हरिभाऊ राठोड यांचा आरक्षण फॉर्मुल्याचं गाठोड!

हरिभाऊ राठोड यांचा आरक्षण फॉर्मुल्याचं गाठोड!
स्वयंघोषित फॉर्मुला:- जरांगे यांच्याकडे लोटांगण घालत गेले. त्यांच्या गावी जाऊन दिला. जरांगे बसले सहा फूट उंचीच्या नारदाच्या गादीवर राठोड बसले. दीड फूट उंचीच्या खुर्चीवर एक धूर्त कोल्हा, एक उंट. एक मागासवर्गी, एक 96 कुळी मराठा. एका उंचीवर कधी येणार ? बळी तो कान पीळी! राठोड यांना कधी समजणार? कुणी तरी आमदारकी देताय का ? कोणी खासदारकी देत आहे, याच्या शोधात असतो. राठोड साहेब म्हणतात, भुजबळांना काय कळंत नाही. भाटिया आयोगाने इम्प्रिकल डाटा दिला आहे. त्याच्यामध्ये 37% ओबीसी ची संख्या दाखवलेली आहे. त्याप्रमाणे मग त्यांना एवढं कळत नाही की, यात मराठ्यांचे 55% संख्या धरली नाही. जनगणना केल्यावर जर जरांगे म्हणतात, त्यांच्याप्रमाणे जर 55% मराठा असेल तर 55% व 37% ओबीसी 92 टक्के आरक्षण मिळेल ना ओबीसीला. मग त्यांची सब – कॅटेगरी करा आणि मग त्यांना राठोड आयोगाच्या नावानं आरक्षण द्या. कारण या देशात कालेलकर आयोग, मंडल आयोग यासारख्या आठ आयोगाने मराठ्यांना सामाजिक आणि एज्युकेशनल मागासवर्गीय होता येत नाही. या कशाहीमध्ये ते बसत नाहीत. तर आरक्षण हे मागासवर्गीयांना असतं असं सांगितलेलं आहे. तरीसुद्धा राठोड संध्याकाळी दोन तीन तास खात पीत बसतात. असेच दोघं चौघ ओबीसीतलेच….रात्रं दिवस त्यांच्या डोक्यात फसवणूक असते. अशा लोकांना घेऊन बसतात आणि त्यांना वाटतं आपण जग जिंकलं. असेही चार-पाच चित्र महाराष्ट्रात आहे. आणि असे चित्र पकडणाऱ्या शिकाऱ्याने त्यांना पाळले आहे. त्यांच्यामार्फत ओबीसी वर जाळा टाकायला सुरुवात केलेली आहे. ओबीसींनो सावधान रहा. वेळीच यांचा डाव ओळखा. राठोड यांची आठ हात लाकूड आणि नऊ हात ढलपी हा कार्यक्रम असतो. कोणीही कधीही कसल्याही प्रकारे विचारात घेऊ नका. आणि त्याला महत्त्व देऊ नका. हे आरक्षणास पात्रच नाही. ज्यांना आरक्षण देताच येत नाही. त्यांनाही आमच्या ओबीसीतील 33 टक्के हिस्सा द्यायला निघाला. वारे राठोड. चोराच गाठोड असल्या सारखे वाटायला लागला राठोड. यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी जरांगेंना सोबत घ्यावे आणि पहिल्यांदा जात निहाय जनगणना करण्यासाठी आंदोलन करावे.आणि जात निहाय जनगणना झाल्यानंतर मग ते दूध का दूध पाणी का पाणी होईल. कोण मागासवर्गीय आहे. किती त्यांची संख्या आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. ओबीसींचा बॅकलॉग भरून काढावा. इथून पुढे सहकारी संस्था, बँका, शाळा या सर्व ओबीसींना द्याव्यात. जोपर्यंत ओबीसींचा बॅकलॉग पूर्ण होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत ओबीसींचा बॅकलॉग भरा. नोकरीतील बॅकलाग भरा. प्रोफेसर, न्यायाधीश, सचिव, कुलगुरू असे सगळे बॅकलोग भरा. खाजगीकरण बंद करा. खाजगीकरणांमध्ये सुद्धा ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवा. खाजगीकरणांमध्ये सुद्धा योग्य पगार. द्या महिला आरक्षणामध्ये ओबीसींना संख्येप्रमाणे आरक्षण द्या. कलम 340 प्रमाणे तिसरी सूची लागू करा.मुळामध्ये शिक्षण केजी ते पीजी मोफत करा. सर्व आरोग्य सुविधा मोफत करा. सर्व खाजगी दवाखान्याचे राष्ट्रीयकरण करा. शेतीला खते,बी बियाणे, वीज, कर्जपुरवठा,शेती उत्पादनाला हमीभाव द्या, सैन्य भरती अग्नी विर योजना रद्द करून सैन्य भरती पूर्ववत करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, म्हणजे आरक्षणाबद्दल लढाई करावे लागणार नाही.शेतीला उद्योगाचा दर्जा द्या. शिक्षणामध्ये शेती विषय जनजागृती करा. शेती विषय कंपल्सरी करा. प्राथमिक शिक्षणापासून व्यवसायाभिमुख उद्योगाचे शिक्षण द्या. संविधान शिक्षण सक्तीचे करा. म्हणजे पुढे जाऊन आरक्षण मागण्याची पाळी कोणालाही येणार नाही. या विषयावर राठोड आणि जरांगे यांनी आंदोलन करावे. नुसतं प्रसिद्धीसाठी जरांगे बसल्यावर नारदाच्या गादीवर आणि मुख्यमंत्री बसणार खुर्चीवर. जरांगे राजा बोले आणि मुख्यमंत्र्याचे दल चाले! असं अपमानित सरकार किती दिवस चालणार ? हे बघा हरिभाऊ राठोड म्हणतात मी भुजबळ साहेबापेक्षा मोठी सभा घेईन. भुजबळ साहेबांना काय कळत नाही. हे राठोड साहेब 2018 साली महाराष्ट्रभर दोन महिने फिरले होते. लाखाची सभा आझाद मैदानावर मुंबईत घेणार होते. त्या ठिकाणी त्यांच्या स्टेजवर 40 लोक होती. आणि खाली फक्त 30 लोक होती. हे राठोड मोठ्या मोठ्या गप्पा मारतात. चोराच गहू घाडग्यानं मोपुन वाटणी करू लागले, जे आरक्षणात नाहीत, जे मागासवर्गीय नाहीत जे खोटे खोटे दाखले घेऊन ओबीसींचे आरक्षण खात आहेत.त्यांनाच हे चोराला गटूड उचलून देऊ लागले. यांना असं बोलण्याचा. दुसऱ्याचे आरक्षण वाटायचं कोणी अधिकार दिला ? माझा फॉर्मुला घ्या ….माझा फॉर्मुला घ्या…म्हणून पाच वर्षे मनगटाला चुना लावून ओरडून ओरडून सांगतात. राठोड साहेबांनी आता तर गप्प बसावं. नाहीतर हाय तेवढी पण उरली सुरली घालू नका. तुमची गेली. सगळ्या ओबीसीची गेली. भटक्याची गेली, एनटी अ ब क ड ची गेली. जेव्हा आमच्या माळी समाजाच्या अपंग मुलावर अन्याय केला, त्याला फासावर चढवलं, फाशी दिलं त्यांची बाजू हे राठोड घेतात ? किती क्रूर मनाचा राठोड आहे! याच्याबद्दल कधी गेले का त्यांना भेटायला? विचारलं का त्या मुलाचं काय झालं म्हणून? नुसता आपणाला आमदारकी, खासदारकी, राज्यसभा, विधान परिषद मिळावा म्हणून रातभर खाऊन पिऊन दिवसभर आवर्जुन ओरडून सांगतात. माझा फॉर्मुला घ्या. लाडा लाडा गेले त्यांच्याकडे …सपाटून मार खाऊन आले. जाऊ द्या म्हणाले. आमच्या सत्तावीस मधलं त्यांना 9 टक्के….10 टक्के देऊ. पण जरांगे म्हणाले, अहो ते सत्तावीस टक्के सगळेच आमचे आहे. तुम्हाला द्यायचा प्रश्नच येत नाही. घ्या ज्याचं कराव भलं तो म्हणतो माझंच खरं . कवा कळणार असल्या राठोड साहेबांना? आपल्या घरातलं साठवलेलं पैशाचं गाठोड गपचूप उचललं आणि दुसऱ्या जवळ नेलं. मोपायला मोजून झाल्यावर मागितलं तर तो म्हणाला अरेच्चा हे गाठोडं तर माझंच आहे. तुझ्याकडे कसं काय? अशी गत झाली ह्या राठोड साहेबाची. व्हिडिओ आहे का? फजिती बघा त्यांची.
जागो ओबीसी जागो!
दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01
हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा


अरे एवढा हुशार झाला हा हरिभाऊ राठोड, सर्व पक्ष फिरून आलेला हा डोमकावळा आहे. ह्याला केंव्हापासून आरक्षणाचा कलू लागले आहे. अशा बाजारबुंनग्यांपासून ओबीसी बांधवानी सावध राहिले पाहिजे.