सत्यशोधक विधी श्रावण देवरे भाग 5

सत्यशोधक विधी श्रावण देवरे भाग 5
जातात. ही पुस्तके परिक्षार्थी विद्यार्थ्यांना निम्म्या किंमतीत दिली जातात. ही पुस्तके वाचून मुलं परीक्षाकेंद्रावर येऊन परीक्षा देतात. महाराष्ट्रात ३०० परीक्षाकेंद्र आहेत. प्रत्येक वर्षी सरासरी पाच हजार विद्यार्थी या परिक्षांना बसतात. यावर्षी आम्ही भारतीय संविधानालाच अभ्यासग्रंथ म्हणून छापला व परीक्षा आयोजित केली. या परिक्षेत राज्यस्तरीय मेरीटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कमांचे बक्षीस वाटप या सत्यशोधक विवाहात करायचे ठरविले आहे. परंतु जोपर्यंत अशा विद्यापीठाला राजकीय, शासकीय व सामाजिक मान्यता मिळत नाही, तोपर्यंत हे आमचे विद्यापीठ ‘प्रायोगिक’ स्वरूपातच सुरू राहील व अल्पसंख्य स्वरूपातच पुरोगामी कार्यकर्त्यांची निर्मिती करीत राहील.
मानवी सृष्टीतील पहिली संस्कृतीः कुलसंस्कृती
काही आंतरजातीय विवाह केवळ यासाठी होतात की, आई-वडील आंतरजातीय विवाही आहेत किंवा प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह होतात. परंतु तरीही वैज्ञानिक व सामाजिकदृष्ट्या त्यांचे महत्त्व कमी होत नाही. अशा विवाहांची संख्या वाढत जाणे, ही काळाची गरज आहे. पुरुषसत्ताक समाजव्यवस्था असल्याने आंतरजातीय विवाहितांना झालेली अपत्य पुरुषाची (नवऱ्याची) जात धारण करतात. परंतु तरीही सर्वच अपत्यांची लग्ने जातीत होत नाहीत. मुलगी – मुलाचे खानदान (?) शुद्ध जातीतलेच आहे की नाही, तेही बघतात. त्यामुळे आंतरजातीय विवाहितांच्या अपत्यांचे विवाह आंतरजातीयच होत असतात. अर्थात आंतरजातीय, आंतरवर्णीय, आंतरधर्मीय विवाहाची फार मोठी प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ‘क्रांती-प्रतिक्रांती’ या पुस्तकात आंतरवर्णीय विवाहितांचा एक चार्टच प्रकाशित केला आहे. तो पुढे दिलेला आहे.-
“पुष्यमित्राच्या ब्राह्मणी प्रतिक्रांतीचा उद्देश बौद्ध काळात मागे पडलेल्या चातुर्वर्थ्यांच्या प्राचीन सामाजिक व्यवस्थेचा पुनरूद्धार करणे हे होते. परंतु ब्राह्मणशाहीने ज्या वेळी बौद्ध धर्मावर विजय मिळविला. त्यावेळी मूळच्या चातुर्वर्ष्याच्या सामाजिक व्यवस्थेचा पुनरूद्धार करणे एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही. बुद्धपूर्व काळातील चातुर्वर्ण्य पद्धती लवचिक आणि खुली होती.
सत्यशोधक विधी ५

