्म , रहस्य , गुढ / अष्टांग = भक्ती आठ मार्ग / पांग = आकांशा, उत्कट इच्छा, आसक्ती , आशा / उचिता = उचित , योग्य , बरोबर )

अभंग -३२ ( नाम महिमा )

० साधनांची आटाआटी …

साधनांची आटाआटी । कासया पाठीं लावितां ।।

एक तुमचें नामचि पुरें । हेंचि धुरें साधन ||

भाळी-भोळी करीन सेवा | माना देवा, तुम्ही धन्य ॥

सांवता म्हणे रुक्मिणीवरा | अहो अवधारा वचन माझें ।।

अर्थ : –

संत सावता महाराज या अभंगात श्री विठ्ठलाला म्हणतात की ,आम्हाला तुझी भक्ती करण्यासाठी साधनांची आटाआटी करण्यासाठी कशाला भाग पाडताय . त्यासाठी केवळ तुमचे नामच पुरेसे आहे . तुझे नामच सर्वश्रेष्ठ साधन आहे .मी आपली साधी भोळी सेवा करीन . हे देवा त्या सेवेलाच आपण धन्य मानावे . पुढे सावता महाराज म्हणतात की , हे रुक्मिणीवरा माझे हे वचन आपण लक्षपूर्वक ऐका .
( साधनांची आटाआटी = साधनांची जुळवाजुळव, पुस्तकी ज्ञानाची गरज /कासया = कशाला , कशासाठी / अवधारणे = विचारपूर्वक , लक्षपूर्वक )

[ ‘अवघी विठाई माझी ‘ या पुस्तकातून ] लेखक -जयकुमार चर्जन, परतवाडा
मो .९४२०७१३९९८
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सावता माली बहुत बड़े संत थे।
उन्होंने केवल खेती पर यानी कर्म पर दोहे नही लिखे बल्कि ब्राम्हणवाद पर सीधा प्रहार किया है।
“वेद श्रुती शास्त्रे पुराणे श्रमली । परी तया विठ्ठली गम्य नाही ।।१।। ते या पुंडलिका सुलभ पै जाहले । उद्धारावया आले भीमातटी ॥२॥ सावता म्हणे विठ्ठल दयाळ । लागो नेदी मळ भाविकांशी ।।३।।”
पांडुरंग ही सर्व श्रेष्ठ है। वेद, श्रुति, स्मृति और पुराण व्यर्थ है।इन्हे छोड़ दो।यह गैरबराबरी के जन्मदाता है। पांडुरंग के सामने सभी समान है। पांडुरांग की भक्ति से सभी की मुक्ति संभव है।
संत सावता महाराज ब्राह्मणवाद के सक्त खिलाफ थे यह इससे पता चलता है।
आज सावता महाराज के समाधी के दर्शन लिए।
👇

🙏🏻👉प्रो. Vilas Kharat sir ✍🫵

 

 

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button