सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
कडलक
नारायण गोविंदराव
नारायण गोविंदराव कडलक हे फुलेकालीन सत्यशोधक असून ते बहुधा पुणेकर सत्यशोधक असावेत. कालक हे १८७६ साली सत्यशोधक समाजाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. ते सरकारी नोकरी करत. सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार करीत असत, परंतु कागाळखोर अधिकाऱ्यांनी त्यांच्या बरिष्ठांना तक्रारी करून त्यांची महाबळेश्वर येथे बदली केली. बहुधा याच कारणावरून त्यांनी सत्यशोधक समाजाला दीड रुपया दिलेला निधी त्यांचे बंधू हरी गोविंदराव कडलक यांच्या नावे जमा केला असावा संदर्भ- महात्मा फुले समग्र वाड्मय-संपादक-य. दि. फडके
कडू
पाटील पी. बी. (जन्म-२८ ऑक्टोबर १९२१ मृत्यू-१९ जानेवारी २०१७)
कम्युनिस्ट आणि सत्यशोधक मतांचा समन्वय चालून डाव्या चळवळीत कार्यरत असणारे सत्यशोधक की पी बी कडू पाटील यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९२३ रोजी मौजे सात्रळ, ताः राहुरी, जि. अहमदनगर येथे झाला. बी. ए. एलएल. बी झाल्यावर ते राहुरी येथे वकिली करू लागले, वकिली व्यवसायाबरोबर ते कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार आणि प्रसारही करू लागले दरम्यान, स्वातंत्र्य बनवलीत सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांना १९४३-४४ साली कारावासही मोगावा लागला, प्रक्रा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि काही वर्षे त्यांनी अध्यक्षपदही भूषविले ते १९७२ ते १९७८ या कालखंडात राहुरी मतदारसंघाचे आमदारही राहिले. रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचेही ते पदाधिकारी राहिले
सत्यशोधकांचे अंतरंग /४०
दरम्यान, १९९० माश्रनंतर अंनिर्मूलनाच्या चळवळीतही सक्रिय झाले, पुढे दिनांक १३ व १४ मार्च १९९९ रोजी मौजे तरवडी, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथे आलेগনা अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष कटू पाटीलच होते. तमेव दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्यावरील पंचाचे प्रकाशनही त्यांनी तरवादी देथे येऊन बेले, कडू पाटील हे अनेक सत्यशोधक बैठकांनाही उपस्थित राहत.
कडू
जैमिनी भाऊराव
(जन्म २ नोव्हेंबर १९५२)
नागपूरकर सत्यशोधक प्रा. जैमिनी कडू यांचा जन्म छत्तीसगड राज्यातील रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात २ नोव्हेंबर १९५२ रोजी झाला. प्रा. जैमिनी कडू हे मूळ मौजे तुळजापूर (कडू), ता. मोर्शी, जिल्हा अमरावती येथील सत्यशोधक होत. जैमिनीचे वडील भाऊराव कडू हे शिक्षक होते. तुकडोजी महाराज हे भाऊराव कहुंचे मित्र होते. प्रा. जैमिनी कडू यांचे महाविद्यालयीन शिक्षण अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात झाले. पुढे त्यांनी एम. ए. (हिंदी, मराठी) एम. फिल. (मराठी), बी. जे. आदी अभ्यासक्रमांच विश्वक्षण पूर्ण केले. पुढे इ.स. १९७४ ला त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्या. इ. स. १९७६ साली ते नागपुरात वास्तव्यास आले. येवून ते सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनात साहित्य संमेलनात सक्रिय सहभागी झाले. ते या अधिवेशन साहित्य संमेलनामधून चौफेर सत्यशोधकी विचार मांडत असतात. मुंबई येथील २९ व्या सत्यशोधकी अधिवेशनात (१५ व १६ जानेवारी २०००) नामदार मधुकरराव चौधरी व तत्कालीन सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष रणधीर अण्णा यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. प्रा. जैमिनी कडू यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यापैकी ‘सत्यशोधक विचारसूत्र’, ‘ब्राह्मणवाद, ओबीसीः दशा आणि दिश्य’, ‘मला समजलेले आंबेडकर व फुले आंबेडकरवादाची मूलतत्वे आदी ग्रंथ सत्यशोधक मताचे
प्रतिपादन करणारे ग्रंथ आहेत.
सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




