का आहे मराठा आरक्षण बहुजनांवर अन्यायकारक !

का आहे मराठा आरक्षण बहुजनांवर अन्यायकारक !
आरक्षणाचा अर्थ प्रतिनिधित्व होतो, आरक्षणाचा उद्देश सर्व जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे हाच आहे. आजची परिस्थिती पहिली तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात मराठा जातीचे प्रतिनिधित्व जवळपास ५५% पेक्षा जास्त आहे. सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागास नाही, राजकीय दृष्ट्या तर मराठा समाज प्रस्थापित आहे. मराठा समाजाला अजून वाढून प्रतिनिधित्व दिले तर ते इतर जातींच्या वाट्याचे द्यावे लागेल. कि ज्यांचा वाटा आधीपासूनच वंचित आहे, तो अजूनपर्यंत भरलेला नाही. जो समाज आधीपासून प्रस्थापित आहे त्यांना अजून प्रतिनिधित्व देणे म्हणजे बहुजन समाजाला गुलामीशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही ! आज झोपलेल्या बहुजन समाजाने जर उद्याच्या भविष्यासाठी प्रयत्न नाही केले तर पुढील पिढीसाठी गुलामी हि ठरलेली आहे. प्रतिनिधित्वाची सर्व दारे बहुजन समाजासाठी बंद राहणार ! जातनिहाय जनगणना न करता मराठा जातीला आरक्षण देणे म्हणजे बहुजनांची गुलामी कायमस्वरूपी राहणार !!
उठ बहुजना जागा हो
अडाणी आमदार गोट्या खेळतात का ?
मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर विधानसभेत चर्चा करत असताना किती आमदारांना आरक्षणाचा अर्थ माहित आहे ?
जर आरक्षणाचा अर्थ प्रतिनिधित्व आहे ? तर मराठा समाजाकडे किती प्रतिनिधित्व आहे ?
आणि आजून किती पाहिजे ? आणि किती द्यायला पाहिजे ?
जर किती आहे आणि किती द्यायला पाहिजे याचा आकडाच माहित नसेल तर मग विधानसभेतील चर्चेचा काय उपयोग ?
जर आरक्षणाचा अर्थ प्रतिनिधित्व आहे, मराठा समाजाकडे प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधित्व आहे !
शिक्षित आमदार जर महाराष्ट्रात असते तर जरांगे ला आरक्षणाचा अर्थ सांगून आंदोलन १ तासात मिटले असते ! परंतु सर्व १० वी १२ वी वाले आमदार आणि रिक्षावाले मुख्यमंत्री पवित्र मंदिरात जाऊन बसल्यामुळे महाराष्ट्राची पार जत्रा करून टाकली यांनी !! दीनबंधू संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे 73 87 37 78 0 1 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा

